शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

अन् त्यांना बाबासाहेबांच्या कार्यातच बुद्ध गवसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 11:46 IST

आनंद डेकाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जपानसारख्या प्रगत देशातून एक तरुण बौद्ध भिक्खू बुद्ध अन् नागार्जुनाच्या कर्मभूमीच्या शोधात भारतात आले. नागार्जुनाच्या भूमीचा शोध घेत घेत ते नागपुरात पोहोचले. ना कुणाची ओळख ना पाळख, जपानी भाषा सोडली तर इतर कुठल्याही भाषेचा गंध नव्हता. अशा परिस्थितीत ते येथील भूमीशी, लोकांशी एकरूप झाले. यात ...

ठळक मुद्देभारत बनली जपानच्या भंतेंची कर्मभूमीभदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई

आनंद डेकाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जपानसारख्या प्रगत देशातून एक तरुण बौद्ध भिक्खू बुद्ध अन् नागार्जुनाच्या कर्मभूमीच्या शोधात भारतात आले. नागार्जुनाच्या भूमीचा शोध घेत घेत ते नागपुरात पोहोचले. ना कुणाची ओळख ना पाळख, जपानी भाषा सोडली तर इतर कुठल्याही भाषेचा गंध नव्हता. अशा परिस्थितीत ते येथील भूमीशी, लोकांशी एकरूप झाले. यात कित्येक वर्षे गेली. दरम्यान, नागपुरातच त्यांना नागार्जुनाची भूमी तर गवसलीच, पण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेत असताना त्यांच्या कार्यात तथागत बुद्धही गवसले आणि ते येथेच स्थाायिक झाले. जपान सोडून नागपूर आणि पर्यायाने भारत हीच त्यांची कर्मभूमी बनली.ते तरुण भंतेजी म्हणजे भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई होत. आज त्यांना कुठल्याही परिचयाची गरज नाही. भारतात येऊन त्यांना ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांना प्रचंड ताप असूनही त्यांनी मनमोकळी चर्चा केली.भारताचे दर्शन घेण्यासाठी ८ आॅगस्ट १९६७ रोजी ते भारतात आले. बौद्ध शांतिस्तुपाचे प्रवर्तक फुजी गुरुजी राजगिरी येथे रत्नागिरी पहाडावर शांतिस्तुपाच्या उभारणीत व्यस्त होते. ते राजगिरीला पोहोचले. भंते ससाई यांच्यानुसार, राजगिरीच्या पर्वतावरील एका दगडावर बसून ध्यानमग्न अवस्थेत असताना त्यांना आचार्य नागार्जुन यांनी दृष्टांत दिला. तसेच नागपूरला जाऊन लोकांची सेवा करण्यास सांगितले. ही गोष्ट भंते ससाई यांनी फुजी गुरुजींचे शिष्य भंते याकिझी यांना सांगितली. त्यापूर्वी नागपूर शहराचे नाव त्यांनी कधीच ऐकले नव्हते. याकिझी यांनी भारताचा नकाशा मागविला. त्यात नागपूर शहर शोधले. त्याच दिवशी भंते ससाई यांनी जपानला जाण्याचे तिकीट रद्द केले आणि नागपूरला यायला निघाले. नागपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचले तेव्हा हे शहर त्यांच्यासाठी एकदम नवीन होते. ड्रम वाजवीत ते रेल्वे स्टेशनवरून निघाले. सर्व त्यांना कुतूहलाने पाहू लागले. आज तीच अनोळखी व्यक्ती नागपूरची ओळख बनली आहे. नागपूरच्या आसपासचा परिसर हा बौद्धकालीन परिसर म्हणून विख्यात होता. परंतु काळाच्या ओघात तो दडला. भंते सुरेई ससाई यांनी त्याचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांनी सरकारच्या मदतीविना मनसर येथे उत्खनन केले. येथेच त्यांना आचार्य नागार्जुनाची कर्मभूमीही सापडली. आज मनसरचे उत्खनन जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांनी या ठिकाणी केलेल्या कामामुळे नागपूर रामटेक मनसर परिसर बौद्ध पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे.

महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा सुरूच राहणारबुद्धगया येथील महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात असावे, यासाठी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. महाबोधी महाविहार मुक्तीचा हा लढा शेवटपर्यंत सुरूच राहील, असा संकल्प भंते ससाई यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवलाय.

तेव्हापासून ‘जय भीम’ हेच जीवन बनलेधम्मचक्र प्रवर्तनाचा दिवस होता. सायंकाळी दीक्षाभूमीवर मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळपासून नागपूरचे संपूर्ण रस्ते जणू दीक्षाभूमीकडेच निघाले होते. लोकांचा तो जनसागर पाहून भंते ससार्इंना मोठे कुतूहल वाटले. तेही त्यांच्यासोबत दीक्षाभूमीवर पोहचले. व्यासपीठावर अनेक मान्यवर मंडळी बसली होती. ती अगदी अनोळखी होते. लोकही एका विदेशी भिक्खूला पाहून आश्चर्य करीत होते. भंते आनंद कौसल्यायन यांनी त्यांना वर बोलावले. शेवटच्या रांगेत ते बसले. कार्यक्रम संपला. सर्व नेते व लोक उठून जाऊ लागले. त्यांना काहीच समजले नाही. कोण काय म्हणत होते, हेही समजले नाही. परंतु प्रत्येकाच्या भाषणातून एक शब्द वारंवार येत होता तो म्हणजे ‘जय भीम’. भंते ससाई यांनी माईक हाती घेतला आणि मोठ्या आवाजात जय भीम म्हणाले. त्यांचा आवाज पहाडी होता. दूरपर्यंत आवाज गेल्याने लोक जागीच थांबले. नेतेही वळून पाहू लागले. भंते ससाई पुन्हा पुन्हा जय भीम जय भीम अशा घोषणा देऊ लागले. असे जवळपास दहावेळा म्हटल्यावर लोकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. तेच भंते ससाई यांचे पहिले जाहीर भाषण ठरले. तेव्हापासून जय भीमचा मंत्र त्यांनी अवलंबिला. जय भीम हेच त्यांचे जीवन बनले. आज तेच भंते ससाई दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्षपद भूषवीत आहेत.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळे