शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अन् त्यांना बाबासाहेबांच्या कार्यातच बुद्ध गवसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 11:46 IST

आनंद डेकाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जपानसारख्या प्रगत देशातून एक तरुण बौद्ध भिक्खू बुद्ध अन् नागार्जुनाच्या कर्मभूमीच्या शोधात भारतात आले. नागार्जुनाच्या भूमीचा शोध घेत घेत ते नागपुरात पोहोचले. ना कुणाची ओळख ना पाळख, जपानी भाषा सोडली तर इतर कुठल्याही भाषेचा गंध नव्हता. अशा परिस्थितीत ते येथील भूमीशी, लोकांशी एकरूप झाले. यात ...

ठळक मुद्देभारत बनली जपानच्या भंतेंची कर्मभूमीभदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई

आनंद डेकाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जपानसारख्या प्रगत देशातून एक तरुण बौद्ध भिक्खू बुद्ध अन् नागार्जुनाच्या कर्मभूमीच्या शोधात भारतात आले. नागार्जुनाच्या भूमीचा शोध घेत घेत ते नागपुरात पोहोचले. ना कुणाची ओळख ना पाळख, जपानी भाषा सोडली तर इतर कुठल्याही भाषेचा गंध नव्हता. अशा परिस्थितीत ते येथील भूमीशी, लोकांशी एकरूप झाले. यात कित्येक वर्षे गेली. दरम्यान, नागपुरातच त्यांना नागार्जुनाची भूमी तर गवसलीच, पण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेत असताना त्यांच्या कार्यात तथागत बुद्धही गवसले आणि ते येथेच स्थाायिक झाले. जपान सोडून नागपूर आणि पर्यायाने भारत हीच त्यांची कर्मभूमी बनली.ते तरुण भंतेजी म्हणजे भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई होत. आज त्यांना कुठल्याही परिचयाची गरज नाही. भारतात येऊन त्यांना ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांना प्रचंड ताप असूनही त्यांनी मनमोकळी चर्चा केली.भारताचे दर्शन घेण्यासाठी ८ आॅगस्ट १९६७ रोजी ते भारतात आले. बौद्ध शांतिस्तुपाचे प्रवर्तक फुजी गुरुजी राजगिरी येथे रत्नागिरी पहाडावर शांतिस्तुपाच्या उभारणीत व्यस्त होते. ते राजगिरीला पोहोचले. भंते ससाई यांच्यानुसार, राजगिरीच्या पर्वतावरील एका दगडावर बसून ध्यानमग्न अवस्थेत असताना त्यांना आचार्य नागार्जुन यांनी दृष्टांत दिला. तसेच नागपूरला जाऊन लोकांची सेवा करण्यास सांगितले. ही गोष्ट भंते ससाई यांनी फुजी गुरुजींचे शिष्य भंते याकिझी यांना सांगितली. त्यापूर्वी नागपूर शहराचे नाव त्यांनी कधीच ऐकले नव्हते. याकिझी यांनी भारताचा नकाशा मागविला. त्यात नागपूर शहर शोधले. त्याच दिवशी भंते ससाई यांनी जपानला जाण्याचे तिकीट रद्द केले आणि नागपूरला यायला निघाले. नागपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचले तेव्हा हे शहर त्यांच्यासाठी एकदम नवीन होते. ड्रम वाजवीत ते रेल्वे स्टेशनवरून निघाले. सर्व त्यांना कुतूहलाने पाहू लागले. आज तीच अनोळखी व्यक्ती नागपूरची ओळख बनली आहे. नागपूरच्या आसपासचा परिसर हा बौद्धकालीन परिसर म्हणून विख्यात होता. परंतु काळाच्या ओघात तो दडला. भंते सुरेई ससाई यांनी त्याचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांनी सरकारच्या मदतीविना मनसर येथे उत्खनन केले. येथेच त्यांना आचार्य नागार्जुनाची कर्मभूमीही सापडली. आज मनसरचे उत्खनन जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांनी या ठिकाणी केलेल्या कामामुळे नागपूर रामटेक मनसर परिसर बौद्ध पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे.

महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा सुरूच राहणारबुद्धगया येथील महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात असावे, यासाठी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. महाबोधी महाविहार मुक्तीचा हा लढा शेवटपर्यंत सुरूच राहील, असा संकल्प भंते ससाई यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवलाय.

तेव्हापासून ‘जय भीम’ हेच जीवन बनलेधम्मचक्र प्रवर्तनाचा दिवस होता. सायंकाळी दीक्षाभूमीवर मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळपासून नागपूरचे संपूर्ण रस्ते जणू दीक्षाभूमीकडेच निघाले होते. लोकांचा तो जनसागर पाहून भंते ससार्इंना मोठे कुतूहल वाटले. तेही त्यांच्यासोबत दीक्षाभूमीवर पोहचले. व्यासपीठावर अनेक मान्यवर मंडळी बसली होती. ती अगदी अनोळखी होते. लोकही एका विदेशी भिक्खूला पाहून आश्चर्य करीत होते. भंते आनंद कौसल्यायन यांनी त्यांना वर बोलावले. शेवटच्या रांगेत ते बसले. कार्यक्रम संपला. सर्व नेते व लोक उठून जाऊ लागले. त्यांना काहीच समजले नाही. कोण काय म्हणत होते, हेही समजले नाही. परंतु प्रत्येकाच्या भाषणातून एक शब्द वारंवार येत होता तो म्हणजे ‘जय भीम’. भंते ससाई यांनी माईक हाती घेतला आणि मोठ्या आवाजात जय भीम म्हणाले. त्यांचा आवाज पहाडी होता. दूरपर्यंत आवाज गेल्याने लोक जागीच थांबले. नेतेही वळून पाहू लागले. भंते ससाई पुन्हा पुन्हा जय भीम जय भीम अशा घोषणा देऊ लागले. असे जवळपास दहावेळा म्हटल्यावर लोकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. तेच भंते ससाई यांचे पहिले जाहीर भाषण ठरले. तेव्हापासून जय भीमचा मंत्र त्यांनी अवलंबिला. जय भीम हेच त्यांचे जीवन बनले. आज तेच भंते ससाई दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्षपद भूषवीत आहेत.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळे