शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

अन् त्यांना बाबासाहेबांच्या कार्यातच बुद्ध गवसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 11:46 IST

आनंद डेकाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जपानसारख्या प्रगत देशातून एक तरुण बौद्ध भिक्खू बुद्ध अन् नागार्जुनाच्या कर्मभूमीच्या शोधात भारतात आले. नागार्जुनाच्या भूमीचा शोध घेत घेत ते नागपुरात पोहोचले. ना कुणाची ओळख ना पाळख, जपानी भाषा सोडली तर इतर कुठल्याही भाषेचा गंध नव्हता. अशा परिस्थितीत ते येथील भूमीशी, लोकांशी एकरूप झाले. यात ...

ठळक मुद्देभारत बनली जपानच्या भंतेंची कर्मभूमीभदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई

आनंद डेकाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जपानसारख्या प्रगत देशातून एक तरुण बौद्ध भिक्खू बुद्ध अन् नागार्जुनाच्या कर्मभूमीच्या शोधात भारतात आले. नागार्जुनाच्या भूमीचा शोध घेत घेत ते नागपुरात पोहोचले. ना कुणाची ओळख ना पाळख, जपानी भाषा सोडली तर इतर कुठल्याही भाषेचा गंध नव्हता. अशा परिस्थितीत ते येथील भूमीशी, लोकांशी एकरूप झाले. यात कित्येक वर्षे गेली. दरम्यान, नागपुरातच त्यांना नागार्जुनाची भूमी तर गवसलीच, पण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेत असताना त्यांच्या कार्यात तथागत बुद्धही गवसले आणि ते येथेच स्थाायिक झाले. जपान सोडून नागपूर आणि पर्यायाने भारत हीच त्यांची कर्मभूमी बनली.ते तरुण भंतेजी म्हणजे भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई होत. आज त्यांना कुठल्याही परिचयाची गरज नाही. भारतात येऊन त्यांना ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांना प्रचंड ताप असूनही त्यांनी मनमोकळी चर्चा केली.भारताचे दर्शन घेण्यासाठी ८ आॅगस्ट १९६७ रोजी ते भारतात आले. बौद्ध शांतिस्तुपाचे प्रवर्तक फुजी गुरुजी राजगिरी येथे रत्नागिरी पहाडावर शांतिस्तुपाच्या उभारणीत व्यस्त होते. ते राजगिरीला पोहोचले. भंते ससाई यांच्यानुसार, राजगिरीच्या पर्वतावरील एका दगडावर बसून ध्यानमग्न अवस्थेत असताना त्यांना आचार्य नागार्जुन यांनी दृष्टांत दिला. तसेच नागपूरला जाऊन लोकांची सेवा करण्यास सांगितले. ही गोष्ट भंते ससाई यांनी फुजी गुरुजींचे शिष्य भंते याकिझी यांना सांगितली. त्यापूर्वी नागपूर शहराचे नाव त्यांनी कधीच ऐकले नव्हते. याकिझी यांनी भारताचा नकाशा मागविला. त्यात नागपूर शहर शोधले. त्याच दिवशी भंते ससाई यांनी जपानला जाण्याचे तिकीट रद्द केले आणि नागपूरला यायला निघाले. नागपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचले तेव्हा हे शहर त्यांच्यासाठी एकदम नवीन होते. ड्रम वाजवीत ते रेल्वे स्टेशनवरून निघाले. सर्व त्यांना कुतूहलाने पाहू लागले. आज तीच अनोळखी व्यक्ती नागपूरची ओळख बनली आहे. नागपूरच्या आसपासचा परिसर हा बौद्धकालीन परिसर म्हणून विख्यात होता. परंतु काळाच्या ओघात तो दडला. भंते सुरेई ससाई यांनी त्याचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांनी सरकारच्या मदतीविना मनसर येथे उत्खनन केले. येथेच त्यांना आचार्य नागार्जुनाची कर्मभूमीही सापडली. आज मनसरचे उत्खनन जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांनी या ठिकाणी केलेल्या कामामुळे नागपूर रामटेक मनसर परिसर बौद्ध पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे.

महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा सुरूच राहणारबुद्धगया येथील महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात असावे, यासाठी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. महाबोधी महाविहार मुक्तीचा हा लढा शेवटपर्यंत सुरूच राहील, असा संकल्प भंते ससाई यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवलाय.

तेव्हापासून ‘जय भीम’ हेच जीवन बनलेधम्मचक्र प्रवर्तनाचा दिवस होता. सायंकाळी दीक्षाभूमीवर मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळपासून नागपूरचे संपूर्ण रस्ते जणू दीक्षाभूमीकडेच निघाले होते. लोकांचा तो जनसागर पाहून भंते ससार्इंना मोठे कुतूहल वाटले. तेही त्यांच्यासोबत दीक्षाभूमीवर पोहचले. व्यासपीठावर अनेक मान्यवर मंडळी बसली होती. ती अगदी अनोळखी होते. लोकही एका विदेशी भिक्खूला पाहून आश्चर्य करीत होते. भंते आनंद कौसल्यायन यांनी त्यांना वर बोलावले. शेवटच्या रांगेत ते बसले. कार्यक्रम संपला. सर्व नेते व लोक उठून जाऊ लागले. त्यांना काहीच समजले नाही. कोण काय म्हणत होते, हेही समजले नाही. परंतु प्रत्येकाच्या भाषणातून एक शब्द वारंवार येत होता तो म्हणजे ‘जय भीम’. भंते ससाई यांनी माईक हाती घेतला आणि मोठ्या आवाजात जय भीम म्हणाले. त्यांचा आवाज पहाडी होता. दूरपर्यंत आवाज गेल्याने लोक जागीच थांबले. नेतेही वळून पाहू लागले. भंते ससाई पुन्हा पुन्हा जय भीम जय भीम अशा घोषणा देऊ लागले. असे जवळपास दहावेळा म्हटल्यावर लोकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. तेच भंते ससाई यांचे पहिले जाहीर भाषण ठरले. तेव्हापासून जय भीमचा मंत्र त्यांनी अवलंबिला. जय भीम हेच त्यांचे जीवन बनले. आज तेच भंते ससाई दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्षपद भूषवीत आहेत.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळे