शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

'ट्रॅक्टर चालविणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच ...'; विधिमंडळ परिसरात रंगला आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा

By मंगेश व्यवहारे | Updated: December 12, 2023 06:34 IST

ट्रॅक्टर चालविणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच बघितला : ठाकरे

मंगेश व्यवहारेनागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे सभागृहात आले आणि पहिल्याच दिवशी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह सरकारच्या कार्यप्रणालीवर टीका केली. लोकांच्या घरादारावरती नांगर अन् समुद्रावर ट्रॅक्टर चालविणारा मुख्यमंत्री मी पहिल्यांदाच पाहिला, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले. उद्धव ठाकरेंबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तो ट्रॅक्टर कशाचा होता, याची माहिती त्यांनी घ्यायला हवी होती. तो बिच कॉम्बर होता. बिच कॉम्बरमध्ये असलेल्या जाळीत समुद्राच्या काठावरील सर्व कचरा संकलित होतो आणि त्याचे विघटन होते, पण दुर्दैव आहे बोलणाऱ्यांनी पूर्ण माहिती घ्यायला हवी होती. ज्यांनी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर जेसीबी चालविला त्यांना हे काय कळणार? अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

उद्धव ठाकरेंना माझी अडचण होतेय, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी दिल्लीला, तेलंगणाला गेलो, गावी गेलो वा बिचवर स्वच्छता करायला गेलो, तरी यांना अडचण आहे. महाराष्ट्राला घरी बसणारा मुख्यमंत्री पाहिजे की, दिल्ली ते गल्ली फिल्डवर काम करणारा मुख्यमंत्री हवा, याचा विचार करायला हवा. मी फिल्डवर काम करणारा मुख्यमंत्री आहे. फेसबुक लाइव्हवर काम करत नाही.

मी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली

अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर चढला आहे. बँकांकडून कर्जाचा तगादा लावला जात आहे. आज त्यांचा कुणीही वाली नाही. शेतकरी आपले अवयव विकायला तयार झाले आहेत. अशी परिस्थिती यापूर्वी कधीही शेतकऱ्यांवर आली नव्हती. मी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली होती. या सरकारला कळवळा असेल, तर पंचनाम्याचे थोतांड बंद करून कर्जमाफी द्यावी, अशी रोखठोक मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

आम्ही शेतकऱ्यांना १२ हजार कोटींची मदत केली

 शिंदे म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर आहे. जेव्हा-जेव्हा संकट आले, तेव्हा-तेव्हा सरकार शेतकऱ्याच्या मदतीसाठी उभे राहिले. आतापर्यंत शेतकऱ्यांना १२ हजार कोटींची मदत देण्यात आली आहे. मी आणि फडणवीस स्वत: बांधावर गेलो आणि नुकसानीची पाहणी केली. जे बोलत आहेत ते चार दिवसांनंतर अधिवेशनात आले, ते किती गंभीर आहेत, याचा विचार त्यांनीच करावा.

पटेलांना पण तोच न्याय लावणार का?

भाजपने नवाब मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आम्ही आदर करतो, पण नवाब मलिकांना जो न्याय लावला, तो प्रफुल्ल पटेलांना लावून तुम्ही त्यांच्यापासून अंतर ठेवणार का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

याकुबच्या कबरीचे उदात्तीकरण काेणी केले?

ज्यांच्यावर बॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्यांना मंत्रिमंडळात ठेवले, तसेच याकुब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण केले, त्यांना आता बोलण्याचा अधिकार नाही असा टाेला मुख्यमंत्री शिंदे  यांनी लगावला

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनShiv Senaशिवसेना