शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

'ट्रॅक्टर चालविणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच ...'; विधिमंडळ परिसरात रंगला आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा

By मंगेश व्यवहारे | Updated: December 12, 2023 06:34 IST

ट्रॅक्टर चालविणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच बघितला : ठाकरे

मंगेश व्यवहारेनागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे सभागृहात आले आणि पहिल्याच दिवशी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह सरकारच्या कार्यप्रणालीवर टीका केली. लोकांच्या घरादारावरती नांगर अन् समुद्रावर ट्रॅक्टर चालविणारा मुख्यमंत्री मी पहिल्यांदाच पाहिला, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले. उद्धव ठाकरेंबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तो ट्रॅक्टर कशाचा होता, याची माहिती त्यांनी घ्यायला हवी होती. तो बिच कॉम्बर होता. बिच कॉम्बरमध्ये असलेल्या जाळीत समुद्राच्या काठावरील सर्व कचरा संकलित होतो आणि त्याचे विघटन होते, पण दुर्दैव आहे बोलणाऱ्यांनी पूर्ण माहिती घ्यायला हवी होती. ज्यांनी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर जेसीबी चालविला त्यांना हे काय कळणार? अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

उद्धव ठाकरेंना माझी अडचण होतेय, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी दिल्लीला, तेलंगणाला गेलो, गावी गेलो वा बिचवर स्वच्छता करायला गेलो, तरी यांना अडचण आहे. महाराष्ट्राला घरी बसणारा मुख्यमंत्री पाहिजे की, दिल्ली ते गल्ली फिल्डवर काम करणारा मुख्यमंत्री हवा, याचा विचार करायला हवा. मी फिल्डवर काम करणारा मुख्यमंत्री आहे. फेसबुक लाइव्हवर काम करत नाही.

मी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली

अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर चढला आहे. बँकांकडून कर्जाचा तगादा लावला जात आहे. आज त्यांचा कुणीही वाली नाही. शेतकरी आपले अवयव विकायला तयार झाले आहेत. अशी परिस्थिती यापूर्वी कधीही शेतकऱ्यांवर आली नव्हती. मी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली होती. या सरकारला कळवळा असेल, तर पंचनाम्याचे थोतांड बंद करून कर्जमाफी द्यावी, अशी रोखठोक मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

आम्ही शेतकऱ्यांना १२ हजार कोटींची मदत केली

 शिंदे म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर आहे. जेव्हा-जेव्हा संकट आले, तेव्हा-तेव्हा सरकार शेतकऱ्याच्या मदतीसाठी उभे राहिले. आतापर्यंत शेतकऱ्यांना १२ हजार कोटींची मदत देण्यात आली आहे. मी आणि फडणवीस स्वत: बांधावर गेलो आणि नुकसानीची पाहणी केली. जे बोलत आहेत ते चार दिवसांनंतर अधिवेशनात आले, ते किती गंभीर आहेत, याचा विचार त्यांनीच करावा.

पटेलांना पण तोच न्याय लावणार का?

भाजपने नवाब मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आम्ही आदर करतो, पण नवाब मलिकांना जो न्याय लावला, तो प्रफुल्ल पटेलांना लावून तुम्ही त्यांच्यापासून अंतर ठेवणार का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

याकुबच्या कबरीचे उदात्तीकरण काेणी केले?

ज्यांच्यावर बॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्यांना मंत्रिमंडळात ठेवले, तसेच याकुब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण केले, त्यांना आता बोलण्याचा अधिकार नाही असा टाेला मुख्यमंत्री शिंदे  यांनी लगावला

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनShiv Senaशिवसेना