शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

यंदा तरी होईल का प्रदूषणमुक्त दिवाळी?, दिल्ली, मुंबईनंतर नागपूरची हवा वाईट

By निशांत वानखेडे | Updated: November 8, 2023 18:09 IST

दिवाळीच्या काळात फटक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदुषणात आणखी भर : गेल्या वर्षी निर्देशांक ३००च्यावर

निशांत वानखेडे, नागपूर

 नागपूर : देशाची राजधानी दिल्ली आणि मुंबईमध्ये वाढलेल्या प्रचंड प्रदूषणामुळे तेथील नागरिकांचा श्वास कोंडला आहे. नागपूरची स्थिती इतकी वाईट नसली तरी समाधानकारकही म्हणता येणार नाही. सण-उत्सवाच्या काळात प्रदूषणात मोठी वाढ होते. दिवाळीच्या काळात फटक्यांच्या आतषबाजीमुळे त्यात आणखी भर पडते. यामुळे प्रदूषणात कमतरता येईल, ही कल्पना अशक्यच वाटते आहे.

वाहनांची वाढलेली संख्या, कचरा जाळणे, बांधकामातून उडणारी धूळ व धुलिकणांमुळे नागपूरकरांनाही प्रदूषणाचा सामना करावा लागतो आहे. त्यात फटाक्यांच्या प्रदूषणाची आणखी भर पडते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ३० पैकी २९ दिवस हवेची गुणवत्ता वाईट होती. त्यात दिवाळीच्या फटाक्यांमुळे आणखी भर पडली व पाच दिवस गुणवत्ता निर्देशांक-एक्युआय ३००च्यावर पोहोचला होता. थंडीच्या काळात प्रदूषणात वाढ होतेच; पण फटाक्यांच्या धुरामुळे विषारी रसायने हवेत मिसळतात. विशेष म्हणजे गेल्या ऑक्टोबर महिन्यातच ३१ पैकी २१ दिवस प्रदूषणाचा स्तर अधिक होता. केवळ दोन दिवस हवा श्वास घेण्यालायक होती. नोव्हेंबरमध्ये तर दिवाळीच्या फटाक्यांमुळे ती अधिक विषारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील महाल, गांधीबाग, सीए रोड, सदर, धरमपेठ, खामला, मानेवाडा या भागात एक्युआय ३००च्या आसपास गेला होता. पीएम-१० धुलिकणांचा स्तर ३५० ते ४०० पर्यंत पोहोचला होता. 

वायू प्रदूषणासह ध्वनी प्रदूषण हीसुद्धा नागपूरकरांची समस्या ठरली आहे. नीरीच्या अध्ययनानुसार गेल्या वर्षीही ध्वनी प्रदूषण सामान्यपेक्षा कितीतरी अधिक होता. हनुमाननगर, नेहरूनगर, आसीनगर, सतरंजीपुरा, लक्ष्मीनगर, लकडगंज व मंगळवारी झोनमध्ये ध्वनी प्रदूषणाचा स्तर ७५ ते ८० डेसिबलच्या वर जाताे. त्यामुळे कानठळ्या बसविणारे प्रदूषण धोकादायक स्थितीत जाईल, हे नाकारता येत नाही.

फटाक्यांतून निघतात हे प्रदूषित वायू

फटाके तयार करताना कॉपर, झिंक, लेड, सोडियम, मॅग्नेशियम, कॅडिमयम यांसारख्या घातक धातूंचा वापर केला जातो. फटाके फोडल्यानंतर सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड या वायूंचे तसेच निकेल, कॅडिमयम, क्रोमियम या जड धातूंचे उत्सर्जन होते, जे प्रदषणू वाढण्यास कारणीभूत ठरते. शिवाय धुलिकणांचा धोकादायक स्तर वाढतो.

आजाराला निमंत्रण

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते फटाक्यामुळे धोकादायक रसायने हवेत मिसळतात. यामुळे दमा रुग्णांचा त्रास बळावतो. श्वसनाचे अनेक आजार वाढतात. धुलिकणांसह ही रसायने शरीरात जातात व त्यामुळे कॅन्सरसारखे घातक आजार वाढण्याचा धोका असतो.

टॅग्स :environmentपर्यावरणair pollutionवायू प्रदूषणpollutionप्रदूषणfire crackerफटाकेDiwaliदिवाळी 2023