शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

यंदा तरी होईल का प्रदूषणमुक्त दिवाळी?, दिल्ली, मुंबईनंतर नागपूरची हवा वाईट

By निशांत वानखेडे | Updated: November 8, 2023 18:09 IST

दिवाळीच्या काळात फटक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदुषणात आणखी भर : गेल्या वर्षी निर्देशांक ३००च्यावर

निशांत वानखेडे, नागपूर

 नागपूर : देशाची राजधानी दिल्ली आणि मुंबईमध्ये वाढलेल्या प्रचंड प्रदूषणामुळे तेथील नागरिकांचा श्वास कोंडला आहे. नागपूरची स्थिती इतकी वाईट नसली तरी समाधानकारकही म्हणता येणार नाही. सण-उत्सवाच्या काळात प्रदूषणात मोठी वाढ होते. दिवाळीच्या काळात फटक्यांच्या आतषबाजीमुळे त्यात आणखी भर पडते. यामुळे प्रदूषणात कमतरता येईल, ही कल्पना अशक्यच वाटते आहे.

वाहनांची वाढलेली संख्या, कचरा जाळणे, बांधकामातून उडणारी धूळ व धुलिकणांमुळे नागपूरकरांनाही प्रदूषणाचा सामना करावा लागतो आहे. त्यात फटाक्यांच्या प्रदूषणाची आणखी भर पडते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ३० पैकी २९ दिवस हवेची गुणवत्ता वाईट होती. त्यात दिवाळीच्या फटाक्यांमुळे आणखी भर पडली व पाच दिवस गुणवत्ता निर्देशांक-एक्युआय ३००च्यावर पोहोचला होता. थंडीच्या काळात प्रदूषणात वाढ होतेच; पण फटाक्यांच्या धुरामुळे विषारी रसायने हवेत मिसळतात. विशेष म्हणजे गेल्या ऑक्टोबर महिन्यातच ३१ पैकी २१ दिवस प्रदूषणाचा स्तर अधिक होता. केवळ दोन दिवस हवा श्वास घेण्यालायक होती. नोव्हेंबरमध्ये तर दिवाळीच्या फटाक्यांमुळे ती अधिक विषारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील महाल, गांधीबाग, सीए रोड, सदर, धरमपेठ, खामला, मानेवाडा या भागात एक्युआय ३००च्या आसपास गेला होता. पीएम-१० धुलिकणांचा स्तर ३५० ते ४०० पर्यंत पोहोचला होता. 

वायू प्रदूषणासह ध्वनी प्रदूषण हीसुद्धा नागपूरकरांची समस्या ठरली आहे. नीरीच्या अध्ययनानुसार गेल्या वर्षीही ध्वनी प्रदूषण सामान्यपेक्षा कितीतरी अधिक होता. हनुमाननगर, नेहरूनगर, आसीनगर, सतरंजीपुरा, लक्ष्मीनगर, लकडगंज व मंगळवारी झोनमध्ये ध्वनी प्रदूषणाचा स्तर ७५ ते ८० डेसिबलच्या वर जाताे. त्यामुळे कानठळ्या बसविणारे प्रदूषण धोकादायक स्थितीत जाईल, हे नाकारता येत नाही.

फटाक्यांतून निघतात हे प्रदूषित वायू

फटाके तयार करताना कॉपर, झिंक, लेड, सोडियम, मॅग्नेशियम, कॅडिमयम यांसारख्या घातक धातूंचा वापर केला जातो. फटाके फोडल्यानंतर सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड या वायूंचे तसेच निकेल, कॅडिमयम, क्रोमियम या जड धातूंचे उत्सर्जन होते, जे प्रदषणू वाढण्यास कारणीभूत ठरते. शिवाय धुलिकणांचा धोकादायक स्तर वाढतो.

आजाराला निमंत्रण

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते फटाक्यामुळे धोकादायक रसायने हवेत मिसळतात. यामुळे दमा रुग्णांचा त्रास बळावतो. श्वसनाचे अनेक आजार वाढतात. धुलिकणांसह ही रसायने शरीरात जातात व त्यामुळे कॅन्सरसारखे घातक आजार वाढण्याचा धोका असतो.

टॅग्स :environmentपर्यावरणair pollutionवायू प्रदूषणpollutionप्रदूषणfire crackerफटाकेDiwaliदिवाळी 2023