शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

यंदा तरी होईल का प्रदूषणमुक्त दिवाळी?, दिल्ली, मुंबईनंतर नागपूरची हवा वाईट

By निशांत वानखेडे | Updated: November 8, 2023 18:09 IST

दिवाळीच्या काळात फटक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदुषणात आणखी भर : गेल्या वर्षी निर्देशांक ३००च्यावर

निशांत वानखेडे, नागपूर

 नागपूर : देशाची राजधानी दिल्ली आणि मुंबईमध्ये वाढलेल्या प्रचंड प्रदूषणामुळे तेथील नागरिकांचा श्वास कोंडला आहे. नागपूरची स्थिती इतकी वाईट नसली तरी समाधानकारकही म्हणता येणार नाही. सण-उत्सवाच्या काळात प्रदूषणात मोठी वाढ होते. दिवाळीच्या काळात फटक्यांच्या आतषबाजीमुळे त्यात आणखी भर पडते. यामुळे प्रदूषणात कमतरता येईल, ही कल्पना अशक्यच वाटते आहे.

वाहनांची वाढलेली संख्या, कचरा जाळणे, बांधकामातून उडणारी धूळ व धुलिकणांमुळे नागपूरकरांनाही प्रदूषणाचा सामना करावा लागतो आहे. त्यात फटाक्यांच्या प्रदूषणाची आणखी भर पडते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ३० पैकी २९ दिवस हवेची गुणवत्ता वाईट होती. त्यात दिवाळीच्या फटाक्यांमुळे आणखी भर पडली व पाच दिवस गुणवत्ता निर्देशांक-एक्युआय ३००च्यावर पोहोचला होता. थंडीच्या काळात प्रदूषणात वाढ होतेच; पण फटाक्यांच्या धुरामुळे विषारी रसायने हवेत मिसळतात. विशेष म्हणजे गेल्या ऑक्टोबर महिन्यातच ३१ पैकी २१ दिवस प्रदूषणाचा स्तर अधिक होता. केवळ दोन दिवस हवा श्वास घेण्यालायक होती. नोव्हेंबरमध्ये तर दिवाळीच्या फटाक्यांमुळे ती अधिक विषारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील महाल, गांधीबाग, सीए रोड, सदर, धरमपेठ, खामला, मानेवाडा या भागात एक्युआय ३००च्या आसपास गेला होता. पीएम-१० धुलिकणांचा स्तर ३५० ते ४०० पर्यंत पोहोचला होता. 

वायू प्रदूषणासह ध्वनी प्रदूषण हीसुद्धा नागपूरकरांची समस्या ठरली आहे. नीरीच्या अध्ययनानुसार गेल्या वर्षीही ध्वनी प्रदूषण सामान्यपेक्षा कितीतरी अधिक होता. हनुमाननगर, नेहरूनगर, आसीनगर, सतरंजीपुरा, लक्ष्मीनगर, लकडगंज व मंगळवारी झोनमध्ये ध्वनी प्रदूषणाचा स्तर ७५ ते ८० डेसिबलच्या वर जाताे. त्यामुळे कानठळ्या बसविणारे प्रदूषण धोकादायक स्थितीत जाईल, हे नाकारता येत नाही.

फटाक्यांतून निघतात हे प्रदूषित वायू

फटाके तयार करताना कॉपर, झिंक, लेड, सोडियम, मॅग्नेशियम, कॅडिमयम यांसारख्या घातक धातूंचा वापर केला जातो. फटाके फोडल्यानंतर सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड या वायूंचे तसेच निकेल, कॅडिमयम, क्रोमियम या जड धातूंचे उत्सर्जन होते, जे प्रदषणू वाढण्यास कारणीभूत ठरते. शिवाय धुलिकणांचा धोकादायक स्तर वाढतो.

आजाराला निमंत्रण

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते फटाक्यामुळे धोकादायक रसायने हवेत मिसळतात. यामुळे दमा रुग्णांचा त्रास बळावतो. श्वसनाचे अनेक आजार वाढतात. धुलिकणांसह ही रसायने शरीरात जातात व त्यामुळे कॅन्सरसारखे घातक आजार वाढण्याचा धोका असतो.

टॅग्स :environmentपर्यावरणair pollutionवायू प्रदूषणpollutionप्रदूषणfire crackerफटाकेDiwaliदिवाळी 2023