शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

India vs Australia : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 सामना नागपुरातून हलविणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 16:52 IST

भारत-ऑस्ट्रेलिया होणारी लढत

नीलेश देशपांडे

नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १ डिसेंबरला विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठास्थित मैदानावर होणारा टी-२० सामना सामना अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकला आहे. कारण व्हीसीएचे मैदान सध्या पाण्याच्या योग्य निचऱ्यासाठी काही ठिकाणी खोदण्यात आले आहे. त्यामुळे जर या कामास अधिक विलंब लागला तर हा सामना रायपूरला स्थलांतरित केला जाऊ शकतो.

व्हीसीएतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कामाचे स्वरुप बघता १ डिसेंबरपर्यंत मैदान पूर्णपणे सुसज्ज करणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे हा सामना रायपूरला हलविला जाण्याचीच जास्त शक्यता आहे. या विषयी व्हीसीएचे सीईओ फारुख दस्तुर यांना विचाराले असता ते म्हणाले, बीसीसीआयकडून आम्हाला अद्यापतरी कुठलीही सूचना प्राप्त झालेली नाही.

दुसरीकडे छत्तीसगड क्रिकेट असोसिएशन आणि पोलिस विभागाला सामन्याची तैयारी सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळते आहे. तसेच सामन्याच्या आयोजनाविषयीची चर्चेची पहिली फेरीही आटोपली असल्याचे सूत्रांच्या हवाल्याने कळाले. विशेष म्हणजे व्हीसीएवर सध्या सुरू असलेल्या कामाचे वृत्त लोकमतने याआधीच प्रकाशित केले होते. त्यावेळी वेळेत काम पूर्ण करण्याचा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला होता.

टॅग्स :nagpurनागपूरVidarbha Cricket Association, Jamthaविदर्भ क्रिकेट असोसिएशन जामठा