शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शाळा-महाविद्यालयांना लागणार का ‘ब्रेक’ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘कोरोना’ नियंत्रणात आल्याने शासनाने शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, आता विदर्भात व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘कोरोना’ नियंत्रणात आल्याने शासनाने शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, आता विदर्भात व विशेषत: नागपुरात परत ‘पॉझिटिव्ह’ची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शाळा-महाविद्यालयांत नावापुरतेच ‘सोशल डिस्टन्सिंग’ व इतर निर्देशांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘कोरोना’चा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी ‘ब्रेक’ मिळणार का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

शासन निर्णयानुसार अगोदर शाळा सुरू करण्यात आल्या. आता तर पाचवीपासूनच्या शाळादेखील सुरू झाल्या असून, वर्गदेखील नियमित होत आहेत. नागपूर जिल्ह्यातील दोन हजार ७८० शाळांमध्ये पाचवी ते दहावीच्या साडेसहा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. त्यातील अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात उपस्थिती लावत आहेत. मात्र, अनेक शाळांत विद्यार्थी ‘मास्क’ लावत नसल्याचे दिसून आले आहे.

दुसरीकडे नागपूर जिल्ह्यात विद्यापीठाशी संलग्नित सुमारे तीनशे महाविद्यालये असून, तेथे लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिले दोन दिवस विद्यार्थ्यांची वर्गखोल्यांतील उपस्थिती संमिश्र राहिली. अनेक महाविद्यालयांत विद्यार्थी आले, मात्र ते वर्गखोलीत न जाता परिसरातच घुटमळत असल्याचे निदर्शनास आले. त्यातही ‘सोशल डिस्टन्सिंग’ वगैरे बाबी जास्त गंभीरतेने पाळल्या जात नसल्याने धोका संभवण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात परत ‘कोरोना’चे आकडे वाढत असताना आता तातडीने उपाययोजना करून शाळा-महाविद्यालयांना ‘ब्रेक’ लावण्यात यावा, अशी मागणी काही पालकांकडून करण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात जिल्हा प्रशासन किंवा विद्यापीठाने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. , जिल्हा प्रशासन पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, सध्या तरी शाळा बंद करण्याचा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठाची भूमिका, जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करणार

शासनाच्या निर्देशांनुसार आम्ही महाविद्यालयांत प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली. जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला अद्याप तात्पुरता ‘ब्रेक’ घेण्याचे कुठलेही निर्देश आलेले नाही. स्थानिक प्रशासनाच्या निर्देशांचेच विद्यापीठ पालन करेल, असे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी स्पष्ट केले.