शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

भाजपशी ‘मॅच फिक्सिंग’ नाही, विदर्भात ‘फिप्टी’ मारूच; नाना पटोले यांचा दावा

By कमलेश वानखेडे | Updated: March 3, 2023 13:33 IST

विदर्भातील शेतकरी, शेतमजूर, लहान उद्योजक, तरुणाई विविध प्रश्नांनी त्रस्त, त्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप अपयशी

नागपूर : मी भाजपशी मॅच फिक्सिंग करणारा नाही, तर भाजप विरोधात ताकदीने लढणारा आहे. नागपूर, अमरावती पाठोपाठ कसब्यातही निकाल दिला आहे. सध्या भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या विदर्भातच भाजपला धक्का देऊ. विधानसभेच्या किमान ५० जागा जिंकून दाखवू, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकमतशी बोलताना केला.

कसबा- चिंचवड निवडणुकीच्या निकालानंतर पटोले लोकमतशी बोलताना म्हणाले, विदर्भ एकेकाळी काँग्रेसचा गड होता. मात्र, काही चुकांमुळे, अंतर्गत गटबाजीमुळे भाजपने आपली पकड मजबूत केली. विदर्भातील शेतकरी, शेतमजूर, लहान उद्योजक, तरुणाई विविध प्रश्नांनी त्रस्त आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप अपयशी ठरली आहे. त्यामुळे नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखे दिग्गज नेते असूनही भाजपचा जनाधार घटला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ, नागपूर शिक्षक मतदारसंघ, अमरावती पदवीधर मतदारसंघात सामान्य कार्यकर्ते मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. भाजपचा गड ढासळण्यास सुरुवात झाली असून लोकसभा व विधानसभेत तो उध्वस्त झालेला दिसेल. भाजपचे मोठमोठे नेते यावेळी पराभूत होतील, असा दावाही पटोले यांनी केला.

येत्या निवडणुकीतही जमिनीवर काम करणाऱ्या सक्षम कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाईल. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या, पक्षाचे कार्यक्रम राबविणारे नेते व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन उमेदवार ठरविले जातील. जनतेचा कलही विचारात घेतला जाईल. मी चुकीचे उद्योग करीत नाही. त्यामुळे माझ्यावर कुणीही ईडी, सिबीआयचा दबाव आणू शकत नाही. मी दबावापुढे झुकणाराही नाही. त्यामुळे भाजप विरोधात ताकदीने लढू व या लढ्यात विदर्भातील जनता तेवढ्याच ताकदीने साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विदर्भात नागपूरसह लोकसभेच्या ७ जागा जिंकणार

- लोकसभा निवडणुकासाठी काँग्रेसने विदर्भात तयारी सुरू केली आहे. गेल्यावेळी राज्यात काँग्रेस एकच जागा जिंकली होती. यावेळी विदर्भात किमान ६ ते ७ जागा जिंकू. नागपुरातही यावेळी काँग्रेसचा झेंडा फडकलेला दिसेल, असा दावाही पटोले यांनी केला.

मार्चनंतर जिल्हानिहाय दौरे, बैठका

- विदर्भ बांधणीचा रोडमॅप तयार आहे. मार्चनंतर विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांचा दौरा केला जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन आढावा घेतला जाईल. स्थानिक पातळीवर असलेले नेत्यांमधील मनभेद दूर करून त्यांना पक्षासाठी एकत्र केले जाईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाVidarbhaविदर्भ