शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

वन्यजीव संरक्षण कायदा शेतकरीविरोधी : रघुनाथदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 9:26 PM

१९५५ साली तयार झालेला वन्यजीव संरक्षण कायदा शेतकरीविरोधी असून तो बदलण्यात यावा. तसेच राज्य शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. याविरोधात ‘लढा शेतकरी हक्काचा’ व महाराष्ट्र सुकाणू समितीच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान पायी चालून विधानसभेवर मोर्चा काढणार असल्याची माहिती शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्दे२४ ला विधानसभेवर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९५५ साली तयार झालेला वन्यजीव संरक्षण कायदा शेतकरीविरोधी असून तो बदलण्यात यावा. तसेच राज्य शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. याविरोधात ‘लढा शेतकरी हक्काचा’ व महाराष्ट्र सुकाणू समितीच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान पायी चालून विधानसभेवर मोर्चा काढणार असल्याची माहिती शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव तालुक्यात टी १ अवनी नामक वाघिणीने धुमाकूळ घालत १३ गरीब आदिवासींचे बळी घेतले. तेथील शेतकरी भीतीच्या सावटाखाली वावरत असल्याने त्या वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्यात आले. मात्र वन्यजीवप्रेमी नावाची जमात त्यावर वादंग माजवत असून, १३ गरीब आदिवासींचे बळी गेले तेव्हा ते कुठे होते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वन्यजीवांचा लळा असणाऱ्यांनी स्वत: गावांमध्ये जाऊन अनुभव घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. राज्यात शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतले जाते. एका वाघाने शेतकऱ्याला ठार केले होते. त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी मोजक्या शिकाऱ्यांना सोबत घेऊन त्या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी आठ दिवस जंगलात तळ ठोकला होता. याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. वन्यजीव संरक्षण कायदा कुचकामी ठरला असून तो कायदा रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. पत्रपरिषदेला जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार, रुद्रा कुचनकार, अरुण वनकर, दिनकर दाभाडे उपस्थित होते.वीज कनेक्शन खंडित करण्याचा आदेश मागेकाही दिवसांपूर्वी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थकीत वीज बिलामुळे कृषिपंपधारकांचे कनेक्शन खंडित करण्याचे आदेश दिले होते. मात्र राज्य शासनाने २० हजार कोटी रुपये दिले; शिवाय न्यायालयानेही शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करता येणार नाही, असा निर्णय दिला. ऊर्जामंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या बाबी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी आपला आदेश मागे घेतला. मात्र शेतकऱ्यांचे सरसकट वीज बिल माफ करावे, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :wildlifeवन्यजीवFarmerशेतकरी