शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये सभागृहाचा आग्रह कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:08 IST

मनपात संक्रमणाचा धोका : ऑनलाइन सभा असली तरी मुख्यालयात गर्दी होणारच लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरात कोरोना ...

मनपात संक्रमणाचा धोका : ऑनलाइन सभा असली तरी मुख्यालयात गर्दी होणारच

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता वाढली आहे. शनिवारी तब्बल २२६१ पॉझिटिव्ह आलेत. संक्रमणाला आळा घालण्यासाठी १५ ते २१ मार्चदरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पुढील काही दिवस बाधितांचा आकडा कमी होण्याची शक्यता नाही. मनपाची यंत्रणा कोविड नियंत्रणाच्या कामात व्यस्त आहे. दुसरीकडे १९ मार्चला मनपाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. सभा ऑनलाइन असली तरी मुख्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी होणारच. यातून संक्रमणाचा धोका आहे. असे असतानाही लॉकडाऊन कालावधीत सभागृहाचा आग्रह कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील वर्षी कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लॉकडाऊन कालावधीत तीन ते चार महिने सभेला परवानगी दिली नव्हती. सध्या अशीच गंभीर परिस्थिती आहे.

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर महिना-दोन महिन्यांनी सभा घेतली तर विकासाला फार मोठा फटका बसेल अशी परिस्थिती नाही. सभा ऑनलाइन असली तरी नेटवर्कमुळे अनेक पदाधिकारी मनपा मुख्यालयात आपल्या कक्षात बसून सभेच्या कामकाजात सहभाग घेतात. तसेही ऑनलाइन सभेत नगरसेवकांना आपल्या प्रभागातील समस्या मांडता येत नाही. नगरसेवक बोलायला लागले की त्यांना म्युट केले जाते. अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत. ऑनलाइन सभेत समस्या मांडता येत नसल्याने ऑफलाइन सभागृह घेण्याला राज्य सरकारने अनुमती द्यावी, यासाठी पक्षनेते अविनाश ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.

ऑनलाइन सभेमुळे मागील काही महिन्यांत सभागृहात नगरसेवकांच्या प्रश्नावर चर्चा झालेली नाही. अनेकदा नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केला की नेटवर्कची समस्या येते. चर्चेत सहभागी होता येत नाही. चुकीच्या निर्णयावर आक्षेप घेता येत नाही. कोविड संक्रमणाचा विस्फोट विचारात घेता सभा पुढे ढकलण्यात यावी. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर सभा घेण्यात यावी, अशी काही नगरसेवकांनी मागणी आहे.

....

काेविड नियंत्रणाऐवजी सभागृहात यंत्रणा व्यस्त

महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा कोविड नियंत्रणात व्यस्त आहे. संक्रमणामुळे प्रशासनावरील ताण वाढला आहे. त्यात सभागृहामुळे यंत्रणा याकामात व्यस्त राहील. अशा परिस्थितीत बाधितांची संख्या आणखी वाढली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.