शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

प्रार्थना ईश्वराची असो की अल्लाची, ती शुभ, पवित्र आणि मंगलच असते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 11:40 IST

तीन पिढ्यांपासून न्यू बाबूळखेड्यात जोपासला जातोय सामाजिक एकोपा व जातीय सलोखा

मंगेश व्यवहारे - राजेश टिकले

नागपूर : मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा यावरून राज्यभरातील वातावरण तापलेले असतानाच नागपुरातील न्यू बाबूळखेड्यात गेल्या तीन पिढ्यांपासून सामाजिक एकोपा व जातीय सलोखा जपला जातोय. येथे हनुमान मंदिर व निजामी मशीद केवळ १०० फुटावर आहे. गेल्या ३५ ते ४० वर्षांत अजानचा त्रास हिंदूंना कधी झाला नाही. मशिदीच्या आवाजाला दाबण्यासाठी भोंग्याचा आवाज मोठा करून हनुमान चालिसा म्हणण्याची गरज पडली नाही. या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मते प्रार्थना ईश्वराची असो की अल्लाची, ती शुभ, मंगल आणि पवित्रच आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली असताना ईदच्या पर्वावर न्यू बाबूळखेडा येथील निजामी मशिदीला भेट दिली. या परिसराला खरे तर मिनी इंडिया म्हणायला काहीच हरकत नाही. मशिदीच्या १०० फुटांवर हनुमान मंदिर, मशिदीच्या अगदी समोर गिरजाघर, थोड्या अंतरावर मैत्री बौद्ध विहार, १०० फुटांच्या अंतरावरच गजानन महाराजांचे मंदिर आणि दक्षिण नागपुरातून निघणारा भव्य साई पालखी सोहळा असे बहुआयामी धार्मिक वातावरण येथे आहे. ईदला ज्या रस्त्यावर हिरव्या पताका लागतात, त्याच रस्त्यावर हनुमान जयंतीच्या भगव्या व आंबेडकर जयंतीच्या निळ्या पताकाही लागतात. पताकांचे रंग वेगवेगळे असले तरी येथील रहिवासी एकमेकांच्या धार्मिक कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. त्यामुळेच गेल्या तीन पिढ्यांपासून येथे कुठलीही जातीय दंगल झाली नाही.

ईदनिमित्त हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. त्यानिमित्त त्यांच्यातील एकोपा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अब्दुल शकील, सैय्यद सादिक अली, अब्दुल रशीद म्हणाले की, पहाटेच्या अजानचा त्रास होतोय, अशी आजपर्यंत कुणाची तक्रार नाही. तर गणेश मिश्रा, चेतन मिश्रा म्हणाले, मशिदीची अजान ही आमच्या दिनचर्येचा भाग झाली आहे. २ मिनिटांच्या अजानचा काय त्रास. वस्तीच्या एकोप्याचे उदाहरण देताना ते म्हणाले ईदनिमित्त पोलीस बंदोबस्त लावला होता. आम्हीच म्हटले आमच्या वस्तीत बंदोबस्ताची गरज नाही. सकाळी उठून आम्हाला एकमेकांसोबतच राहायचे आहे. मशिदीवरील भोंगे काढा म्हणणारा आमचे पोट भरणार नाही.

भागवतात मुस्लिम बांधवांकडे असते नियोजन

गणेश मिश्रा म्हणाले, आमच्याकडे होणाऱ्या भागवत कथा सप्ताहात मुस्लिम बांधवांकडे सर्व नियोजन असते. साऊंड, पेंडॉल, सजावटीचे काम मुस्लिम बांधव सांभाळतात. साई पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत करतात. एकोपा, सर्वधर्म समभाव हे आमच्या वस्तीचे वैशिष्ट्य आहे. धार्मिक सर्वच आहेत, कुणाचेही धर्माबद्दल कट्टर विचार नाहीत.

येथेच जन्मलो, येथेच मरणार

- १९८७ मध्ये ही मशीद बनली. मशिदीच्या सभोवताली हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन लोक राहतात. एकाचीही अजानबद्दल तक्रार आली नाही. उलट वस्तीच्या दिनचर्येची सुरुवात अजानपासून होते, असेही येथील नागरिक म्हणतात. आज ईदलाही आमच्या मौलानांनी समाजात एकोपा, शांतीची प्रार्थना केली. आम्ही येथेच जन्मलो आणि येथेच मरणार आहोत. मग आपल्याच लोकांशी का वादावादी करावी.

दीन मोहंमद, ट्रस्टी, मशीद निजामी

टॅग्स :SocialसामाजिकTempleमंदिरMosqueमशिद