शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

दोन गंगा जोडायला १ लाख कोटी रुपये कुठून येणार? केंद्राच्या साठ टक्के निधीवर भिस्त

By shrimant mane | Updated: April 2, 2026 18:20 IST

Nagpur : पहिली प्रशासकीय मान्यता मिळताना वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा अंदाजखर्च ९४ हजार ९३७कोटी ६६ लाख रुपये आहे. इतका मोठा निधी राज्य सरकार कसा उभा करणार, पीपीपी मॉडेलनुसार खासगी गुंतवणूक येणार का, ती आली तर तिच्या परताव्याचे काय, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे राहिले आहेत.

श्रीमंत माने लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पहिली प्रशासकीय मान्यता मिळताना वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा अंदाजखर्च ९४ हजार ९३७कोटी ६६ लाख रुपये आहे. इतका मोठा निधी राज्य सरकार कसा उभा करणार, पीपीपी मॉडेलनुसार खासगी गुंतवणूक येणार का, ती आली तर तिच्या परताव्याचे काय, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे राहिले आहेत. रस्ते बांधणी किंवा अन्य पायाभूत प्रकल्पासारखी खासगी गुंतवणूक पाटबंधारे प्रकल्पात शक्य नसल्याने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत हा प्रकल्प समाविष्ट करून केंद्र सरकारकडून ६० टक्के निधी मिळवायचा, राज्याने उरलेल्या ४० टक्क्यांचा भार उचलायचा, असा पर्याय या प्रश्नांच्या उत्तरात समोर आला आहे.

या नदीजोड प्रकल्पाचा अंदाजखर्च, तो निधी उभा करण्याचे पर्याय व अन्य मुद्द्यांवर जलसंपदा खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'लोकमत'ला सांगितले की, रस्ते किंवा इतर प्रकल्पांमध्ये जशी खासगी गुंतवणुकीच्या परताव्याची हमी गुंतवणूकदारांना असते, तसे पाटबंधारे प्रकल्पांबाबत नाही.

शेती, पिण्यासाठी व उद्योगांसाठी पाणी असा वापर लक्षात घेता, शेतकरी, सामान्य नागरिक व उद्योग हे धरणे व नदीजोडचे लाभार्थी असल्याने हा परतावा त्यांच्याकडून कसा वसूल करायचा, हा प्रश्न आहे. पाण्याचे दरही खूप कमी आहेत. परिणामी, मोठ्या खर्चाच्या प्रकल्पांमधील खासगी गुंतवणुकीला मर्यादा आहेत.

त्यामुळे सरकारलाच हा खर्च करावा लागणार आहे. वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाच्या प्रशासकीय नदीजोड मान्यतेच्या प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरणाने जलसंपदा खात्याला निधीची तरतूद तसेच या प्रकल्पामुळे राज्यात सिंचनाचा अनुशेष व प्रादेशिक असमतोल निर्माण होईल का, अशा मुद्यांवर विचारणा केली होती. उत्तरात जलसंपदा खात्याने स्पष्ट केले की, सिंचनाच्या दृष्टीने पिछाडीवर असलेल्या विदर्भ, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत केंद्र व राज्याचा ६०:४० असा वाटा ठरलेला आहे.

त्यानुसार वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी केंद्र सरकारचे साठ टक्के (५६,९८२ कोटी रुपये) अर्थसाहाय्य उपलब्ध होईल आणि राज्य सरकार ४० टक्के, म्हणजे ३७ हजार ९८७ कोटींचा वाटा उचलेल. प्रकल्पाचा कालावधी दहा वर्षे असल्याने दरवर्षी ३,७९९ कोटी लागतील, ही रक्कम दिसायला छोटी असली तरी 'लाडकी बहीण' सारख्या लोकानुयायी योजना, कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शनवरील खर्च आदी कारणांमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या राज्य सरकारला दरवर्षी अशी तरतूद करण्यासाठी विशेष इच्छाशक्ती दाखवावी लागणार, हे नक्की.

जुन्या अनुशेषाचा तिढा, नव्याची अनाठायी भीती

चार लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतजमीन ओलिताखाली आणणाऱ्या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे राज्यात नवा सिंचन अनुशेष व प्रादेशिक असमतोल तयार होईल का, हा मुद्दा प्रशासकीय मान्यतेपूर्वीच चर्चिला गेला. त्यावर जलसंपदा विभागाने जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे युक्तिवाद केला की, जून २०२५ पर्यंत अकोला-वाशिम व बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये १९९४ साली मोजलेला अनुक्रमे १४ हजार ५३० हेक्टर व २९ हजार ५ हेक्टर अनुशेष अजूनही शिल्लक आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातही ६ हजार १९८ हेक्टरचा अनुशेष आहे. १९९४ नंतर राज्यात सिंचन अनुशेष मोजलाच गेलेला नाही. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विदर्भाच्या सिंचन टक्केवारीत साधारणपणे १२ टक्के इतकी वाढ होईल. परंतु त्यानंतरही पेरणीलायक क्षेत्राच्या तुलनेत उर्वरित महाराष्ट्रापेक्षा विदर्भातील सिंचन क्षमता टक्केवारी कमीच राहील. अर्थात, या प्रकल्पामुळे विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर होईल. नवा प्रादेशिक असमतोल निर्माण होणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Funding for River Link: ₹1 Lakh Crore Questioned, Reliance on Centre.

Web Summary : ₹1 lakh crore needed for the Wainganga-Nalganga river link project. The state eyes central funding (60%) under PM Krishi Sinchayee Yojana, facing challenges in allocating its 40% share amidst financial constraints. Project aims to address Vidarbha's irrigation deficit without creating regional imbalance.
टॅग्स :nagpurनागपूरGovernmentसरकारgovernment schemeसरकारी योजना