शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

‘एनओसी’ मिळाली, निकालांचे काय?

By admin | Updated: July 14, 2016 03:03 IST

राज्य शासनाच्या ‘नाहरकत’ प्रमाणपत्राच्या गोंधळामध्ये शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

नागपूर विद्यापीठ : शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाचे हिवाळी निकाल प्रलंबित योगेश पांडे नागपूर राज्य शासनाच्या ‘नाहरकत’ प्रमाणपत्राच्या गोंधळामध्ये शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. गेल्या वर्षीच्या हिवाळी परीक्षांचे निकाल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्याप जाहीर केलेले नाही. विशेष म्हणजे २०१५-१६ या वर्षासाठी महाविद्यालयांना या आठवड्यातच ‘नाहरकत’ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. अशास्थितीत हिवाळी निकाल जाहीर होणार कधी, विद्यार्थी उन्हाळी परीक्षा देणार कधी आणि नवे सत्र सुरू होणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांचे नियमन करणाऱ्या ‘एनसीटीई’ने (नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन) देशभरात लागू केलेल्या नव्या निकषांनुसार ‘बीएड’ अभ्यासक्रम २०१५-१६ पासून दोन वर्षांचा करण्यात आला आहे. महाविद्यालयांनी २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांतर्गत केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले व विद्यापीठाकडे नामांकन क्रमांकासाठी अर्जदेखील केले. परंतु महाविद्यालयांनी राज्य शासनाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रियाच केली नाही. असे करणे महाविद्यालयांना अनिवार्य होते. अखेर विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांकडून अहवाल मागविले व संबंधित प्रस्ताव अहवाल राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाकडे आॅक्टोबर महिन्यात पाठविला. त्यानंतर विभागीय सहसंचालक डॉ. अंजली रहाटगावकर यांनी तज्ज्ञमंडळींच्या सहकार्याने नागपूर विभागातील २०९ महाविद्यालयांची तपासणी केली व केवळ सहा महाविद्यालयांनीच नियमांची पूर्तता केल्याचा अहवाल शासनाला सादर केला होता. त्यानंतर राज्य शासनाने ‘नाहरकत’ प्रमाणपत्राच्या मुद्यावर मौन साधले होते. तांत्रिक मुद्यावरून पुढे अडचण येऊ नये यासाठी नागपूर विद्यापीठाने ‘बीएड’, ‘एमएड’, ‘बीपीएड’, ‘एमपीएड’ या अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्र परीक्षा दोनवेळा पुढे ढकलल्या होत्या.