शहरं
Join us  
Trending Stories
1
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
2
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
3
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
4
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
5
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
6
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
7
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
8
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
9
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
10
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
11
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
12
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
13
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
14
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
15
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
16
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
17
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
18
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
19
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
20
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव

‘एनओसी’ मिळाली, निकालांचे काय?

By admin | Updated: July 14, 2016 03:03 IST

राज्य शासनाच्या ‘नाहरकत’ प्रमाणपत्राच्या गोंधळामध्ये शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

नागपूर विद्यापीठ : शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाचे हिवाळी निकाल प्रलंबित योगेश पांडे नागपूर राज्य शासनाच्या ‘नाहरकत’ प्रमाणपत्राच्या गोंधळामध्ये शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. गेल्या वर्षीच्या हिवाळी परीक्षांचे निकाल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्याप जाहीर केलेले नाही. विशेष म्हणजे २०१५-१६ या वर्षासाठी महाविद्यालयांना या आठवड्यातच ‘नाहरकत’ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. अशास्थितीत हिवाळी निकाल जाहीर होणार कधी, विद्यार्थी उन्हाळी परीक्षा देणार कधी आणि नवे सत्र सुरू होणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांचे नियमन करणाऱ्या ‘एनसीटीई’ने (नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन) देशभरात लागू केलेल्या नव्या निकषांनुसार ‘बीएड’ अभ्यासक्रम २०१५-१६ पासून दोन वर्षांचा करण्यात आला आहे. महाविद्यालयांनी २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांतर्गत केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले व विद्यापीठाकडे नामांकन क्रमांकासाठी अर्जदेखील केले. परंतु महाविद्यालयांनी राज्य शासनाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रियाच केली नाही. असे करणे महाविद्यालयांना अनिवार्य होते. अखेर विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांकडून अहवाल मागविले व संबंधित प्रस्ताव अहवाल राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाकडे आॅक्टोबर महिन्यात पाठविला. त्यानंतर विभागीय सहसंचालक डॉ. अंजली रहाटगावकर यांनी तज्ज्ञमंडळींच्या सहकार्याने नागपूर विभागातील २०९ महाविद्यालयांची तपासणी केली व केवळ सहा महाविद्यालयांनीच नियमांची पूर्तता केल्याचा अहवाल शासनाला सादर केला होता. त्यानंतर राज्य शासनाने ‘नाहरकत’ प्रमाणपत्राच्या मुद्यावर मौन साधले होते. तांत्रिक मुद्यावरून पुढे अडचण येऊ नये यासाठी नागपूर विद्यापीठाने ‘बीएड’, ‘एमएड’, ‘बीपीएड’, ‘एमपीएड’ या अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्र परीक्षा दोनवेळा पुढे ढकलल्या होत्या.