शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
4
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
5
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
6
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
7
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
8
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
9
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
10
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
11
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
12
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
13
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
14
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
15
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
16
कष्टाचं फळ! २६ व्या वर्षी रोज १८ तासांची ड्युटी करून तरुणीने घेतलं तब्बल ७ कोटींचं घर
17
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
18
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
19
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
20
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील तरुणाईला झाले तरी काय?

By admin | Updated: July 16, 2015 02:57 IST

बदलत्या काळाप्रमाणे समाजव्यवस्थेतदेखील मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहे.

ज्येष्ठ नागरिकांसोबत गैरवर्तनात वाढ : ‘हेल्प एज इंडिया’ने समोर आणले जळजळीत वास्तवयोगेश पांडे नागपूरबदलत्या काळाप्रमाणे समाजव्यवस्थेतदेखील मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन घेऊन उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्याचे दिवस आता मागे पडत चालले आहे. विकासाच्या दिशेने अग्रेसर होत असलेल्या नागपूर शहरातील तरुणाईची वागणूक मात्र विरुद्ध दिशेने सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांशी उर्मट वर्तन करुन अपमान करण्यात तरुणाई सर्वात जास्त आघाडीवर आहेत. ज्येष्ठ नागरिकांशी गैरवर्तन करणाऱ्यांमध्ये ३९ टक्के व्यक्ती या १८ ते २४ या वयोगटातील आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे ‘टीनएजर्स’चे प्रमाणदेखील वाढत असल्याची बाब समोर आली आहे. ‘हेल्प एज इंडिया’ या सामाजिक संस्थेच्या २०१५ च्या अहवालातून हे जळजळीत वास्तव समोर आले आहे.ज्येष्ठांवर होणारा अन्याय व त्यांची छळवणूक यासंदर्भात संस्थेकडून देशभरात सर्वेक्षण करण्यात आले. देशातील २५ ते ४५ वयोगटातील तरुणांशी संवाद साधून दिल्ली, बंगळूरु , मदुराई, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, नागपूर, कानपूर, अहमदाबाद आणि मुंबई या १० शहरांमध्ये सर्वेक्षण केले. यानंतर तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार नागपुरातील ज्येष्ठ नागरिकांशी गैरवर्तन करणाऱ्यांमध्ये १८ ते ३४ या वयोगटातील एकूण ७३.४ टक्के तरुणांचा समावेश आहे. १८ वर्षांखालील ‘टीनएजर्स’चे प्रमाण १९.५ टक्के असून ही बाब नक्कीच चिंतीत करणारी आहे.सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन वाढीसजेष्ठ नागरिकांसोबत घरांमध्ये गैरवर्तन करण्यात येतेच. परंतु सार्वजनिक ठिकाणीदेखील त्यांच्याशी उर्मटपणे बोलून किंवा शिवीगाळ करुन त्यांचा अपमान करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. अहवालानुसार छळवणूक सहन करावी लागणाऱ्या जेष्ठ नागरिकांपैकी ४७.५ जणांना घरातूनच त्रास होतो. तर ३१.५ टक्के जेष्ठ नागरिकांना घराबाहेर पडल्यावरदेखील पावलोपावली अपमानाला सामोरे जावे लागत आहे.एकत्र कुटुंबपद्धती आवश्यकजेष्ठ नागरिकांची होणारी छळवणूक थांबविण्यासाठी एकत्र कुटुंबपद्धती आवश्यक असल्याचे नागपुरातील ९०.७ टक्के तरुणांचे मत आहे. शिवाय कुटुंबातून यासंदर्भात पुढाकार घेऊन जेष्ठ नागरिकांना मानाचे स्थान देण्याची आवश्यकता आहे. ही स्थिती सुधारायची असेल तर जेष्ठांच्या सल्ल्यांना महत्त्व द्यावे असे मत २३.५ टक्के तरुणांनी व्यक्त केले आहे. तर एकत्र जेवण घेतल्याने अनेक समस्या दूर होऊ शकतात असे २२.५ टक्के तरुणांचे मानणे आहे.