शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

पावसाचा रेड, ऑरेंज, ग्रीन, येलो अलर्ट म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:35 IST

अति जोरदार पाऊस म्हणजे? : अत्याधिक जोरदार पाऊस म्हणजे काय?

सुनील चरपेनागपूर : भारतीय हवामान विभाग हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी चार वेगवेगळ्या रंगांच्या कोडचा वापर करतात. यामध्ये ऑरेंज, ग्रीन, येलो आणि रेड अशा रंगांचा वापर होतो. हे अलर्ट नेमके कशासाठी वापरले जातात? त्यांचा अर्थ काय?

रेड अलर्ट : जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार, अतिवृष्टी किंवा ढगफुटीचा अंदाज असतो, अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता. त्यामुळे नागरिकांना घरी राहण्याच्या सूचना दिल्या जातात. पूर, भूस्खलन यासह तत्सम नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्ट जारी केला जातो. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावे व धोकादायक भागात जाऊ नये, असा असतो. कारण नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्या भागातील प्रशासनाला आपत्ती निवारणासाठी तयार राहण्याचे संकेत रेड अलर्टमधून मिळतात. एखाद्या जिल्ह्यातील हवामान विभागाच्या निश्चित केलेल्या केंद्रांपैकी बहुतांश केंद्रांच्या परिसरात अत्यंत जोरदार, अति जोरदार किंवा जोरदार पाऊस पडणार असेल तर त्या जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला जातो. प्रत्यक्षात पाऊस घाटमाथ्यावर पडणार असला तरी संपूर्ण जिल्ह्याला रेड अलर्ट दिला जातो.

ऑरेंज अलर्ट : मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट म्हणजे आपत्ती येऊ शकते. नागरिक व प्रशासन सतर्क असावे यासाठी हा अलर्ट दिला जातो. ऑरेंज अलर्टचा अर्थ असा की, अशा भागांमध्ये कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा नागरिकांनाही आवश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जातात. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. हवामान विभागाने निश्चित केलेल्या केंद्रांपैकी काही केंद्रांच्या परिसरात अत्यंत जोरदार, अति जोरदार किंवा जोरदार पावसाची शक्यता असते, तेव्हा त्या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला जातो.

येलो अलर्ट : हवामान बदलामुळे पुढील काही दिवसांमध्ये संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाल्यास हवामान खात्याकडून अनेक शहरांना येलो अलर्ट दिला जातो. म्हणजेच संबंधित शहरांमध्ये नैसर्गिक संकटाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने सर्वांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या जातात. हवामान विभागाच्या निश्चित केलेल्या केंद्रांपैकी तुरळक केंद्रांच्या परिसरात पाऊस पडणार असेल तर त्या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिला जातो. तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार, अति जोरदार किंवा जोरदार पाऊस होऊ शकतो.

ग्रीन अलर्ट : पावसाळ्यात अनेक भागांमध्ये ग्रीन अलर्ट असतो. याचा अर्थ की, संबंधित शहरांमध्ये पावसाची परिस्थिती सामान्य असेल, त्यावेळी कुठलेही निबंध घालण्याची गरज नसते.

पावसाच्या अंदाजाचे महत्त्वाचे शब्दअति हलका पाऊस - ०.१ ते २.४ मिमी.हलका पाऊस - २.५ ते १५.५ मिमी.मध्यम पाऊस - १५.६ ते ६४.४ मिमी.जोरदार पाऊस - ६४.५ ते ११५.५ मिमी.अति जोरदार पाऊस - ११५.६ ते २०४.४ मिमी.अत्याधिक जोरदार पाऊस - २०४.५ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त.

अत्याधिक जोरदार पाऊस म्हणजे काय?अत्यंत जोरदार पावसाचा अंदाज म्हणजे त्या जिल्ह्यात २४ तासांत २०४.४ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला किंवा होणार असेल तर त्याला हवामान विभाग अत्याधिक जोरदार पाऊस म्हणजेच 'एक्सट्रीमली हेवी रेन' ही संज्ञा वापरते. या प्रमाणात देशात खूपच कमी ठिकाणी पाऊस होतो. 

अति जोरदार पाऊस म्हणजे?

  • अति जोरदार पाऊस म्हणजे ११५.६ ते २०४.४ मिमी पाऊस. ज्या भागात या दरम्यान पाऊस झाला किंवा होणार आहे, तेथे हवामान विभाग अति जोरदार पावसाचा अंदाज देतो. हवामान विभाग याला अति जोरदार पाऊस म्हणजेच 'व्हेरी हेवी रेन' संबोधते.
  • जोरदार पाऊस म्हणजे काय? (अंदाज 3 देताना जोरदार पाऊस (Heavy Rain) असा उल्लेख हवामान विभागाद्वारे केला जातो.
  • एखाद्या भागात ६४.५ ते ११५.५ मिमी पावसाची शक्यता असेल, तर हवामान विभाग जोरदार पाऊस म्हणजेच 'हेवी रेन'चा इशारा देते. अंदाज देताना हवामान विभाग मध्यम पाऊस म्हणजेच 'मॉडरेट रेन' असा उल्लेख करते. १५.६ मिमीपेक्षा कमी पावसाला हलका पाऊस असे संबोधले जाते.
टॅग्स :monsoonमोसमी पाऊसweatherहवामान अंदाजnagpurनागपूर