शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

नागपुरात विहिरीने घेतले तीन मजुरांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:08 IST

एम्प्रेस सिटीच्या परिसरातील बेसमेंटमध्ये असलेल्या विहिरीत साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या तीन मजुरांचा करुण अंत झाला. शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देविषारी वायुमुळे गुदमरल्याचा अंदाजएम्प्रेस सिटीच्या परिसरात दुर्घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एम्प्रेस सिटीच्या परिसरातील बेसमेंटमध्ये असलेल्या विहिरीत साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या तीन मजुरांचा करुण अंत झाला. शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. चंद्रशेखर बारापात्रे (वय ४०), अजय मारोती गारूडी (वय ४६, रा. लाडपुरा तांडापेठ) आणि दीपक महादेव गवसे (वय ४५, रा. सुगतनगर, जरीपटका) अशी मृताची नावे आहेत. विहिरीतील विषारी वायूनेच त्यांचा गुदरमून मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.एम्प्रेस सिटी परिसरात एकाबाजुला एक अशा बहुमजली ईमारती आहेत. या ईमारतीत बेसमेंटमध्ये पाण्यासाठी विहीरी खोदण्यात आल्या आहेत. गांधीसागर तलावाच्या बाजुने या ईमारतीकडे जाण्याचे प्रवेशद्वार आहे. त्यातीलच एक विहिर अनेक दिवसांपासून वापरात नसल्याने तिची साफसफाई करण्यासाठी दुपारी बारापात्रे, गारोडे आणि गवते तसेच अन्य काहींना बोलवून घेण्यात आले. दुपारी ४ च्या सुमारास मजुरांपैकी एक जण दोराने ईलेक्ट्रीक मोटर काढण्यासाठी उतरला. मात्र, गुदरमल्याने तो विहिरीत पडला. विहिर १२ फुट खोल असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे खाली पडलेल्याच्या मदतीला दुसरा मजूर उतरला. मात्र, त्यालाही गुदमरल्यासारखे झाल्याने तो अर्ध्यावरच तडफडू लागला आणि तोसुद्धा पाण्यात पडला. आपले दोन मित्र विहिरीत पडल्याने वर उभे असलेल्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे चौकीदारासह बाजुची मंडळी धावून आली. त्यांनी अग्निशमन दल तसेच पोलिसांना फोन करून माहिती कळवली. दुसरीकडे आपले सहकारी तडफडत असल्याचे पाहून अस्वस्थ झालेल्या तिस-या मजुराने त्यांना वर काढण्यासाठी विहिरीत उतरण्याचा धोका पत्करला. तो विहिरीत उतरला अन् तोदेखिल पाण्यात पडून तडफडू लागला. या प्रकारामुळे विहिरीत विषारी वायू असल्याचे लक्षात आल्याने वर उभे असलेल्यांनी आरडाओरड केली.दरम्यान, अग्निशमन दल आणि गणेशपेठ पोलिसांचे पथक तेथे पोहचले. त्यांनी तिघांनाही बाहेर काढले. त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मृतदेह मेयोत रवाना करण्यात आले.हलगर्जीपणामुळे घडली घटनाही दुर्घटना देखरेखीत हलगर्जीपणा केल्यामुळेच घडल्याचा अंदाज पोलीस प्रशासनाने बांधला आहे. तर, अवघ्या १२ फुटाच्या विहीरीत एवढ्या तीव्रतेचा विषारी वायू निर्माण झाल्याने अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी राजेंद्र उचके यांनीही लोकमतशी बोलताना आश्चर्य व्यक्त केले. ब-याच दिवसांपासून विहिरीची साफसफाई झाली नाही. आजुबाजुच्या सिवरेज लाईन लिकेज झाल्या असाव्या, त्यातील वायू विहिरीत जमा झाल्याने विहिरीतील विषारी वायूची तीव्रता वाढली असावी, असा अंदाजही उचके यांनी व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गणेशपेठ पोलिसांनी रात्रीपर्यंत अनेकांचे बयाण नोंदवून घेतले. मृत तीनही व्यक्ती अत्यंत गरिब परिवाराचे प्रमूख होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी आणि या दुर्घटनेला ज्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे, त्या दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी घटनास्थळी जमलेल्या नागरिकांकडून केली जात होती.दीपक होता कुटुंबाचा आधारसुगतनगरातील दीपक गवसे गेल्या काही वर्षांपासून एम्प्रेस सिटीच्या पाणी पुरवठा विभागात ईलेक्ट्रीशियन म्हणून देखभालीचे काम करीत होता. त्याच्या परिवारात पत्नी, १५ वर्षांची मुलगी निधी आणि १४ वर्षांचा मुलगा पलाश आहे. तो आठवीत असून, निधीने नुकतीच दहावीची परिक्षा दिली आहे. कुटुंबात तो एकमात्र कमावता व्यक्ती होता. तोच अशा पद्धतीने गेल्यामुळे आता या परिवारावर उपासमारीची पाळी आली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर