शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

चांगली जडणघडण होईल तेथेच मुलाचे कल्याण; हायकोर्टाचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 7:00 AM

Nagpur news आरोग्य, शिक्षण, बौद्धिक विकास, व्यक्तिमत्त्व घडवणारे वातावरण, आपुलकीची भावना, प्रेम या बाबी ज्या ठिकाणी मिळू शकतात, तेथेच मुलाचे खरे कल्याण आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त करून जन्मदात्या पालकांना मुलाचा ताबा देण्यास नकार दिला.

ठळक मुद्देजन्मदात्या पालकांना ताबा देण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : आरोग्य, शिक्षण, बौद्धिक विकास, व्यक्तिमत्त्व घडवणारे वातावरण, आपुलकीची भावना, प्रेम या बाबी ज्या ठिकाणी मिळू शकतात, तेथेच मुलाचे खरे कल्याण आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त करून जन्मदात्या पालकांना मुलाचा ताबा देण्यास नकार दिला. तसेच, त्या मुलाचा ताबा दत्तक घेणाऱ्या पालकांकडेच कायम ठेवण्यात आला.

न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व ॲड. नितीन सूर्यवंशी यांनी हा निर्णय दिला. दोन कुटुंबातील वादामुळे लग्न होऊनही एकत्र राहू न शकलेल्या अनवर व हसीना (बदललेली नावे) या दाम्पत्याने ३० ऑगस्ट २०१४ रोजी मुलाला जन्म दिला. त्यानंतर हसीना मुलाला घेऊन माहेरी गेली. मुलाला कावीळ झाला होता. त्याची प्रकृती खालावली होती. हसीनाच्या पालकांकडे त्या मुलावर चांगल्या रुग्णालयात उपचार करण्यासाठी पैसे नव्हते तसेच, हसीनाची मानसिक स्थिती बिघडली होती. त्यामुळे त्या मुलाला तो पाच दिवसाचा असताना सधन व सुसंस्कृत अन्सारी दाम्पत्याने दत्तक घेतले. त्या मुलावर अडीच लाख रुपये खर्च करून चांगल्या रुग्णालयात उपचार केले. तो मुलगा आता सहा वर्षांचा झाला आहे. दरम्यान, अनवर व हसीनाने दत्तक करार अवैध असल्याचा दावा करून, त्या मुलाचा ताबा मिळविण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुलाचे सर्वांगीण हित लक्षात घेता ती याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयानेही विविध बाबी लक्षात घेता, कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून अपील खारीज केले. अन्सारी दाम्पत्याच्या वतीने ॲड. मसुद शरीफ व ॲड. आदिल मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

-तर मुलावर मानसिक आघात

मुलाची जडणघडण अत्यंत चांगल्या वातावरणात होत आहे. मुलगा आता सहा वर्षांचा झाला आहे. त्याने अन्सारी दाम्पत्याला स्वत:चे माता-पिता मानले आहे. त्याचे मानसिक व भावनिक धागे अन्सारी दाम्पत्यासोबत घट्ट बांधले गेले आहेत. अन्सारी दाम्पत्य मुलाला सर्व बाबतीत सर्वोत्तम जीवन प्रदान करण्यास सक्षम आहेत. मुलाचे त्यांच्यासोबत राहण्यातच कल्याण आहे. जन्मदात्याकडे ताबा दिल्यास मुलावर प्रचंड मानसिक आघात होईल, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने निर्णयात नोंदविले. अनवरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्याचे घर टिनाचे आहे. त्याला दुसऱ्या पत्नीपासून असलेल्या दोन मुली शाळेत जात नाहीत. हसीनावर मानसिक उपचार सुरू आहेत. अन्सारी दाम्पत्याकडे मुलाचा ताबा कायम ठेवताना या बाबीही विचारात घेण्यात आल्या.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय