शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजार बंद, भाज्यांचे भाव उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:06 IST

नागपूर : वाढत्या कोरोना रुग्णामुळे शहरातील आठवडी बाजाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा बाजार बंद झाल्याने अनेकांचा रोजगार ...

नागपूर : वाढत्या कोरोना रुग्णामुळे शहरातील आठवडी बाजाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा बाजार बंद झाल्याने अनेकांचा रोजगार हिरावला असून सुरू करण्याची किरकोळ भाजी विक्रेत्यांची मागणी आहे.

मनपा प्रशासनाने आठवडी बाजार भरविण्यास बंदी घातल्याने भाज्यांच्या विक्रीत घसरण झाली आहे. स्थानिक उत्पादकांकडून आवक वाढली, पण विक्री कमी असल्याने भाव उतरले आहेत. किरकोळ विक्रेते गल्लीबोळात ठेल्यावर फिरून विक्री करताना दिसत आहेत. भाव मिळत नसल्याने अनेक विक्रेते चारचाकी वाहनांवर चौकाचौकात भाज्यांची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. कमी भावामुळे उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शहरातील आठवडी बाजार सुरू करण्याची विक्रेत्यांची मागणी आहे. पण वाढत्या रुग्ण संख्येमुळे मनपा प्रशासनाने मनाई केली आहे. सध्या कळमना भाजी बाजार आणि कॉटन मार्केट बाजारात भाज्यांची आवक पूर्वीपेक्षा दुपटीवर गेली आहे. दोन्ही बाजार सकाळी ९ पर्यंत सुरू राहात असल्याने विक्री कमी झाली आहे. याशिवाय कोरोना रुग्णांचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याने दोन्ही बाजारात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. याच कारणांनी गेल्यावर्षी दोन्ही बाजार मनपा आयुक्तांनी बंद करून मैदानात बाजार सुरू केले होते. हीच स्थिती सध्या उद्भवली असून रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास दोन्ही बाजार बंद होतील, अशी भीती ठोक भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली.

आठवडी बाजार बंद असल्यामुळे फूलकोबी, पत्ता कोबी, पालक, मेथी, टोमॅटो आदींचे भाव उतरले आहेत. फूलकोबी व पत्ता कोबी १० रुपये, पालक ५ रुपये, मेथी १० रुपये, टोमॅटो ५ ते १० रुपये, कोथिंबीर १० रुपये, हिरवी मिरची १० रुपये किलो भाव आहेत. याशिवाय कळमना बाजारातही कांदे, बटाटे आणि लसणाचे भाव कमी झाले आहेत. विक्रीत घसरण झाल्याने दररोज ३० ते ४० टक्के माल पडून राहत आहे. मात्र, दररोज आवक तेवढीच आहे. त्यामुळे माल कुठे साठवून ठेवायचा, असा प्रश्न ठोक विक्रेते आणि अडतिया यांच्यासमोर उभा राहिला आहे. कळमना बाजारात पांढरे कांदे १० ते १२ रुपये किलो, लाल कांदे १२ ते १३ रुपये, बटाटे ९ ते ११ रुपये आणि लसूण ६० ते ७० रुपये किलो भाव आहेत. भाव कमी असले तरीही किरकोळमध्ये दुपटीत विकल्या जात आहेत.