शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आम्ही कुणालाही मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट करत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 17:51 IST

Nagpur : काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट 

नागपूर : महाविकास आघाडी एकत्र म्हणून निवडणूक लढणार आहे. जागावाटपबाबत दोनदा चर्चा झालेल्या आहेत. लवकरच पुन्हा एक बैठक होईल. मुख्यमंत्री कोण असेल हे निवडणुकीनंतर एकत्रितपणे ठरवू. आम्ही कोणालाही मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट करत नाही, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.गुरुवारी नागपुरात आले असला चेन्नीथला पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आमच्यात कुठलेही मतभेद नाही. सर्वांना घेऊन चालू, आघाडी धर्म पाळू. महाराष्ट्र ही काँग्रेसचे भूमी आहे. त्यामुळे जास्त जागा लढण्यासाठी मागू, असा युक्तिवादही त्यांनी केला. अजित पवार यांनी भलेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भात माफी मागितली असेल, मात्र महाराष्ट्रची प्रतिमा डागाळली. पुतळा कोणी बनवला, त्याचा पक्षाशी काय संबंध आहे, ही दुर्घटना कशी झाली, असे प्रश्न उपस्थित करीत महाराष्ट्राचा जो अपमान झाला त्यावर केवळ माफी मागून होणार नाही, कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. पुतळा पडला, जनतेचा पैसा गेला. देवेंद्र फडणवीस यांनी हे कोणी केले ते पाहून त्यावर कारवाई का झाली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

बदलापूरच्या घटनेवर राष्ट्रपतींनी व्यक्त व्हावेकोलकाता सोबतच महाराष्ट्राच्या बदलापूर येथील घटनेवरही राष्ट्रपतींनी व्यक्त व्हायला पाहिजे. राष्ट्रपती या देशाच्या आहेत, केवळ कोलकाताच्या नाहीत. त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीही बघायला पाहिजे, अशा शब्दात चेन्नीथला यांनी नाराजी व्यक्त केली.

प्रत्येक पक्ष आपापले बोलतो : बाळासाहेब थोरातउद्धव सेनेचे नेते खा. संजय राऊत हे मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांना प्रोजेक्ट करीत आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असता काँग्रेसचे गटनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, प्रत्येक पक्ष आपापले बोलत असतो. आमचे कार्यकर्ते आमचे कोणाचे नाव घेत असतील तर त्यात आश्चर्य मानण्याचे कारण नाही. मविआच्या दोन बैठका झाल्या आहेत. जागा वाटपाचा प्रश्न लवकरच सोडवू, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे काम सुरू आहे. महायुती सरकार घाबरले आहे. सरकारी खर्चाने प्रचार चालला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभाChief Ministerमुख्यमंत्रीnagpurनागपूर