शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

आम्ही कुणालाही मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट करत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 17:51 IST

Nagpur : काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट 

नागपूर : महाविकास आघाडी एकत्र म्हणून निवडणूक लढणार आहे. जागावाटपबाबत दोनदा चर्चा झालेल्या आहेत. लवकरच पुन्हा एक बैठक होईल. मुख्यमंत्री कोण असेल हे निवडणुकीनंतर एकत्रितपणे ठरवू. आम्ही कोणालाही मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट करत नाही, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.गुरुवारी नागपुरात आले असला चेन्नीथला पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आमच्यात कुठलेही मतभेद नाही. सर्वांना घेऊन चालू, आघाडी धर्म पाळू. महाराष्ट्र ही काँग्रेसचे भूमी आहे. त्यामुळे जास्त जागा लढण्यासाठी मागू, असा युक्तिवादही त्यांनी केला. अजित पवार यांनी भलेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भात माफी मागितली असेल, मात्र महाराष्ट्रची प्रतिमा डागाळली. पुतळा कोणी बनवला, त्याचा पक्षाशी काय संबंध आहे, ही दुर्घटना कशी झाली, असे प्रश्न उपस्थित करीत महाराष्ट्राचा जो अपमान झाला त्यावर केवळ माफी मागून होणार नाही, कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. पुतळा पडला, जनतेचा पैसा गेला. देवेंद्र फडणवीस यांनी हे कोणी केले ते पाहून त्यावर कारवाई का झाली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

बदलापूरच्या घटनेवर राष्ट्रपतींनी व्यक्त व्हावेकोलकाता सोबतच महाराष्ट्राच्या बदलापूर येथील घटनेवरही राष्ट्रपतींनी व्यक्त व्हायला पाहिजे. राष्ट्रपती या देशाच्या आहेत, केवळ कोलकाताच्या नाहीत. त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीही बघायला पाहिजे, अशा शब्दात चेन्नीथला यांनी नाराजी व्यक्त केली.

प्रत्येक पक्ष आपापले बोलतो : बाळासाहेब थोरातउद्धव सेनेचे नेते खा. संजय राऊत हे मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांना प्रोजेक्ट करीत आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असता काँग्रेसचे गटनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, प्रत्येक पक्ष आपापले बोलत असतो. आमचे कार्यकर्ते आमचे कोणाचे नाव घेत असतील तर त्यात आश्चर्य मानण्याचे कारण नाही. मविआच्या दोन बैठका झाल्या आहेत. जागा वाटपाचा प्रश्न लवकरच सोडवू, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे काम सुरू आहे. महायुती सरकार घाबरले आहे. सरकारी खर्चाने प्रचार चालला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभाChief Ministerमुख्यमंत्रीnagpurनागपूर