शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

वीरमातेने पुढे चालविले शहीद मुलाचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 11:51 IST

भारतीय लष्करात कॅप्टन पदावर असणाऱ्या जेमतेम २६ वर्षाच्या विनायकला सर्जिकल स्ट्राईकमध्ये वीरमरण आले. सर्वस्व गमावल्याच्या भावनेने अनेक दिवस भान हरपल्यासारखे गेले. पण त्याचा मृत्यू सामान्य नाही तर हा सर्वोच्च त्याग आहे, ही भावना मूळ धरू लागली.

ठळक मुद्देगप्पांमधून उलगडला वेगळ्या वाटेवरचा प्रवास सप्तकचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय लष्करात कॅप्टन पदावर असणाऱ्या जेमतेम २६ वर्षाच्या विनायकला सर्जिकल स्ट्राईकमध्ये वीरमरण आले. सर्वस्व गमावल्याच्या भावनेने अनेक दिवस भान हरपल्यासारखे गेले. पण त्याचा मृत्यू सामान्य नाही तर हा सर्वोच्च त्याग आहे, ही भावना मूळ धरू लागली. विनायक सुट्यांवर आला की शाळा महाविद्यालयात जाऊन युवकांना लष्करात येण्याचे आवाहन करीत असे. विनायकचे हे कार्य त्याच्या मृत्यूनंतर आई अनुराधा गोरे यांचे ध्येय बनले. या वीरमातेने हजारो शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना लष्कराविषयी माहिती दिली. आयुष्याला वेगळी दिशा देणारा हा प्रवास त्यांनी ‘वेगळ्या वाटा’ या कार्यक्रमात उलगडला.सामान्य आयुष्य जगत असताना अचानक एखादी गोष्ट, घटना आयुष्याला वेगळ्या वळणावर नेणारी ठरते. मात्र हा बदल सकारात्मकतेने स्वीकारत काही माणसे या वेगळ्या वाटेवरही यशाची उंची गाठतात. अशी गुणशील व धैर्यशील माणसे आपल्या अवतीभवती असतात. त्यांचे कार्यकर्तृत्व जेवढे चकीत करणारे, तेवढेच नतमस्तकही करणारे असते. अशा ध्येयशील व्यक्तिमत्त्वांच्या जीवनाचा वेध घेणाऱ्या मुलाखतींचा ‘वेगळ्या वाटा’ हा कार्यक्रम सप्तक व छाया दीक्षित फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला. कवी कुलगुरू कालिदास सभागृह, आयटी पार्क येथे आयोजित कार्यक्रमाची निर्मिती व सूत्रसंचालन रेणुका देशकर यांचे होते. यामध्ये वीरमाता अनुराधा गोरे यांच्यासह ज्येष्ठ न्यायवैद्यकशास्त्रज्ञ डॉ. वसुधा आपटे व मराठी खाद्यपदार्थांचे हॉटेल ‘पूर्णब्रह्म’चे संचालकद्वय जयंती कठाळे व मनीष शिरासाव यांनी त्यांच्या वेगळ्या वाटेवरचा प्रवास उलगडला. अनुराधा गोरे यांनी ‘वारस हो अभिमन्यूचे’, ‘शौर्य’ आणि ‘सियाचिन’ या गाजलेल्या पुस्तकांसह भाषणे, वृत्तपत्र स्तंभलेखनातून अपंग जवानांच्या यशोगाथा शब्दबद्ध केल्या.वीरांच्या कुटुंबाचा अभ्यास करून तो समाजापर्यंत मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. प्रत्येकाने आधी देशाचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.रमाबाई रानडे यांच्या पणती असलेल्या डॉ. वसुधा आपटे यांनी न्यायवैद्यकशास्त्राचा अभ्यासक्रम निवडत मृतदेहांनाही न्याय मिळवून देण्याची वाट स्वीकारली. अपघात, बलात्कार, खून झालेल्या मृतदेहांची शल्यचिकित्सा करताना भीती किंवा किळस मनात बाळगण्यापेक्षा मानवसेवेच्या भावनेतून हे कार्य स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. बंगळूरू येथे असलेले जगातील एकमेव मराठी रेस्टारेंटचे संचालकद्वय जयंती कठाळे व मनीष शिरासाव यांनी मराठी खाद्यपदार्थांची चव सातासमुद्रापलीकडे पोहचविण्याचा प्रवास मुलाखतीदरम्यान मांडला. सप्तकचे डॉ. उदय गुप्ते, विलास मानेकर व लीलाताई दीक्षित यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिक