शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

वीरमातेने पुढे चालविले शहीद मुलाचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 11:51 IST

भारतीय लष्करात कॅप्टन पदावर असणाऱ्या जेमतेम २६ वर्षाच्या विनायकला सर्जिकल स्ट्राईकमध्ये वीरमरण आले. सर्वस्व गमावल्याच्या भावनेने अनेक दिवस भान हरपल्यासारखे गेले. पण त्याचा मृत्यू सामान्य नाही तर हा सर्वोच्च त्याग आहे, ही भावना मूळ धरू लागली.

ठळक मुद्देगप्पांमधून उलगडला वेगळ्या वाटेवरचा प्रवास सप्तकचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय लष्करात कॅप्टन पदावर असणाऱ्या जेमतेम २६ वर्षाच्या विनायकला सर्जिकल स्ट्राईकमध्ये वीरमरण आले. सर्वस्व गमावल्याच्या भावनेने अनेक दिवस भान हरपल्यासारखे गेले. पण त्याचा मृत्यू सामान्य नाही तर हा सर्वोच्च त्याग आहे, ही भावना मूळ धरू लागली. विनायक सुट्यांवर आला की शाळा महाविद्यालयात जाऊन युवकांना लष्करात येण्याचे आवाहन करीत असे. विनायकचे हे कार्य त्याच्या मृत्यूनंतर आई अनुराधा गोरे यांचे ध्येय बनले. या वीरमातेने हजारो शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना लष्कराविषयी माहिती दिली. आयुष्याला वेगळी दिशा देणारा हा प्रवास त्यांनी ‘वेगळ्या वाटा’ या कार्यक्रमात उलगडला.सामान्य आयुष्य जगत असताना अचानक एखादी गोष्ट, घटना आयुष्याला वेगळ्या वळणावर नेणारी ठरते. मात्र हा बदल सकारात्मकतेने स्वीकारत काही माणसे या वेगळ्या वाटेवरही यशाची उंची गाठतात. अशी गुणशील व धैर्यशील माणसे आपल्या अवतीभवती असतात. त्यांचे कार्यकर्तृत्व जेवढे चकीत करणारे, तेवढेच नतमस्तकही करणारे असते. अशा ध्येयशील व्यक्तिमत्त्वांच्या जीवनाचा वेध घेणाऱ्या मुलाखतींचा ‘वेगळ्या वाटा’ हा कार्यक्रम सप्तक व छाया दीक्षित फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला. कवी कुलगुरू कालिदास सभागृह, आयटी पार्क येथे आयोजित कार्यक्रमाची निर्मिती व सूत्रसंचालन रेणुका देशकर यांचे होते. यामध्ये वीरमाता अनुराधा गोरे यांच्यासह ज्येष्ठ न्यायवैद्यकशास्त्रज्ञ डॉ. वसुधा आपटे व मराठी खाद्यपदार्थांचे हॉटेल ‘पूर्णब्रह्म’चे संचालकद्वय जयंती कठाळे व मनीष शिरासाव यांनी त्यांच्या वेगळ्या वाटेवरचा प्रवास उलगडला. अनुराधा गोरे यांनी ‘वारस हो अभिमन्यूचे’, ‘शौर्य’ आणि ‘सियाचिन’ या गाजलेल्या पुस्तकांसह भाषणे, वृत्तपत्र स्तंभलेखनातून अपंग जवानांच्या यशोगाथा शब्दबद्ध केल्या.वीरांच्या कुटुंबाचा अभ्यास करून तो समाजापर्यंत मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. प्रत्येकाने आधी देशाचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.रमाबाई रानडे यांच्या पणती असलेल्या डॉ. वसुधा आपटे यांनी न्यायवैद्यकशास्त्राचा अभ्यासक्रम निवडत मृतदेहांनाही न्याय मिळवून देण्याची वाट स्वीकारली. अपघात, बलात्कार, खून झालेल्या मृतदेहांची शल्यचिकित्सा करताना भीती किंवा किळस मनात बाळगण्यापेक्षा मानवसेवेच्या भावनेतून हे कार्य स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. बंगळूरू येथे असलेले जगातील एकमेव मराठी रेस्टारेंटचे संचालकद्वय जयंती कठाळे व मनीष शिरासाव यांनी मराठी खाद्यपदार्थांची चव सातासमुद्रापलीकडे पोहचविण्याचा प्रवास मुलाखतीदरम्यान मांडला. सप्तकचे डॉ. उदय गुप्ते, विलास मानेकर व लीलाताई दीक्षित यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिक