शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

वीरमातेने पुढे चालविले शहीद मुलाचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 11:51 IST

भारतीय लष्करात कॅप्टन पदावर असणाऱ्या जेमतेम २६ वर्षाच्या विनायकला सर्जिकल स्ट्राईकमध्ये वीरमरण आले. सर्वस्व गमावल्याच्या भावनेने अनेक दिवस भान हरपल्यासारखे गेले. पण त्याचा मृत्यू सामान्य नाही तर हा सर्वोच्च त्याग आहे, ही भावना मूळ धरू लागली.

ठळक मुद्देगप्पांमधून उलगडला वेगळ्या वाटेवरचा प्रवास सप्तकचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय लष्करात कॅप्टन पदावर असणाऱ्या जेमतेम २६ वर्षाच्या विनायकला सर्जिकल स्ट्राईकमध्ये वीरमरण आले. सर्वस्व गमावल्याच्या भावनेने अनेक दिवस भान हरपल्यासारखे गेले. पण त्याचा मृत्यू सामान्य नाही तर हा सर्वोच्च त्याग आहे, ही भावना मूळ धरू लागली. विनायक सुट्यांवर आला की शाळा महाविद्यालयात जाऊन युवकांना लष्करात येण्याचे आवाहन करीत असे. विनायकचे हे कार्य त्याच्या मृत्यूनंतर आई अनुराधा गोरे यांचे ध्येय बनले. या वीरमातेने हजारो शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना लष्कराविषयी माहिती दिली. आयुष्याला वेगळी दिशा देणारा हा प्रवास त्यांनी ‘वेगळ्या वाटा’ या कार्यक्रमात उलगडला.सामान्य आयुष्य जगत असताना अचानक एखादी गोष्ट, घटना आयुष्याला वेगळ्या वळणावर नेणारी ठरते. मात्र हा बदल सकारात्मकतेने स्वीकारत काही माणसे या वेगळ्या वाटेवरही यशाची उंची गाठतात. अशी गुणशील व धैर्यशील माणसे आपल्या अवतीभवती असतात. त्यांचे कार्यकर्तृत्व जेवढे चकीत करणारे, तेवढेच नतमस्तकही करणारे असते. अशा ध्येयशील व्यक्तिमत्त्वांच्या जीवनाचा वेध घेणाऱ्या मुलाखतींचा ‘वेगळ्या वाटा’ हा कार्यक्रम सप्तक व छाया दीक्षित फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला. कवी कुलगुरू कालिदास सभागृह, आयटी पार्क येथे आयोजित कार्यक्रमाची निर्मिती व सूत्रसंचालन रेणुका देशकर यांचे होते. यामध्ये वीरमाता अनुराधा गोरे यांच्यासह ज्येष्ठ न्यायवैद्यकशास्त्रज्ञ डॉ. वसुधा आपटे व मराठी खाद्यपदार्थांचे हॉटेल ‘पूर्णब्रह्म’चे संचालकद्वय जयंती कठाळे व मनीष शिरासाव यांनी त्यांच्या वेगळ्या वाटेवरचा प्रवास उलगडला. अनुराधा गोरे यांनी ‘वारस हो अभिमन्यूचे’, ‘शौर्य’ आणि ‘सियाचिन’ या गाजलेल्या पुस्तकांसह भाषणे, वृत्तपत्र स्तंभलेखनातून अपंग जवानांच्या यशोगाथा शब्दबद्ध केल्या.वीरांच्या कुटुंबाचा अभ्यास करून तो समाजापर्यंत मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. प्रत्येकाने आधी देशाचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.रमाबाई रानडे यांच्या पणती असलेल्या डॉ. वसुधा आपटे यांनी न्यायवैद्यकशास्त्राचा अभ्यासक्रम निवडत मृतदेहांनाही न्याय मिळवून देण्याची वाट स्वीकारली. अपघात, बलात्कार, खून झालेल्या मृतदेहांची शल्यचिकित्सा करताना भीती किंवा किळस मनात बाळगण्यापेक्षा मानवसेवेच्या भावनेतून हे कार्य स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. बंगळूरू येथे असलेले जगातील एकमेव मराठी रेस्टारेंटचे संचालकद्वय जयंती कठाळे व मनीष शिरासाव यांनी मराठी खाद्यपदार्थांची चव सातासमुद्रापलीकडे पोहचविण्याचा प्रवास मुलाखतीदरम्यान मांडला. सप्तकचे डॉ. उदय गुप्ते, विलास मानेकर व लीलाताई दीक्षित यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिक