शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

वर्धा गर्भपात प्रकरण; अखेर आराेग्य विभागाचे चौकशी पथक आर्वीत; दीड तासाच्या अंतरावर ६० तासांनंतर पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2022 07:10 IST

Wardha News आर्वी येथील गर्भपात प्रकरणात ‘लोकमत’ने जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या संशयास्पद भूमिकेवर बोट ठेवल्याने राज्याच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, शनिवारी वर्धा येथील आरोग्य विभागाचे चौकशी पथक आर्वीत दाखल झाले.

नरेश डोंगरे

नागपूर : आर्वी येथील गर्भपात प्रकरणात ‘लोकमत’ने जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या संशयास्पद भूमिकेवर बोट ठेवल्याने राज्याच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, शनिवारी वर्धा येथील आरोग्य विभागाचे चौकशी पथक आर्वीत दाखल झाले.

तेरा वर्षांच्या मुलीचा गर्भपात केल्यानंतर तिच्या पोटात उठलेल्या वेदनांमुळे या संतापजनक प्रकरणाचा बोभाटा झाला. आर्वी पोलिसांनी या प्रकरणात ११ जानेवारीला डॉ. रेखा कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर जिल्हा आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांची भूमिका चर्चेला आली. पोलीस तपासात काही संशयास्पद मुद्दे अधोरेखित झाल्याने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी १२ जानेवारीला जिल्हा शल्य चिकित्सकांना फोन करून या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आणि चौकशीला सहकार्य करण्यासाठी विनंती केली.

मात्र, दुसरा दिवस उजाडला तरी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पोलीस विभागाला रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी १३ जानेवारीला जिल्हा शल्य चिकित्सकांना एक पत्र पाठविले. त्यात या गंभीर गर्भपात प्रकरणाचा उल्लेख करून 'तुम्ही चौकशी करावी. काही जप्त करायचे असेल तर ते करावे आणि पोलीस विभागाला अहवाल तसेच तक्रार द्यायची की काय, त्याचा निर्णय घ्यावा, असे कळविण्यात आले. या पत्रालाही जिल्हा शल्य चिकित्सकांकडून तातडीने प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान, १४ जानेवारीला ‘लोकमत’ने आर्वी शहरात जाऊन या प्रकरणाची पाळेमुळे खोदण्याचा प्रयत्न केला. त्यातून डॉ. कदम हॉस्पिटलमधील पापात जिल्हा आरोग्य यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे पुढे आले. तसे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारी, १५ जानेवारीच्या अंकात ठळकपणे प्रकाशित केले. यामुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली.

वरिष्ठ पातळीवरून यासंदर्भात संबंधितांना विचारपूस सुरू झाल्यामुळे 'मौनीबाबा'च्या भूमिकेत असलेल्या जिल्हा आरोग्य यंत्रणेने हालचाल सुरू केली. या पार्श्वभूमीवर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संगीता भिसे यांनी गर्भपात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी १५ जानेवारीला एक चौकशी पथक आर्वी शहरात पाठविले. या पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क केल्यानंतर पोलिसांनी तात्पुरते सील केलेले कदम हॉस्पिटल उघडून दिले.

वृत्त लिहिस्तोवर या पथकाची चौकशी हॉस्पिटलमध्ये सुरू होती. त्यांनी कोणती चौकशी केली, काय जप्त केले, त्याचा खुलासा वृत्त लिहिस्तोवर होऊ शकला नाही. वर्धा शहरातून आर्वीला पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त दीड तासाचा कालावधी लागतो. पोलिसांनी तोंडी व लेखी सूचना देऊनही चौकशी पथकाला तेथे पोहोचण्यासाठी तब्बल ६० तासांचा कालावधी लागला. जिल्हा आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठांनी ही चौकशी समिती पाठविण्यासाठी एवढा प्रदीर्घ वेळ का घेतला, ते कळण्यास मार्ग नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी