शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...

By योगेश पांडे | Updated: June 10, 2024 21:54 IST

'आता देशाच्या समस्या सोडविण्याचा विचार करा, वर्षभरापासून धगधगणाऱ्या मणिपूरकडे लक्ष द्या.'

नागपूर: निवडणूक ही लोकशाहीतील नियमित प्रक्रिया आहे. त्यात स्पर्धा असली तरी मर्याचा आवश्यक असते. निवडणूकीच्या प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन झाले. आता निवडणूक संपली असून सर्वच पक्षांनी देशातील समस्यांना सोडविण्यावर विचार केला पाहिजे, या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी नागपुरातून सर्वच राजकीय पक्ष व नेत्यांचे कान टोचले. संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयच्या समारोपप्रसंगी ते बोलत होता.रेशीमबाग येथील मैदानावर आयोजित कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगरच्या श्री क्षेत्र गोदावरी धामचे पीठाधीश महंत रामगिरीजी महाराज, वर्गाचे सर्वाधिकारी इक्बालसिंग, प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, महानगर संघचालक राजेश लोया प्रामुख्याने उपस्थित होते.

निवडणूकीचे निकाल आले व सरकारदेखील स्थापन झाले. मात्र जे झाले ते का झाले याची चर्चा सुरू आहे. आपल्या देशात दर पाच वर्षांनी होणारी ही घटना आहे. दर निवडणूकीत मतदानवाढीचा आम्ही प्रयत्न करतो. मात्र निकाल असेच का आले याची चर्चा करत नाही. निवडणूक युद्ध नसून स्पर्धा आहे. त्यात मर्यादा असायला हवी. असत्याचा उपयोग करणे योग्य नाही. ज्यापद्धतीने प्रचारात टीका झाली. समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. विनाकारण संघासारख्या संघटनांनादेखील यात खेचण्यात आले. तंत्रज्ञानाची मदत घेऊन असत्य बाबी पसरविण्यात आल्या. संसदेत जाऊन देश चालविणे हे सर्व पक्षांचे ध्येय असले पाहिजे. सहमती बनवून देश चालवायला हवा.

तीच आपल्या देशाची परंपरा आहे. समाजातील दोन्ही बाजू समोर यावा यासाठी संसद असते. सत्ताधारी व विरोधक वेगवेगळ्या पैलूंवर विचार करतात. मुळात विरोधी नव्हे तर प्रतिपक्ष हा योग्य शब्द असून तेदेखील त्यांचा पैलू संसदेत मांडत असतात. त्याचादेखील विचार व्हायला हवा, असे सरसंघचालक म्हणाले. जो मर्यादेचे पालन करतो त्याच्यात अहंकार येत नाही व तोच खरा सेवक असतो, असे म्हणत सरसंघचालकांनी भाजप नेत्यांना अप्रत्यक्षपणे चिमटा काढला. सनातन संस्कृतीला नष्ट करण्याचे प्रयत्न बाहेरून आलेल्या तत्वांकडून झाले. मात्र संतपरंपरा व समर्पण भावाने कार्य करणाऱ्यांमुळे भारतीय संस्कृती अबाधित आहे. एका वर्गाला क्षुद्र म्हणत त्रास देण्यात आला. आता ही चूक सुधारण्याची वेळ आली आहे असे मत महंत रामगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.

आव्हाने संपलेली नाही, कामाला लागामागील दहा वर्षांत बरेच काही चांगले झाले. आर्थिक स्थिती चांगली झाली आहे. सामरीक स्थिती निश्चितपणे चांगली आहे. जगभरात देशाची प्रतिष्ठा वाढली आहे. कला, क्रीडा, संस्कृती, ज्ञान-विज्ञानमध्ये देश मार्गक्रमण करत आहे. केंद्रात रालोआचेच सरकार परत आले असले तरी देशासमोरील आव्हाने संपलेली नाहीत. निवडणूकीच्या उत्साहात जो अतिरेक झाला त्यापासून दूर जात समस्यांवर चर्चा व्हायला हवी, असे सरसंघचालकांनी प्रतिपादन केले.

मणिपूरवर विचार कराविकासाचे मापदंड रचण्यासाठी देशात शांती हवी. अशांतीने देश चालत नाही. मणिपूर एका वर्षापासून पेटतो आहे. जुने गनकल्चर बंद झाले असे वाटत होते. मात्र द्वेषाचे वातावरण निर्माण केल्याने मणिपूरमध्ये त्राही त्राही झाली आहे. आता तरी त्या स्थितीचा विचार व्हायला हवा, असे सरसंघचालकांनी सुनावले.

सरसंघचालकांचे महत्त्वाचे बिंदू- यावर्षी हिलस्टेशनवरदेखील गरमी जाणवली. अनेक महानगरांमध्ये पाण्याचे संकट जाणवले. पर्यावरणाचे संकट वाढत आहे. भारत संस्कारांतून पर्यावरणाचा मित्र असल्याचे मानतो.- ज्ञान-विज्ञानाचा आधुनिक गोष्टी व कालसुसंगत प्राचीन ज्ञान यांना सोबत आणत कार्य झाले पाहिजे.- सर्वांनी एकत्रित होऊन चालायला हवे. आपापल्या पूजांवर श्रद्धा ठेवून इतरांच्या पुजापद्धतीचे सन्मान करायला हवा.- इस्लाम, ईसाईयत काय आहे त्याचा विचार करावा लागेल. कालप्रवाहात आलेल्या विकृती हटवाव्या लागतील.- देशात कायद्याचे पालन व्हायला हवे. लाल सिग्नलवर वाहन थांबविलेच पाहिजे.- काम करा, मात्र मी केला हा अहंकार बाळगू नका.

समाजाने अस्पृश्यता हटविण्यावर भर द्यावाया संस्कृतीच्या रितीला विसरलो तेव्हापासून आपले पतन झाले. आपण आपल्याच भावंडांना अस्पृश्य म्हणत बाजुला ठेवले. त्याला वेद, उपनिषद यांचा आधार नाही. काही स्वार्थी लोकांनी रचलेले ते जाळे आहे. अस्पृष्यता भेदभाव कालबाह्य आहे. समाजात एकता हवी. समाजात अन्याय झाल्याने एकमेकांबद्दल द्वेष व अविश्वास आहे. अस्पृश्यता हटविण्यावर समाजाने भर द्यावा, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर