शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

युद्धप्रसंगी विदर्भ बनेल देशाच्या संरक्षणाचा मजबूत स्तंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:28 IST

शस्त्रांसह तज्ज्ञांच्या सहकार्यापर्यंत प्रत्येक मोर्चावर सज्ज : भारत-पाक युद्धाच्या शक्यतेत विदर्भाची सक्रियता

फहीम खान लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता वाढली असताना, देशाला आपली लष्करी ताकद मजबूत करण्याची आवश्यकता आहे. अशावेळी विदर्भ एक मजबूत आधारस्तंभ म्हणून उदयास येत आहे. हा प्रदेश केवळ शस्त्रास्त्र कारखान्यांच्या रूपात देशाला दारूगोळाच पुरविणार नाही, तर येथील संरक्षण संस्था, तज्ज्ञ आणि लष्करी कार्यालये युद्धाच्या प्रत्येक आघाडीवर सैन्यासोबत खांद्याला खांदा लावून उभी राहतील. वायुसेनेचे एअर मार्शल विभास पांडे (निवृत्त) यांनी 'लोकमत'शी खास संवाद साधताना विदर्भाच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. 

दारूगोळ्याची राजधानी : विदर्भातील शस्त्र कारखाने सेनेची ताकदविदर्भात भारत सरकारचे अंबाझरी (नागपूर), भंडारा, भद्रावती (चंद्रपूर) आणि पुलगाव (वर्धा) हे चार प्रमुख शस्त्र निर्मिती कारखाने आहेत. युद्धाच्या काळात, भारतीय सैन्याला आवश्यक असलेला दारूगोळा आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा अखंडित असेल. या कारखान्यांमधील चांगल्या समन्वयामुळे उत्पादन आणि पुरवठ्याचा वेग वाढेल. युद्धादरम्यान, या कारखान्यांमधून मिळणाऱ्या साहित्यामुळे सैनिकांची ताकद आणखी वाढेल.

हवाई सुरक्षा : नागपूरस्थित वायुसेना मेंटेनन्स कमांड पूर्णपणे सज्जभारतीय हवाई दलाचे मेंटेनन्स कमांड मुख्यालय नागपूर येथे आहे. अनेक बेस रिपेअर डेपो (बीआरडी) आणि इक्विपमेंट डेपो (ईडी) या अंतर्गत येतात. येथून, विमाने, हेलिकॉप्टर आणि इतर विमान शस्त्रांच्या दुरुस्ती आणि देखभालीत गुंतलेल्या तज्ज्ञांच्या टीम युद्धादरम्यान थेट युद्धभूमीवर जाऊन काम करतील. एअर मार्शल (निवृत्त) विभास पांडे यांच्या मतें, यामुळे सपोर्ट फोर्सची ऑपरेशनल क्षमता दुप्पट होईल.

भूदल ताकद : नागपूरचे उपक्षेत्र कार्यालय आणि गाईस रेजिमेंट सेंटरनागपूरला नुकतेच स्थानांतरित झालेले उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातचे उपक्षेत्र कार्यालयदेखील युद्धादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावेल. या भागातील सर्व लष्करी उपक्रम या कार्यालयातून चालवले जातील. त्याचवेळी, कामठी येथील गाईस रेजिमेंट सेंटरमध्ये प्रशिक्षित सैनिकांची तुकडी कोणत्याही परिस्थितीत युद्धासाठी सज्ज असेल.

खासगी उद्योगांचीही युद्धात भूमिकाया राष्ट्रीय आपत्तीत विदर्भातील सोलर इंडस्ट्री आणि इतर खासगी संरक्षण उद्योगही मागे राहणार नाहीत. त्यांचे तांत्रिक समर्थन, नवोन्मेष आणि उत्पादन क्षमता संरक्षण क्षेत्रासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. तज्ज्ञांच्या मते, या कठीण काळात विदर्भाची देशभक्ती आणि तांत्रिक क्षमता राष्ट्राला बळकटी देईल.

विदर्भ मागे राहणार नाही, समोरून नेतृत्व करेलभारत-पाकिस्तान युद्ध झाल्यास, जेव्हा संपूर्ण देश सीमेवर एकजूट होईल, तेव्हा विदर्भकेवळ मागून पाठिंबा देऊनच नव्हे तर तांत्रिक, औद्योगिक आणि धोरणात्मक पातळीवर नेतृत्व करून भारतीय सैन्याचा विश्वासार्ह भागीदार असल्याचे सिद्ध करेल. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरVidarbhaविदर्भwarयुद्धnagpurनागपूरPakistanपाकिस्तान