शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
4
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
5
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
6
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
7
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
8
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
9
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
10
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
11
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
12
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
13
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
14
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
15
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
16
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
17
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
18
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
19
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
20
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम

युद्धप्रसंगी विदर्भ बनेल देशाच्या संरक्षणाचा मजबूत स्तंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:28 IST

शस्त्रांसह तज्ज्ञांच्या सहकार्यापर्यंत प्रत्येक मोर्चावर सज्ज : भारत-पाक युद्धाच्या शक्यतेत विदर्भाची सक्रियता

फहीम खान लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता वाढली असताना, देशाला आपली लष्करी ताकद मजबूत करण्याची आवश्यकता आहे. अशावेळी विदर्भ एक मजबूत आधारस्तंभ म्हणून उदयास येत आहे. हा प्रदेश केवळ शस्त्रास्त्र कारखान्यांच्या रूपात देशाला दारूगोळाच पुरविणार नाही, तर येथील संरक्षण संस्था, तज्ज्ञ आणि लष्करी कार्यालये युद्धाच्या प्रत्येक आघाडीवर सैन्यासोबत खांद्याला खांदा लावून उभी राहतील. वायुसेनेचे एअर मार्शल विभास पांडे (निवृत्त) यांनी 'लोकमत'शी खास संवाद साधताना विदर्भाच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. 

दारूगोळ्याची राजधानी : विदर्भातील शस्त्र कारखाने सेनेची ताकदविदर्भात भारत सरकारचे अंबाझरी (नागपूर), भंडारा, भद्रावती (चंद्रपूर) आणि पुलगाव (वर्धा) हे चार प्रमुख शस्त्र निर्मिती कारखाने आहेत. युद्धाच्या काळात, भारतीय सैन्याला आवश्यक असलेला दारूगोळा आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा अखंडित असेल. या कारखान्यांमधील चांगल्या समन्वयामुळे उत्पादन आणि पुरवठ्याचा वेग वाढेल. युद्धादरम्यान, या कारखान्यांमधून मिळणाऱ्या साहित्यामुळे सैनिकांची ताकद आणखी वाढेल.

हवाई सुरक्षा : नागपूरस्थित वायुसेना मेंटेनन्स कमांड पूर्णपणे सज्जभारतीय हवाई दलाचे मेंटेनन्स कमांड मुख्यालय नागपूर येथे आहे. अनेक बेस रिपेअर डेपो (बीआरडी) आणि इक्विपमेंट डेपो (ईडी) या अंतर्गत येतात. येथून, विमाने, हेलिकॉप्टर आणि इतर विमान शस्त्रांच्या दुरुस्ती आणि देखभालीत गुंतलेल्या तज्ज्ञांच्या टीम युद्धादरम्यान थेट युद्धभूमीवर जाऊन काम करतील. एअर मार्शल (निवृत्त) विभास पांडे यांच्या मतें, यामुळे सपोर्ट फोर्सची ऑपरेशनल क्षमता दुप्पट होईल.

भूदल ताकद : नागपूरचे उपक्षेत्र कार्यालय आणि गाईस रेजिमेंट सेंटरनागपूरला नुकतेच स्थानांतरित झालेले उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातचे उपक्षेत्र कार्यालयदेखील युद्धादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावेल. या भागातील सर्व लष्करी उपक्रम या कार्यालयातून चालवले जातील. त्याचवेळी, कामठी येथील गाईस रेजिमेंट सेंटरमध्ये प्रशिक्षित सैनिकांची तुकडी कोणत्याही परिस्थितीत युद्धासाठी सज्ज असेल.

खासगी उद्योगांचीही युद्धात भूमिकाया राष्ट्रीय आपत्तीत विदर्भातील सोलर इंडस्ट्री आणि इतर खासगी संरक्षण उद्योगही मागे राहणार नाहीत. त्यांचे तांत्रिक समर्थन, नवोन्मेष आणि उत्पादन क्षमता संरक्षण क्षेत्रासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. तज्ज्ञांच्या मते, या कठीण काळात विदर्भाची देशभक्ती आणि तांत्रिक क्षमता राष्ट्राला बळकटी देईल.

विदर्भ मागे राहणार नाही, समोरून नेतृत्व करेलभारत-पाकिस्तान युद्ध झाल्यास, जेव्हा संपूर्ण देश सीमेवर एकजूट होईल, तेव्हा विदर्भकेवळ मागून पाठिंबा देऊनच नव्हे तर तांत्रिक, औद्योगिक आणि धोरणात्मक पातळीवर नेतृत्व करून भारतीय सैन्याचा विश्वासार्ह भागीदार असल्याचे सिद्ध करेल. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरVidarbhaविदर्भwarयुद्धnagpurनागपूरPakistanपाकिस्तान