शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ साहित्यिक आशाताई सावदेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 13:05 IST

Nagpur news; ज्येष्ठ साहित्यिक आशाताई सावदेकर यांचे आज सकाळी निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक आशा सावदेकर यांचे येथे गुरूवारी सकाळी निधन झाले. त्या ७२ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा आश्विन सावदेकर आहे. तो अमेरिकेत डेनव्हर येथे राहतो.आशा सावदेकर यांना गेल्या दोन-तीन वर्षांपासून विस्मरण झाले होते. तेव्हापासून त्या सोनेगाव एचबी ईस्टेट परिसरातील विहिनीसोबत राहात होत्या. त्यांच्या देखभालीसाठी एक केअरटेकर ठेवली होती. सावदेकर यांच्यावर वैयक्तिक आपत्ती कोसळल्या. मुलगी अपर्णा दासगुप्ता हीचे हृदयविकाराने निधन झाल्यानंतर त्या मानसिकरीत्या खूप खचल्या होत्या. पती अरविंद सावदेकर यांचे आठ दहा वर्षापूर्वी निधन झाले. आशाताईंना औषध तसेच श्वास घेण्याचेही विस्मरण होत होतं. त्यांचे वैद्यकीय देखभाल त्याचे स्नेही डाक्टर निखिल करीत होते. सावदेकर यांची कोरोना चाचणी व्हायची होती. डाक्टर निखिल हेच अंत्यसंस्कार करतील असे कौटुंबिक स्नेही आशा बगे यांनी सांगितले. त्यांचा नातु मुंबई येथे शिकत आहे.डॉ.आशा सावदेकर मूळच्या नागपूरच्या असून त्यांचे माहेरचे नाव आशा गजानन भवाळकर आहे. नागपूर येथील भिडे कन्याशाळेत त्यांचे माध्यमिक शिक्षण, तर तिथल्याच नागपूर महाविद्यालयातून त्या १९६८ साली बी.ए. व १९७० साली एम.ए.(मराठी) झाल्या. १९७५ साली त्यांना पीएच.डी. ही पदवी मिळाली. ‘कविवर्य भा.रा.तांबे यांच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. पुढे १९७९ साली पुस्तकरूपाने तो प्रसिद्ध झाल्यावर साक्षेपी समीक्षक म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली.

मराठी साहित्यावर ज्यांचा महत्त्वपूर्ण प्रभाव पडलेला आहे, अशा अनेक नामवंत प्रतिभावान साहित्यिकांच्या लेखनाची त्यांनी चिकित्सक समीक्षा केली आहे. त्यांमध्ये कथाकार पु.भा.भावे, कादंबरीकार ना.सी.फडके, कवी ज.के.उपाध्ये इत्यादींचा समावेश असून या संदर्भातील त्यांची ‘पु.भा.भावे: साहित्यवेध’ (१९८९), ‘भारतीय साहित्याचे शिल्पकार: ना.सी.फडके’ (१९९५), ‘मुशाफिरी’ (२०००) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

त्यांचा काव्याचा व्यासंग आणि अभ्यास मोठा असून ‘मुशाफिरी’ या नावाने मराठी कवितेची समीक्षा करणारा त्यांचा ग्रंथ २००० साली प्रकाशित झाला आहे. जयकृष्ण केशव उपाध्ये हे विदर्भातील एक मान्यवर कवी होत. त्यांची कविता आशाताईंनी अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह संपादित केली आहे (१९८५).

त्यांचे कविताविषयक महत्त्वाचे संपादन म्हणजे ‘कविता विदर्भाची’ (१९९१). या ग्रंथात त्यांनी विदर्भातील निवडक कवींच्या वैशिष्ट्यपूर्ण कवितांचे संकलन केले आहे. डॉ.वि.वा.प्रभुदेसाईंच्या सहकार्याने ‘आजचे मराठी साहित्य’ हा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे. त्यांचे अनेक समीक्षात्मक लेख वाङ्मयविषयक विविध नियतकालिकांमधून सातत्याने प्रसिद्ध होत असतात. त्या स्वतः ‘युगवाणी’ या विदर्भ साहित्य संघाच्या मुखपत्राच्या संपादक (१९८६-१९८९) होत्या. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा अंक क्र.२५०मध्ये (जुलै-सप्टेंबर१९८९) त्यांनी ‘कवी यशवंत: एक आकलन’ या लेखातून यशवंतांच्या कवितेचा परामर्श घेतला आहे. जवळपास ३० वर्षे त्यांनी समीक्षक म्हणून मान्यता मिळविली असली तरी ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ (१९७७) ही एक कादंबरी त्यांच्या नावावर आहे. विदर्भातील ख्यातनाम कवींचा परिचय त्यांनी एका लेखमालेतून करून दिला आहे. त्यांची समीक्षा वस्तुस्थितिनिदर्शक, तरीही आस्वादक आहे

टॅग्स :Deathमृत्यू