शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

सावरकरांच्या नावाचा वापर हे निव्वळ भाजपाचे राजकारण - जितेंद्र आव्हाड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 13:25 IST

'देशाची अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीत आहे'

नागपूर : देश पेटलेला असताना आणि देशासमोर महिला अत्याचारासह अर्थव्यवस्था डबघाईस आल्यासारखे अनेक ज्वलंत प्रश्न असताना केवळ सावरकरांचा मुद्दा पुढे करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा भाजपाचा प्रकार आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 

सावरकरांच्या नावाचा वापर हे भाजपाचे राजकारण आहे. देशाची अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही परिस्थिती सांभाळली नाही तर देश विकोपाला जाऊ शकतो. देशात सुरू असलेल्या महिला अत्याच्यावर भाजपा बोलत नाही.सध्या देशामध्ये पेटलेल्या वणव्याबद्दल सुद्धा बोलण्याची भाजपाला फुरसत नसल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

याचबरोबर, सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सर्वांच्या मोबाईलमध्ये आणि खाजगी आयुष्यात डोकावणार आहेत. त्यामुळे सर्वांचे खाजगी आयुष्य संपणार आहे. याकडे कुणाचे लक्ष जाऊ नये यासाठी सावरकरांचा मुद्दा पुढे करून सर्वांचे लक्ष हे सरकार विचलित करत आहे, असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वीर विनायक दामोदर सावरकरांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे तीव्र पडसाद आज राज्याच्या विधानसभेत उमटले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशनMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा