शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते वाहतूक सुधारण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर

By admin | Updated: January 8, 2016 04:01 IST

माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून रस्ते वाहतुकीचे प्रश्न प्रभावीपणे कसे सोडविता येईल, यासाठी नागरिकांकडून सूचना तसेच अभिनव कल्पना जाणून घेतल्या जात आहे.

आयटी फॉर परिवहन अभियान : विद्यार्थ्यांच्या सूचनांवर तयार होतोय अहवालनागपूर : माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून रस्ते वाहतुकीचे प्रश्न प्रभावीपणे कसे सोडविता येईल, यासाठी नागरिकांकडून सूचना तसेच अभिनव कल्पना जाणून घेतल्या जात आहे. यासाठी आयटी फॉर परिवहनतर्फे अभियान राबविण्यात आले आहे. आयटी फॉर परिवहनची चमू सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून विदर्भातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी यासंदर्भात संवाद साधला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सूचनांवर एक अहवाल तयार केला जात असून तो शासनास सादर केला जाणार आहे.आयटी फॉर परिवहनतर्फे या दौऱ्यात नागपूरच्या अजिता डोरलीकर, जयपूरचे वीरेंद्र शर्मा, नाशिकचे नितीन शुक्ल, भंडाऱ्याचे महेंद्र निंबार्ते यांचा समावेश आहे. ही चमू आज नागपुरात आली असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत याविषयाची सविस्तर माहिती दिली. नितीन शुक्ल यांनी सांगितले की, रस्ते वाहतूक महामार्गावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित असणे ही संपूर्ण देशासमोरील एक मोठी समस्या बनली आहे. अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील रस्ते वाहतूक ही अधिक चांगली व सुरक्षित कशी करता येईल, यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयातर्फे एक आयटी टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत. या टास्क फोर्समध्ये मोहन दास पै, विनित गोयंका यांसारख्या तज्ञांचा समावेश आहे.विनित गोयंका यांच्या नेतृत्वात आयटी फॉर परिवहन हे अभियान देशभरात राबविले जात आहे. यात अशासकीय संघटनांच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांशी संवाद साधून रस्ते वाहतुकीसंदर्भात त्यांच्या काय सूचना व कल्पना आहेत त्या समजून घेणे आणि त्याचा अहवाल तयार करण्यात येत आहे. यासाठी वेगवेगळी टीम कार्यरत आहे. महाराष्ट्राचा विचार केला असता पहिल्या टप्प्यात जवळपास १५ हजार नागरिकांच्या सूचना एकत्रित करून त्याचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला जात आहे. विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या या टीमने गेल्या तीन दिवसात भंडारा, रामटेक, गोंदिया आदी जिल्ह्याच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी परिसंवादाच्या माध्यमातून संवाद साधला. महाविद्यालयीन विद्यार्र्थ्यांना रस्ता वाहतुकीसंदर्भात काय वाटते याचा एक अहवाल तयार करून तो सुद्धा शासनास सादर केला जाईल. भविष्यात रस्ते वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी शासन जो काही धोरणात्मक निर्णय घेईल, तेव्हा या अहवालाचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास या चमूने यावेळी व्यक्त केला.(प्रतिनिधी)