शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

‘ते’ निर्माल्यातून जपतात माणुसकीचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 10:24 IST

घरी अठराविश्वे दारिद्र्य, दररोज दोन वेळा पोट भरेल याची शाश्वतीदेखील नाही. क्षणाक्षणाला संघर्षांशी सामना हीच त्यांची नियती. मात्र अशा स्थितीतदेखील माणुसकीचे भान त्यांनी जपले आहे.

ठळक मुद्देगोसेवेसाठीही घेतात पुढाकारफळे जमा करून गरजूंना वाटप

विशाल महाकाळकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरी अठराविश्वे दारिद्र्य, दररोज दोन वेळा पोट भरेल याची शाश्वतीदेखील नाही. क्षणाक्षणाला संघर्षांशी सामना हीच त्यांची नियती. मात्र अशा स्थितीतदेखील माणुसकीचे भान त्यांनी जपले आहे. म्हणूनच बाप्पाच्या विसर्जनानंतर तलावांमध्ये होणारा कचरा व निर्माल्य तर ते वेचतातच. मात्र प्रसाद म्हणून भक्तांनी फेकलेली फळे व इतर साहित्य गोळा करून त्यांचे गरजूंना वाटप करण्याचे पुण्यदेखील करतात. नागपुरातील रोहणकर कुटुंबीयांनी समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित केला असून भक्तांनी यापासून बोध घेण्याची आवश्यकता आहे.प्रशासनाकडून ‘इकोफ्रेंडली’ गणेश विसर्जनाबाबत जागृती करण्यात येत असली तरी अनेक गणेशभक्तांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. शहरातील विविध तलावांमध्ये थेट गणेशमूर्तींचे विसर्जन करत असताना सोबत ते नैवेद्य, फळे, हारतुरेदेखील टाकतात. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मात्र या तलावांमधील दृश्य पाहिले की नागरिकांच्या असंवेदनशीलतेचा पुरावा मिळतो. जागोजागी पाण्यावर तरंगणारे निर्माल्य, फळे, प्लास्टिकच्या पिशव्या दिसून येतात. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील फुटाळा व नाईक तलावात प्रामुख्याने हे चित्र दिसून आले.यातील साहित्य वेचण्यासाठी शहरातील काही लोक तलावांमध्ये जाऊन गणपती मूर्तीवरील आभूषणे आणि बाजारात विक्री होईल असे साहित्य जमा करण्याचे काम करतात. रोहणकर कुटुंबीयदेखील त्यातलेच असून मागील अनेक वर्षांपासून ते हे काम करत आहेत.गरिबीची भूक किती वेदनादायी असते याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळेच ते तलावातील पाण्यामधून आपल्या कामाच्या वस्तू गोळा तर करतातच.मात्र सोबतच फळे, नारळ, काकड्या, जनावरांचे खाद्य होऊ शकेल असे साहित्यदेखील बाहेर काढतात.प्रभाकर रोहणकर, आकाश रोहणकर, अमोल रोहणकर हे या कामात पुढाकार घेतात.

भक्तांनी सामाजिक भान जपावे‘लोकमत’ने ज्यावेळी छोटा ताजबाग परिसरातील रोहणकर कुटुंबीयांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी आपल्या या कार्याबाबत सविस्तर माहिती दिली. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून विविध तलावांत जाऊन नित्यनेमाने हे कार्य करत आहोत. आमच्या पोटाची खळगी भरल्या जातेच. शिवाय वंचितांनादेखील मदत करण्याचे पुण्य आमच्या हातून होऊ शकते. विसर्जनाच्या वेळी गणेशमूर्तींसमोर मोठ्या प्रमाणात नैवेद्य, फळे टाकण्यात येतात. याऐवजी जर हा नैवेद्य व फळे यांचे वंचितांना अगोदरच वाटप केले तर खºया अर्थाने ‘विघ्नहर्ता’ त्यांना पावल्याचे समाधान मिळेल. भक्तांनी सामाजिक भान जपण्याची आवश्यकता आहे, असे मत आकाश रोहणकर याने व्यक्त केले.

 

 

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८