शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

‘ते’ निर्माल्यातून जपतात माणुसकीचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 10:24 IST

घरी अठराविश्वे दारिद्र्य, दररोज दोन वेळा पोट भरेल याची शाश्वतीदेखील नाही. क्षणाक्षणाला संघर्षांशी सामना हीच त्यांची नियती. मात्र अशा स्थितीतदेखील माणुसकीचे भान त्यांनी जपले आहे.

ठळक मुद्देगोसेवेसाठीही घेतात पुढाकारफळे जमा करून गरजूंना वाटप

विशाल महाकाळकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरी अठराविश्वे दारिद्र्य, दररोज दोन वेळा पोट भरेल याची शाश्वतीदेखील नाही. क्षणाक्षणाला संघर्षांशी सामना हीच त्यांची नियती. मात्र अशा स्थितीतदेखील माणुसकीचे भान त्यांनी जपले आहे. म्हणूनच बाप्पाच्या विसर्जनानंतर तलावांमध्ये होणारा कचरा व निर्माल्य तर ते वेचतातच. मात्र प्रसाद म्हणून भक्तांनी फेकलेली फळे व इतर साहित्य गोळा करून त्यांचे गरजूंना वाटप करण्याचे पुण्यदेखील करतात. नागपुरातील रोहणकर कुटुंबीयांनी समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित केला असून भक्तांनी यापासून बोध घेण्याची आवश्यकता आहे.प्रशासनाकडून ‘इकोफ्रेंडली’ गणेश विसर्जनाबाबत जागृती करण्यात येत असली तरी अनेक गणेशभक्तांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. शहरातील विविध तलावांमध्ये थेट गणेशमूर्तींचे विसर्जन करत असताना सोबत ते नैवेद्य, फळे, हारतुरेदेखील टाकतात. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मात्र या तलावांमधील दृश्य पाहिले की नागरिकांच्या असंवेदनशीलतेचा पुरावा मिळतो. जागोजागी पाण्यावर तरंगणारे निर्माल्य, फळे, प्लास्टिकच्या पिशव्या दिसून येतात. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील फुटाळा व नाईक तलावात प्रामुख्याने हे चित्र दिसून आले.यातील साहित्य वेचण्यासाठी शहरातील काही लोक तलावांमध्ये जाऊन गणपती मूर्तीवरील आभूषणे आणि बाजारात विक्री होईल असे साहित्य जमा करण्याचे काम करतात. रोहणकर कुटुंबीयदेखील त्यातलेच असून मागील अनेक वर्षांपासून ते हे काम करत आहेत.गरिबीची भूक किती वेदनादायी असते याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळेच ते तलावातील पाण्यामधून आपल्या कामाच्या वस्तू गोळा तर करतातच.मात्र सोबतच फळे, नारळ, काकड्या, जनावरांचे खाद्य होऊ शकेल असे साहित्यदेखील बाहेर काढतात.प्रभाकर रोहणकर, आकाश रोहणकर, अमोल रोहणकर हे या कामात पुढाकार घेतात.

भक्तांनी सामाजिक भान जपावे‘लोकमत’ने ज्यावेळी छोटा ताजबाग परिसरातील रोहणकर कुटुंबीयांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी आपल्या या कार्याबाबत सविस्तर माहिती दिली. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून विविध तलावांत जाऊन नित्यनेमाने हे कार्य करत आहोत. आमच्या पोटाची खळगी भरल्या जातेच. शिवाय वंचितांनादेखील मदत करण्याचे पुण्य आमच्या हातून होऊ शकते. विसर्जनाच्या वेळी गणेशमूर्तींसमोर मोठ्या प्रमाणात नैवेद्य, फळे टाकण्यात येतात. याऐवजी जर हा नैवेद्य व फळे यांचे वंचितांना अगोदरच वाटप केले तर खºया अर्थाने ‘विघ्नहर्ता’ त्यांना पावल्याचे समाधान मिळेल. भक्तांनी सामाजिक भान जपण्याची आवश्यकता आहे, असे मत आकाश रोहणकर याने व्यक्त केले.

 

 

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८