शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

‘ते’ निर्माल्यातून जपतात माणुसकीचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 10:24 IST

घरी अठराविश्वे दारिद्र्य, दररोज दोन वेळा पोट भरेल याची शाश्वतीदेखील नाही. क्षणाक्षणाला संघर्षांशी सामना हीच त्यांची नियती. मात्र अशा स्थितीतदेखील माणुसकीचे भान त्यांनी जपले आहे.

ठळक मुद्देगोसेवेसाठीही घेतात पुढाकारफळे जमा करून गरजूंना वाटप

विशाल महाकाळकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरी अठराविश्वे दारिद्र्य, दररोज दोन वेळा पोट भरेल याची शाश्वतीदेखील नाही. क्षणाक्षणाला संघर्षांशी सामना हीच त्यांची नियती. मात्र अशा स्थितीतदेखील माणुसकीचे भान त्यांनी जपले आहे. म्हणूनच बाप्पाच्या विसर्जनानंतर तलावांमध्ये होणारा कचरा व निर्माल्य तर ते वेचतातच. मात्र प्रसाद म्हणून भक्तांनी फेकलेली फळे व इतर साहित्य गोळा करून त्यांचे गरजूंना वाटप करण्याचे पुण्यदेखील करतात. नागपुरातील रोहणकर कुटुंबीयांनी समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित केला असून भक्तांनी यापासून बोध घेण्याची आवश्यकता आहे.प्रशासनाकडून ‘इकोफ्रेंडली’ गणेश विसर्जनाबाबत जागृती करण्यात येत असली तरी अनेक गणेशभक्तांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. शहरातील विविध तलावांमध्ये थेट गणेशमूर्तींचे विसर्जन करत असताना सोबत ते नैवेद्य, फळे, हारतुरेदेखील टाकतात. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मात्र या तलावांमधील दृश्य पाहिले की नागरिकांच्या असंवेदनशीलतेचा पुरावा मिळतो. जागोजागी पाण्यावर तरंगणारे निर्माल्य, फळे, प्लास्टिकच्या पिशव्या दिसून येतात. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील फुटाळा व नाईक तलावात प्रामुख्याने हे चित्र दिसून आले.यातील साहित्य वेचण्यासाठी शहरातील काही लोक तलावांमध्ये जाऊन गणपती मूर्तीवरील आभूषणे आणि बाजारात विक्री होईल असे साहित्य जमा करण्याचे काम करतात. रोहणकर कुटुंबीयदेखील त्यातलेच असून मागील अनेक वर्षांपासून ते हे काम करत आहेत.गरिबीची भूक किती वेदनादायी असते याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळेच ते तलावातील पाण्यामधून आपल्या कामाच्या वस्तू गोळा तर करतातच.मात्र सोबतच फळे, नारळ, काकड्या, जनावरांचे खाद्य होऊ शकेल असे साहित्यदेखील बाहेर काढतात.प्रभाकर रोहणकर, आकाश रोहणकर, अमोल रोहणकर हे या कामात पुढाकार घेतात.

भक्तांनी सामाजिक भान जपावे‘लोकमत’ने ज्यावेळी छोटा ताजबाग परिसरातील रोहणकर कुटुंबीयांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी आपल्या या कार्याबाबत सविस्तर माहिती दिली. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून विविध तलावांत जाऊन नित्यनेमाने हे कार्य करत आहोत. आमच्या पोटाची खळगी भरल्या जातेच. शिवाय वंचितांनादेखील मदत करण्याचे पुण्य आमच्या हातून होऊ शकते. विसर्जनाच्या वेळी गणेशमूर्तींसमोर मोठ्या प्रमाणात नैवेद्य, फळे टाकण्यात येतात. याऐवजी जर हा नैवेद्य व फळे यांचे वंचितांना अगोदरच वाटप केले तर खºया अर्थाने ‘विघ्नहर्ता’ त्यांना पावल्याचे समाधान मिळेल. भक्तांनी सामाजिक भान जपण्याची आवश्यकता आहे, असे मत आकाश रोहणकर याने व्यक्त केले.

 

 

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८