शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदूंची एकजूट हाच विश्वधर्म

By admin | Updated: January 9, 2015 00:49 IST

हिंदू समाजाची एकजूट जेव्हा झाली तेव्हा भारतात बंधूतेचे वातावरण आले आणि सारेच आनंदात राहिले. हिंदू समाज जेव्हा विघटित झाला तेव्हा मात्र परकीयांची आक्रमणे झाली आणि देश गुलामगिरीत गेला,

जितेन्द्रनाथ महाराज : राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाला प्रारंभ नागपूर : हिंदू समाजाची एकजूट जेव्हा झाली तेव्हा भारतात बंधूतेचे वातावरण आले आणि सारेच आनंदात राहिले. हिंदू समाज जेव्हा विघटित झाला तेव्हा मात्र परकीयांची आक्रमणे झाली आणि देश गुलामगिरीत गेला, याचा इतिहास आहे. आज बऱ्याच काळानंतर हिंदू समाज एकत्रित होतो आहे आणि त्याचे सकारात्मक परिणामही आपल्याला दिसत आहेत. हिंदू एकजूट होत असल्याचे पाहून मात्र जग काळजीत पडले आहे. जगात हिंदू धर्मच शांतता निर्माण करू शकतो आणि जगाला मार्गदर्शन करू शकतो. त्यामुळे हिंदूंची एकजूट हाच विश्वधर्म आहे, असे मत देवनाथ पीठाचे आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनी गुरुवारी केले. कीर्तन महोत्सव आयोजन समिती, महाल आणि राधागोविंद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाचे आयोजन चिटणीस पार्क, महाल येथे करण्यात आले आहे.या महोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी द्वितीय मधुराद्वैताचार्य श्री बाबाजी महाराज पंडित कीर्तन परिसरात ‘देव, देश आणि धर्म’ विषयावरील उद्बोधनात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी खा. बनवारीलाल पुरोहित, दिलीप गुप्ता, प्रकाश वाघमारे, संयोजक श्रीपाद रिसालदार उपस्थित होते. महाराज म्हणाले, भगवान दत्ताला तीन मुखे आहेत तसेच देव, देश आणि धर्म आहे. देशाशिवाय देव नाही आणि देवाशिवाय देश नाही. धर्मपालनाशिवाय मात्र देव आणि देश यांचा काहीही अर्थ उरत नाही. हिंदूच्या एकजूटीने प्रथमच भारतीय संसदेला भारतमातेचे सर्वोच्च मंदिर म्हणणारा आणि त्याच्यासमोर नतमस्तक होणारा पंतप्रधान आपल्याला लाभला. देशाच्या प्रगतीसाठी भविष्यातही हिंदूंना एकजूट वाढवावी लागेल. भारताविषयी उपेक्षेने बोलणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आज तिरंग्याला सलाम करण्यासाठी भारतात येण्याची इच्छा आहे. पण काही लोक जाणीवपूर्वक हिंदूंची एकजूट तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. जातीच्या नावावर आरक्षण देऊन हा भेद वाढविला जातो आहे. आरक्षणाला विरोध नाही पण ते जातीच्या आधारापेक्षा कमजोर वर्गाला दिले गेले पाहिजे. आपल्या देशात शिवाजी महाराजांचे चरित्र इयत्ता पहिली ते पाचवी शिकविले जाते. या काळात मुलांना काहीही कळत नाही. पाचवीनंतर मात्र कळायला लागल्यावर ब्रिटिशांचा इतिहास शिकविला जातो. राज्य शासनाने यात बदल करायला हवा. विकास महत्त्वाचा आहे पण त्याने संस्कार संपायला नको, असे ते म्हणाले. संस्कार संपत असल्याने आमची संवेदनशीलता आणि नात्यांमधली वीणही सैल होते आहे. विकास हवा आहे पण संस्कारांसोबत हवा आहे. त्यासाठी आपला धर्म, देश आणि संस्कृती यांची जपणूक करण्याची गरज आहे. देशासमोर अनेक धोके आहे आणि त्यांना शह देण्याची शक्ती हिंदूच्या संघटनेतच आहे, यासाठी हिंदूंनी संघटित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी कीर्तन महोत्सव समितीच्यावतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. महाल परिसरात या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. वेदशास्त्रसंपन्न सूरज वाशिमकर आणि सहकारी यांनी अथर्वशीर्षाचे पठण केले. या महोत्सवाला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे सहकार्य लाभले आहे. (प्रतिनिधी)