शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

केंद्राच्या कार्यपद्धतीवर संघ समाधानी

By admin | Updated: March 14, 2015 02:41 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवारी नागपुरातील रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरुवात झाली.

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवारी नागपुरातील रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरुवात झाली. देशात झालेल्या राजकीय बदलानंतर प्रथमच होणाऱ्या या सभेत प्रतिनिधींचा उत्साह दिसून येत होता. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केंद्र शासनाची कार्यपद्धती व उपक्रमांवर समाधान व्यक्त करताना ‘स्वच्छ भारत’ मोहीम तसेच गंगा सुरक्षा योजनेचे कौतुकदेखील केले. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संघ परिवारातील ३५ संघटनांचे १,४०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. सकाळी ८.३० वाजता सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व भय्याजी जोशी यांच्या हस्ते या सभेचे उद्घाटन झाले. यावेळी सहसरकार्यवाह सुरेश सोनी, दत्तात्रेय होसबळे, डॉ. कृष्णगोपाल, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, संघटनमंत्री रामलाल, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया हे प्रामुख्याने उपस्थित होते.सरसंघचालकांनी सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले व राष्ट्रनिर्माणासाठी आणखी जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले. भय्याजी जोशी यांनी २०१४-१५ चा वार्षिक अहवाल सभेसमोर मांडला. देशात सत्ताबदल झाल्यानंतर नागरिकांमध्ये नवी आशा पल्लवीत झाली आहे. केंद्र सरकारचे काम योग्य दिशेने सुरू आहे. स्वच्छता मोहीम, गंगा संवर्धनसारखे उपक्रम नक्कीच अभिनंदनीय आहेत. यात जनतेचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व यातूनच अनेक समस्यांचा तोडगा काढता येईल. केंद्र शासनाने देशाची सुरक्षा, स्वाभिमान व सार्वभौमत्व अबाधित राहण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन जोशी यांनी केले. यावेळी त्यांनी संघाच्या शारीरिक, बौद्धिक व प्रचार विभागांच्या कामाचा लेखाजोगा मांडला. सोबतच विविध प्रांतांमध्ये झालेल्या विविध कार्यक्रम, उपक्रम व विस्तार कार्यांवर प्रकाश टाकला. दुपारच्या सत्रात संघ परिवारातील काही संघटनांनी संक्षिप्तपणे त्यांच्या वार्षिक अहवालाचे कथन केले.