शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन विद्यार्थिनींची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 01:24 IST

शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झालेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे मृतदेह तलावात आढळल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देवर्गाला बुट्टी मारून फिरायला गेल्या : वडिलांना कळाल्यामुळे जीव दिला

लोकमत न्यूज नेटवर्ककोराडी/नागपूर : शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झालेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे मृतदेह तलावात आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनीषा ईश्वर पटले (वय १७) आणि आशना रवींद्र रोकडे (वय १७), अशी मृत मुलींची नावे आहेत. त्यांनी दडपणात येऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.मनीषा आणि आशना या दोघीही जरीपटक्यातील लहानुजीनगरात राहत होत्या. त्या दयानंद महाविद्यालयात १२ वीत शिकायच्या. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या महाविद्यालयात जात आहोत, असे सांगून घरून निघाल्या. मात्र, सायंकाळ झाली तरी त्या परतल्या नाही. त्यामुळे पालकांनी शोधाशोध सुरू केली. ओळखीचे, नातेवाईक, मित्रमंडळी अशा सर्वांकडे विचारपूस करण्यात आली. त्या महाविद्यालयात आणि शिकवणी वर्गातही गेल्या नव्हत्या. दिवसभर त्या निशिकांत घनश्याम नागपुरे नामक मित्रासोबत दुचाकीने फिरत होत्या. असे त्यांच्या पालकांना कळले. मैत्रिणीने ही गोष्ट या दोघींना मोबाईलवर संपर्क करून कळविली. त्यामुळे त्या दडपणात आल्या. आपली आता घरी गेल्यानंतर खरडपट्टी काढली जाईल, या भीतीने त्या अस्वस्थ झाल्या. यावेळी त्या कोराडीच्या मालगुजारी तलावाजवळ होत्या. त्यांनी निशिकांतला हा प्रकार सांगून आत्महत्या करण्याचा विचारही बोलून दाखवला. हादरलेल्या निशिकांतने त्यांची कशीबशी समजूत काढली. एवढेच नव्हे तर मनीषाच्या वडिलांना फोन करून या दोघी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याचेही कळविले. वडिलांनी त्याला त्यांची समजूत काढण्यास सांगितले. घाबरू नका, आम्ही तिकडे येतो, असे म्हटले. दरम्यान, फोन करून निशिकांतने मागे वळून बघितले तेव्हा त्याला मनीषा आणि आशना दिसल्या नाही. त्याने पुन्हा मनीषाच्या वडिलांना फोन केला. नियंत्रण कक्षातही कळविले. मनीषाचे वडील पोहोचल्यानंतरकुणावर होणार कारवाई ?महाराजबाग, विविध तलाव, गार्डनमध्ये आणि शहराबाहेरच्या मार्गावर शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी झाडाच्या आडोशाला बसलेले दिसतात. मनीषा-आशनाचाही असाच प्रकार आहे. पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. त्यात नेमके काय लिहून आहे, ते कळायला मार्ग नाही. या प्रकरणात कोणती अन् कुणावर कारवाई करावी, असा विचार पोलीस करीत आहेत.