शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

नागपूर जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत १२ शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 11:21 IST

Farmer suicide Nagpur News नागपूर जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’च्या कालावधीपासून १२ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले.

ठळक मुद्देकुटुंबीयांची शासकीय मदतीसाठी प्रतीक्षा २० वर्षांत मदतीचा आकडा तोकडाच

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : २०२० साली अगोदरच ‘कोरोना’ने कंबरडे मोडले असताना नागपूर जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’च्या कालावधीपासून १२ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. आश्चर्याची बाब म्हणजे आत्महत्येला काही महिने उलटूनदेखील संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत कुठल्याही प्रकारे शासकीय मदत मिळाली नाही. घरातील कर्ता पुरुष गमावल्यानंतर कुटुंबीयांच्या वाट्याला प्रशासकीय लेटलतिफीमुळे आता मदतीची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विचारणा केली होती. २००१ ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत नागपूर जिल्ह्यात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यातील किती शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाची आर्थिक मदत मिळाली, ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, २०२० सालात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील आठ आत्महत्या पहिल्या दोन महिन्यात झाल्या होत्या. मार्च महिन्यात जिल्ह्यात ‘कोरोना’चा शिरकाव झाला व त्यानंतर जुलै महिन्यापर्यंत १२ शेतकऱ्यांनी स्वत:चा जीव दिला. यातील एकाही शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत मिळाली नाही. तर जानेवारी महिन्यात आत्महत्या केलेल्या केवळ दोन कुटुंबीयांना एकूण दोन लाखाची शासकीय मदत प्राप्त झाली.

३७ टक्के शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनाच शासकीय मदत

प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार मागील २० वर्षांपासून नागपूर जिल्ह्यात तब्बल ८१२ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. परंतु शासकीय अटीनुसार यातील ३०२ म्हणजे केवळ ३७ टक्के शेतकऱ्यांची कुटुंबेच शासकीय मदतीसाठी पात्र ठरली. या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपये यानुसार तीन कोटी दोन लाख रुपयाची मदत देण्यात आली. २०१४ सालापासून जिल्ह्यात ३३६ शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद झाली व त्यातील फक्त १२८ कुटुंबीयांना मदत मिळाली.

जनमाहिती अधिकाऱ्यांचे गणित कच्चे

दरम्यान, माहितीच्या अधिकारात माहिती देत असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एकाच वर्षातील आत्महत्यांची वेगवेगळी माहिती दिली आहे. २००० सालापासूनच्या आत्महत्यांच्या तक्त्यात २०२० साली ऑक्टोबर महिन्यापर्यंत १९ आत्महत्या झाल्याचे नमूद आहे. तर केवळ २०२० सालच्या आत्महत्यांच्या तक्त्यात हीच संख्या २० दाखविण्यात आली आहे. फरक केवळ एका अंकाचा असला तरी ही माहिती शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनात गंभीरता नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या