शहरं
Join us  
Trending Stories
1
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंचा पर्याय शोधावा : पीयूष गोयल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:06 PM

देशात व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक आणि व्यावसायिकांनी चिनी वस्तूंचा पर्याय शोधावा, असे आवाहन केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी येथे केले

ठळक मुद्देविविध व्यापारी संघटनांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक आणि व्यावसायिकांनी चिनी वस्तूंचा पर्याय शोधावा, असे आवाहन केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी येथे केले. चिनी वस्तूंना भारतीय बाजारपेठांमध्ये वर्चस्व मिळू देणार नाही, असे त्यांनी सांगितले.पीयूष गोयल यांच्या नागपूर भेटीदरम्यान भाजपा व्यापारी आघाडी आणि विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि अडचणी व समस्या जाणून घेतल्या. गोयल यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. आयोजन गुरुवारी हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये करण्यात आले. मंचावर माजी खा. अजय संचेती, आ. सुधाकर कोहळे, माजी महापौर अर्चना डेहनकर आणि भाजपचे अध्यक्ष आघाडीचे अध्यक्ष संजय वाघमारे उपस्थित होते. यावेळी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन, कोसिया, आयसीएआय नागपूर शाखा, आयएमए, होलसेल सीड्स अ‍ॅण्ड ग्रेन मर्चंट्स असोसिएशन, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, फेडरेशन ऑफ राईस मिल्स असोसिएशन आणि अन्य व्यापारी संघटनांनी आपापल्या मागण्यांचे निवेदन गोयल यांना दिले.गोयल म्हणाले, प्रत्येक आयात वाईट नसते आणि या पार्श्वभूमीवर राष्ट्र आणि उद्योग कसे उभे राहू शकतात, हे आपण पाहिले पाहिजे. आधुनिक युगात आसियानसारख्या व्यापारी संघटनांनी प्रादेशिक व्यापारावर अधिराज्य गाजवले आहेत. अशावेळी कोणत्याही देशाशी व्यापार कमी होणे भारताला परवडणारे नाही. त्यामुळे चिनी वस्तूंना भारतीय बाजारात रोखण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. अशावेळी टाळता येण्याजोग्या आणि अनावश्यक गोष्टींची यादी बनवावी. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कोकिंग कोळसा आणि मोबाईलची आयात ही आजकालची गरज बनली आहे. कारण मोबाईलशिवाय आयुष्य ठप्प होते. त्याचप्रमाणे लोह उत्पादनात कोकिंग कोळसा वापरला जातो. तथापि, प्रतिबंधित वस्तूंच्या यादीमध्ये अगरबत्ती टाकल्या गेल्या आहेत कारण त्यांची आयात वितरित केली जाऊ शकते.गोयल म्हणाले, व्यापाऱ्यांच्या एका भागासाठी महत्त्वाची असणारी एखादी वस्तू दुसऱ्या भागाला नसू शकते. म्हणूनच व्यापारी त्या विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदी आणू इच्छितात. पण ग्राहकांच्या हितासह सर्व व्यापाऱ्यांचे हित सरकार पाहते. गोयल यांनी निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याचे मान्य केले. छोट्या आणि अर्थपूर्ण सूचना दिल्याबद्दल नागपुरातील व्यापाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.प्रामाणिक कर भरणा करणाऱ्यांना त्रास दिला जाणार नाही आणि कॉपोर्रेट कर दरात कपात केल्याने महसूल वाढीसाठी कर वसुलीचे लक्ष्य निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी एनव्हीसीसीचे हेमंत गांधी, कामितचे दीपेन अग्रवाल, कोसियाचे जुल्फेश शाह, व्हीआयएचे नरेश जाखोटिया, व्हीटीएचे तेजिंदरसिंग रेणू, केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे मुकुंद दुबे, आयसीएआयचे सुरेन दुरुगकर, सोना-चांदी ओळ कमिटीचे पुरुषोत्तम कावळे व राजेश रोकडे, आयएमएचे डॉ संजीव देशपांडे आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन आणि आभार संजय भेंडे यांनी मानले.

 

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलbusinessव्यवसायchinaचीन