शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाचा तडाखा

By admin | Updated: June 6, 2016 23:50 IST

अहमदनगर: शहरासह जिल्ह्याला रविवारी रात्री झालेल्या पावसाचा मोठा तडाखा बसला़ घरांच्या पडझडीत तिघे ठार तर, १३ जण जखमी झाले आहेत़ जिल्ह्यात ठिकठिकाणी सुमारे

अहमदनगर: शहरासह जिल्ह्याला रविवारी रात्री झालेल्या पावसाचा मोठा तडाखा बसला़ घरांच्या पडझडीत तिघे ठार तर, १३ जण जखमी झाले आहेत़ जिल्ह्यात ठिकठिकाणी सुमारे १३८ घरांची पडझड झाली़विद्युत तारांवर झाडे व फांद्या उन्मळून पडल्याने सोमवारी दुपारपर्यंत विद्युत पुरवठा खंडित होता़ मुळा धरण परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प होता़ त्यामुळे शहरासह उपनगरांतील जनजीवन विस्कळीत झाले होते़ दरम्यान महावितरणकडून दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आल्याने काही ठिकाणी सायंकाळी विद्युत पुरवठा सुरळीत झाला़शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने रविवारी जोरदार हजेरी लावली़ घराचा पत्रा लागून श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील भिसान इसाक शेख (वय-४) हा बालक जागीच ठार झाला़ नवनागापूर येथे भिंत कोसळून आदित्य साळुंके (वय १३) याचा मृत्यू झाला़ नगर तालुक्यातील अरणगाव येथील दादा ढमढेरे (वय, ५५) हे मयत झाले़ जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या घरांच्या पडझडीत १३ जण जखमी झाले असून, जखमीमध्ये संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथील हेमलता मतू व कैलास भोलाराम, शेवगाव तालुक्यातील दहीफळ येथे राजू भाऊसाहेब पांढरे, कमल राजू पांढरे, प्रथमेश राजू पांढरे, उत्तम सीताराम ठोंबरे, संजय भाऊसाहेब ठोंबरे, संजय भाऊसाहेब ठोंबरे, गोजराबाई ठोंबरे हे अंगावर पत्रे पडून जखमी झाले आहेत़ (प्रतिनिधी)रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने शहर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा सोमवारी दिवसभर बंद राहिला. २४ तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला. मंगळवारपासून शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने मुळानगर, विळद पंपिंग स्टेशन येथील वीज पुरवठा खंडित झाला. रविवारी रात्रभर पाणी उपसा करणारे पंप बंद राहिल्याने शहर पाणी वितरण व्यवस्थेच्या टाक्या भरल्या नाहीत. परिणामी शहरासह उपनगराचा पाणी पुरवठा बंद राहिला.शहर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठा झाला नाही. वीज नसल्याने हौदात थोडेसे असलेल्या पाण्याने अपार्टमेंटच्या टाक्या भरता आल्या नाहीत. काही घरांत तर पिण्याचे पाणीही नाही अन् वापराचेही नाही. विंधन विहीर असली तरी वीज नसल्याने बोअरिंगचे पाणीही मिळेना. विहीर कोसळलीइसळक येथील शेतकरी महादेव खामकर यांनी ८ ते १० लाख रुपये खर्चून विहिरीचे बांधकाम केले होते़ मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विहिरीचे बांधकाम पडले़ विहीर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे़ झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता़‘मुळा’ लाईन उध्दवस्तवादळाचा सर्वाधिक फटका बसला नगर ते मुळा धरण या २७ किलोमीटर वीजवाहिनीला. यादरम्यान एकूण २० ते २५ ठिकाणी विस्कळीतपणा आला होता. काही ठिकाणी तारा तुटल्या, तर बऱ्याच ठिकाणी वीजवाहिनीवर फांद्या पडल्या होत्या. सोमवारी रात्रीपर्यत दुरूस्तीचे काम सुरू होते. ‘मुळा’त नवीन पाणीमुळा धरण पाणलोट क्षेत्रात राहुरी तालुक्यात २५ तर मुळानगर परिसरात ३५ मि़ मी़ पाऊस झाला़ दगडांच्या खाणीत जोरदार पावसाचे आगमन झाले़ मुळा धरणात सोमवारी दिवसभरात एकूण ३१ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे़ त्यामुळे मुळा धरणातील पाणी पातळीत १५ फुटाने वाढ झाली आहे़ दहा संसार उघड्यावरनगर तालुक्यातील निंबळक येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने निंबळक- इसळक परिसरातील ८ ते १० घरांचे पत्रे उडाले़ त्यामुळे सुमारे दहा कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे़ निंबळक येथील रहिवासी भिमा कदम, रामदास शिंदे, कुंडलिक वायकर, सदाशिव वायकर यांच्या घरावरील पत्रे उडाले़ दयानंद देवकर, मनोज रोकडे, किसन यादव, रामकिसन गेरंगे, आदिनाथ गेरंगे, आदिनाथ गेरंगे यांच्या घरांच्या भिंती कोसळल्याने त्यांची तारांबळ उडाली़आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवाराजिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी मागील आठवड्यात जिल्ह्यातील सर्व यंत्रणांची बैठक घेऊन प्रत्येक तालुका मुख्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले होते़ मात्र अद्याप एकाही तालुक्यात हा कक्ष सुरू करण्यात आला नाही़ त्यामुळे बाधित कुटुंबांना मदत मिळण्यास विलंब होत असून, काही ठिकाणी पंचनामे करण्यासाठी प्रशासन पोहोचले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़