शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

खासगीकरणाविरोधात हजारो कर्मचारी रस्त्यावर; जन सुरक्षा कायदा मागे घेण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:00 IST

अनेक संघटनांनी विविध कार्यालयांमधून संविधान चौकापर्यंत मोर्चा काढला : शासकीय कार्यालयांमध्ये सुटीच्या वेळेत निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खासगीकरणाच्या विरोधासह विविध मागण्यांसाठी १० कामगार संघटना व ५५ फेडरेशनने पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या समर्थनार्थ हजारो शासकीय कर्मचारी बुधवारी रस्त्यावर उतरले होते. अनेक संघटनांनी विविध कार्यालयांमधून संविधान चौकापर्यंत मोर्चा काढला. संविधान चौकात विशाल सभा पार पडली, तर बहुतांश कर्मचाऱ्यांनी आपापल्या शासकीय कार्यालयांमध्ये सुटीच्या वेळेत निदर्शने करीत संपाला पाठिंबा दर्शविला.

चार श्रम कोडचा निर्णय मागे घेऊन पुन्हा कामगार कायदे लागू करण्यात यावेत, वीज सुधारणा विधेयक हा अन्यायकारक असून, तो मागे घेण्यात यावा, किमान मासिक वेतन २८ हजार रुपये करण्यात यावे, सेवानिवृत्तीनंतर सन्मानाने जगता यावे म्हणून पेन्शन, ग्रॅच्युइटी योजना सर्वांना लागू करावी, प्रीपेड स्मार्ट मीटर योजना रद्द करावी, सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण धोरण मागे घ्यावे, सर्व योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना कायम कर्मचारी म्हणून सामावून घ्यावे आणि महाराष्ट्र सरकारने जन सुरक्षेच्या नावावर आणलेला कायदा हा संविधानविरोधी व जनविरोधी असल्याने तो मागे घ्यावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

संविधान चौक येथे झालेल्या जाहीर सभेला विविध उद्योगांतील कामगार नेत्यांनी उपस्थित संपकरी कामगारांना संबोधित केले. यात प्रामुख्याने आयटकचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड मोहन शर्मा, आयटक महाराष्ट्राचे सरचिटणीस कॉम्रेड श्याम काळे, सिटूचे कॉ. दिलीप देशपांडे, ईस्ट महाराष्ट्र बैंक एम्प्लाईज असोसिएशनचे कॉम्रेड अशोक बोभाटे, अंगणवाडी आशा शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, राज्य सरकारी कर्मचारी संघटना, आपली बस संघटना, नर्सेस संघटना, जनरल इन्शुरन्स कर्मचारी असोशिएशनसह अनेक संघटना पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. यात सभेचे संचालन विठ्ठल जुनघरे यांनी केले, तर आभार कॉम्रेड सीएम मोरया यांनी मानले.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  • राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा नागपूर, तसेच जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
  • शिष्टमंडळात ज्ञानेश्वर महल्ले, राजेंद्र ठाकरे, नाना कडबे, यशवंत कडू, सुनील व्यवहारे, दीपक गोतमारे, बुधाची सुरकर, पुरुषोत्तम मिलमिले, उमेशचंद्र चिलबुले, गोपीचंद कातुरे, अरविंद मदने, वासुदेव वाकोडीकर, कविता बोंद्रे, अशोक शंभरकर, संगीता चंद्रिकापुरे, रंजना कांबळे आर्दीचा समावेश होता.
टॅग्स :nagpurनागपूरBharat Bandhभारत बंद