शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

उद्धव ठाकरेंच्या चुकीमुळे महाराष्ट्राला हे दिवस; चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका

By जितेंद्र ढवळे | Updated: October 31, 2023 17:36 IST

विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर दिले प्रत्युत्तर

नागपूर : मराठा आरक्षणाचा महाराष्ट्रभरात जो घोळ निर्माण झाला असून त्याचे परिणाम राज्यातील जनतेला भोगावे लागत आहे. त्यासाठी केवळ उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असे ते म्हणाले.

नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या चुकीमुळे महाराष्ट्राला आज हे दिवस पाहावे लागत आहे. ते मुख्यमंत्री असताना त्यावेळी अस्तित्वात असलेले मराठा आरक्षण टिकविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका मांडता आली असती. परंतु, तेव्हा त्यांनी काहीच केले नाही.

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर बावनकुळे म्हणाले, ही आगच उद्धव ठाकरे यांनी लावली आहे. हा प्रश्न जेव्हा सुप्रीम कोर्टात होता तेव्हा वडेट्टीवार त्यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. तेव्हा त्यांनी काहीच केले नाही. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे, त्यास सर्वांनी साथ दिली पाहिजे. भाजपाच्या कोअर कमिटी बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी जी पावलं उचलली आहेत. जे प्रयत्न केले जात आहेत, त्यास भाजपचा पूर्ण पाठिंबा असल्याचे निश्चित करण्यात आले असंही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेnagpurनागपूरMaratha Reservationमराठा आरक्षण