शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचा नवीन खंड यंदाही नाहीच

By admin | Updated: April 14, 2016 03:05 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याच्या नवीन खंडाचे प्रकाशन या वर्षीसुद्धा करण्यात आलेले नाही.

चरित्र साधने प्रकाशन समितीच्या कारभारावरच संशय : बाबासाहेबांच्या विचारधनापासून वंचित ठेवण्याचे कारस्थानआनंद डेकाटे नागपूरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याच्या नवीन खंडाचे प्रकाशन या वर्षीसुद्धा करण्यात आलेले नाही. बाबासाहेबांचे अप्रकाशित मूळ साहित्य प्रकाशित न करून त्यांच्या विचारांपासून सामान्य नागरिकांना वंचित ठेवण्याचा घाट डॉ. आंबेडकर चरित्र साधने समितीने घातला आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा पुस्तकरूपाने समाजासमोर आणण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने १५ मार्च १९७६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली. या ३६ वर्षात केवळ २२ खंड व २ संदर्भ ग्रंथ प्रकाशित करण्यात आले. सन २००४ पासून बाबासाहेबांच्या साहित्याचा एकही खंड प्रकाशित झालेला नाही. सन २००६ व २०१० प्रकाशित खंड २१ व २२ हे चुका व त्रुटीमुळे वादग्रस्त ठरले. यानंतर सुधारित खंड प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अप्रकाशित साहित्याचे तब्बल ४२ खंड प्रकाशित होणार होते. त्यापैकी केवळ अर्धे खंड प्रकाशित झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९३० ते १९३३ या कालावधीत गोलमेज परिषदेविषयी निर्माण केलेल्या सात समित्यांचे सदस्य होते. इतकेच नव्हे तर व्हॉईसरॉयच्या शासनात १९४२ ते १९४६ या कालावधीत श्रममंत्री असताना त्यांच्याकडे ११ महत्त्वाची खाती होती. त्याचप्रमाणे भारतीय राज्य घटना तयार होत असताना ज्या दहा विविध उपसमित्या स्थापन करण्यात आल्या होत्या त्यात बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता. यातील कामगिरी वाखाणल्या गेली आहे. यावर अनेक ग्रंथ तयार होऊ शकतात, परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्त बाबासाहेबांचे विचार प्रत्येक माणसात रुजविण्यासाठी हे वर्ष समता वर्ष म्हणून शासनातर्फे साजरे करण्यात येत आहे. त्यासाठी मोठमोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अप्रकाशित साहित्याचा नवीन खंड या वर्षी सुद्धा प्रकाशित न झाल्याने शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासण्यात आला आहे.नव्याने भाषांतराची गरज काय? नागपूर : दिवंगत वसंत मून यांनी या खंडाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता या इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद करून ठेवला आहे. तो छपाईसाठी पाठवण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला. गेल्या १० वर्षापासून हा खंड मुद्रित तपासणीसाठी पडून आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण खंड मराठी भाषेत उपलब्ध असताना केवळ प्रा. प्रकाश सिरसट यांच्याकडून या एका प्रकरणाचा अनुवाद करण्यात आला आहे. तेव्हा संपूर्ण खंड मराठीत उपलब्ध असताना नव्याने अनुवादाची गरज काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. केवळ ९० पानांची पुस्तिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गाजलेले व वादग्रस्त खंड अ‍ॅनिहिलेशन आॅफ कास्ट (जातिव्यवस्थेचे निर्मूलन) म्हणजे १९३६ साली लाहोर येथे जातपात तोडक मंडळाच्या अधिवेशनातील नियोजित अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांनी तयार केलेले लिखित भाषण होय. या भाषणातील हिंदू धर्माची परखड व कठोर चिकित्सा पाहून आयोजकांनी ते अधिवेशनच रद्द केले होते. पुढे हेच भाषण पुस्तकरूपाने १५ मे १९३६ साली प्रकाशित करण्यात आले. याच आधारे महराष्ट्र शासनाच्या प्रकाशन समितीने खंड-१ म्हणून भारतातील जाती, जात निर्मूलनासहित एकूण ११ प्रकरणांसह १४ एप्रिल १९७९ रोजी प्रकाशित केले. या खंडाला प्रचंड मागणी असूनही ३७ वर्षात एकाही खंडाचे पुनर्मुद्रण करण्यात आलेले नाही. या खंडाला ७५ वर्षे पूर्ण झल्याबद्दल सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांनी १४ एप्रिल २०१३ रोजी या संपूर्ण खंडातील प्रकरण-२ मधील ‘अ‍ॅनिहिलेशन आफ कास्ट वीथ रिप्लाय टू महात्मा गांधी बाय डॉ. बी.आर. आंबेडकर’ या शीर्षकाची ७२ पानांची इंग्रजी पुस्तिका झेरॉक्स रूपाने प्रकाशित केली होती. आता तीन वर्षांनी याच मजकुराचा मराठी अनुवाद प्रकाशित करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर चरित्र साधने समितीने कुठलाही नवीन ग्रंथ प्रकाशिन न करता केवळ हे ९० पानाचे पुस्तक प्रकाशित करून आंबेडकरी जनतेला फसवण्याचा प्रकार केला आहे.