शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

मुंडेंच्या स्तरावर मंत्रिपदाची चर्चा होत नाही; मंत्रिपदाची चर्चा केवळ तीन नेत्यांमध्ये..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 15:04 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : मुंडे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची शक्यता फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तीनवेळा माझी भेट घेतलेली आहे. प्रत्येक भेट वेगवेगळ्या कारणांसाठी होती. कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नाही. मंत्रिमंडळाची चर्चा मी, अजित पवार आणि एकनाथराव शिंदे करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाची शक्यता फेटाळली.

माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होण्याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात असता पत्रकारांनी त्यांना मुंडे यांच्या प्रवेशाबाबत विचारणा केली होती. दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या खातेबदलाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, जी काही घटना घडली त्यामुळे लोकांमध्ये रोष होता. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. चर्चेअंती त्यांचं खातं बदलण्याचा निर्णय घेतला. परंतु, यापुढे मंत्र्यांचा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. कारवाई होणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. आणखी खातेबदल होणार का? असे विचारले असता, याबाबत कुठलीही चर्चा नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

यूपीएने मताच्या राजकारणासाठी हिंदू दहशतवादाची थिअरी बनवली

  • २००८ सालचं षडयंत्र आता सर्वांसमोर उघड झालंय. त्यावेळच्या यूपीए सरकारने मतांच्या राजकारणासाठी हिंदू टेरर, भगवा दहशतवाद हे शब्द तयार केले. हिंदू दहशतवादाची थिअरी बनवली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
  • मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "१९९० च्या दशकाच्या २ शेवटच्या भागात आणि साधारणतः २०००च्या सुरुवातीला संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणात दहशतवादी घटना घडल्या. अमेरिका, युरोपमध्ये दहशतवादाच्या घटना घडल्या.
  • यातल्या अनेक घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत होते. त्यातून इस्लामिक टेररिजमच नरेटिव तयार झालं. ते भारताने तयार केलं नव्हतं." "भारतात या नरेटिवचा आपल्या व्होटबँकेवर परिणाम होतोय हे काँग्रेसच्या लक्षात आलं.
  • कोणीच सर्व मुस्लिमांना दहशतवादी ठरवलं नव्हतं, पण तरीदेखील या ठिकाणी सर्व हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचं यूपीएने षडयंत्र स्चलं.
  • हिंदू दहशतवाद हा शब्द तयार केला. आम्हाला मतदान करणारे जे लोक आहेत, त्यांच्या मनात राग निर्माण होऊ नये किंवा त्यांना वाटावं आम्ही बॅलन्स करतोय, यासाठी हिंदू दहशतवादाची थिअरी बनविण्यात आली.
  • लोकांना अटक केली. हिंदुत्ववादी संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकारी, पदाधिकारी यांना टार्गेट करण्याचं हे षडयंत्र होतं, असा आरोपही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDhananjay Mundeधनंजय मुंडेnagpurनागपूर