शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा नेते गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
2
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
3
"माझ्या नादाला लागाल तर..." ठाण्याच्या माजी महापौरांची आगरी समाजाविषयी कथित ऑडिओ क्लीप चर्चेत, षड्यंत्र असल्याचा आरोप
4
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
5
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
6
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
7
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
8
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
9
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
10
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
11
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
12
VIDEO: प्रभासच्या चाहत्यांचा थिएटरमध्ये धुडगूस; ‘द राजा साब’च्या स्क्रीनिंगदरम्यान आणल्या मगरी
13
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला...
14
"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले
15
महिला सक्षमीकरणाचे नवे मॉडेल! सोमनाथ मंदिरामुळे शेकडो महिलांना मिळाली रोजगाराची सुवर्णसंधी
16
Gautami Kapoor : राम कपूरकडे नव्हतं काम, पत्नी गौतमीने सांभाळलं घर; सांगितला लग्नानंतरचा अत्यंत कठीण काळ
17
२८ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला बजेट; सामान्यांची 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा संपणार?
18
उमेदवारांची माहिती अद्याप 'अंधारात', निवडणुकीतील ४६९ उमेदवारांची शपथपत्रे अपलोडच केली नाहीत!
19
"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला
20
हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भीषण अपघात; दरीत कोसळली बस, ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'नागपूरसह एकूणच विदर्भाच्या विकासाची दिशा चुकली' ॲड. प्रकाश आंबेडकरांचे स्पष्ट मत

By आनंद डेकाटे | Updated: January 7, 2026 19:46 IST

Nagpur : प्रत्येक शहराची एक स्वतंत्र ओळख असते. खुबी असते. क्षमता असते. शहरांची ही क्षमता पाहूनच विकासाचे धोरण राबविण्याची गरज आहे. ऑरेंज सिटी, कॉटन सिटी हीच नागपूरची क्षमता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रत्येक शहराची एक स्वतंत्र ओळख असते. खुबी असते. क्षमता असते. शहरांची ही क्षमता पाहूनच विकासाचे धोरण राबविण्याची गरज आहे. ऑरेंज सिटी, कॉटन सिटी हीच नागपूरची क्षमता. या आधारावर उद्योग व विकासाचे धोरण राबविल्यास खऱ्या अर्थाने परिवर्तन दिसून येईल. परंतु तसे झाले नाही. नागपूरसह एकूणच विदर्भाच्या विकासाची दिशाच चुकली आहे, असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले. 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकर हे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी नागपुरात आले असता त्यांनी लोकमत भवनला सदिच्छा भेट दिली. लोकमत टाईम्सचे संपादक एन.के. नायक व लोकमत नागपूरचे संपादक श्रीमंत माने यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांचेसोबत यावेळी त्यांनी लोकमतच्या संपादकीय सहकाऱ्यांशी मनमोकळी चर्चा केली. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सध्या ज्याची गरज आहे, ते होताना दिसत नाही आणि ज्याची गरज नाही, त्याकडे धावले जात आहे. काॅटन व संत्रा ही आपली ओळख आहे. काॅटन व संत्रा सिटी म्हणून विकास करता येऊ शकतो. सरकार मेकींग इंडियावर भर देत आहे. परंतु मेक इन इंडिया ऐवजी मेड इन इंडियावरवर भर देण्याची गरज आहे. कारण मेड इन इंडिया हा विचार संशोधनाला प्रोत्साहित करणारा आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी देश विदेशातील राजकारणासह प्रदूषण, पर्यावरण, धर्म, समाजकारण या विषयावर मनमोकळी चर्चा केली. 

नागपुरात विमानांचे मेंटनन्स सेंटर ही जागतिक मागणी

नागपूरच्या आकाशावरून साडेसातशेवर फ्लाईट जातात. येथे विमानांचे इमरजेंसी मेंटनन्स सेंटर व्हावे, अशी जगभरातून मागणी आहे. परंतु याकडे कुणीच लक्ष देत नाही. येथे इंटरनॅशन इमरजेंसी सेंटर तयार झाले तर एकट्या मनपाचा अर्थसंकल्प हा ४२ हजार कोटींवर जाईल. यातून मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होईल, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha's development, including Nagpur, has lost direction: Prakash Ambedkar

Web Summary : Prakash Ambedkar believes Nagpur and Vidarbha's development strategy is misguided. He advocates leveraging Nagpur's strengths, like cotton and oranges, for industry. He also proposes an aircraft maintenance center for massive revenue and job creation.
टॅग्स :Nagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणूक २०२६Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरnagpurनागपूरVidarbhaविदर्भ