शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोमजलेल्या मनावर पडली समुपदेशनाची फुंकर अन् तुटू पाहणारा संसार फुलला

By नरेश डोंगरे | Updated: January 1, 2023 22:55 IST

तिचे गर्भश्रीमंत कुटुंबात लग्न झाले. मात्र, दोन वर्षांतच तिच्या संसाराला दृष्ट लागली. ती माहेरी आली.

नागपूर :

तिचे गर्भश्रीमंत कुटुंबात लग्न झाले. मात्र, दोन वर्षांतच तिच्या संसाराला दृष्ट लागली. ती माहेरी आली. वाद एवढे विकोपाला गेले की त्यांच्या या वादामुळे तिच्या सासरच्या मंडळींची सर्वत्र निंदानालस्ती होऊ लागली. ‘अच्छे लोग नही’, असा ठपका बसल्याने तिच्या दिराचे जुळलेले लग्नही तुटले. इकडे तिच्या आई-वडिलांना विविध व्याधींनी घेरले. भावाने आत्महत्या केली. मतभिन्नतेमुळे दोन्ही कुटुंबं टोकाला गेली होती. अशात एका संवेदनशील महिला पोलिस अधिकाऱ्याने या प्रकरणात एन्ट्री केली. दोन्ही कुटुंबांतील सदस्यांच्या भावना समजून घेतल्या. किरकोळ स्वरूपाच्या अटीने हट्टाचे स्वरूप घेतल्याचे लक्षात आले अन् त्या हट्टावर समजूतदारपणाची फुंकर घातली गेली. आपणच आपल्या आप्तांच्या सुखाचे वैरी झाल्याचे दोन्हीकडच्या मंडळींच्या लक्षात आले अन् कोमेजलेली मनं पुन्हा गुलाबासारखी फुलली. विस्कटलेली संसाराची घडी नव्याने व्यवस्थित झाली.

तुटण्याएवढे ताणले गेल्यानंतरही एखाद्या प्रकरणाला भावभावनांची जोड देऊन हाताळले तर पुन्हा कसं आधीसारखचं व्यवस्थित होऊ शकतं, याचा वस्तूपाठ ठरावा, असं हे प्रकरण आहे.

एका सुखवस्तू कुटुंबातील बरखा (२७, नाव काल्पनिक)ला चार वर्षांपूर्वी अकोल्यातील एका गर्भश्रीमंत कुटुंबातील मंडळींनी बघितले. तिचे साैंदर्य अन् वागणे-बोलणे त्यांना एवढे प्रभावित करणारे ठरले की त्यांनी आपल्या मुलासाठी तिला थेट मागणीच घातली. बरखा उच्चशिक्षित, तिची काैटुंबिक पार्श्वभूमीही चांगली. मुलगा समीरही (वय ३०, नाव काल्पनिक) शोभेसाच. बहिणी, भाऊ उच्चशिक्षित. स्थिरस्थावर झालेला मोठा व्यवसाय. नाही म्हणायला संधी नव्हतीच. त्यामुळे दोघांचे लग्न झाले. पहिले वर्ष चांगले गेले अन् नंतर कुरुबुरी वाढल्या. तिला गोंडस मुलगा झाला, मात्र वाद वाढतच गेले. परिणामी ती माहेरी आली. एकमेकांना कमी लेखण्याच्या वादातून नको ते शब्द वापरले गेले. ज्यामुळे मनं जळून-करपून गेली. वर्ष गेले तरी तो तिला न्यायला येत नव्हता अन् ती स्वत:हून परत नांदायला जाण्याचे नाव घेत नव्हती. अशात प्रकरण सप्टेंबर २०२२ मध्ये पोलिस ठाण्यात अन् नंतर भरोसा सेलमध्ये गेले.

दोघांमध्ये समेट व्हावा, यासाठी पोलिसांकडून चार-पाच बैठका घेण्यात आल्या. मात्र, काहीच शक्य होत नव्हते, अशात भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी हे प्रकरण हाती घेतले. त्यांनी बरखा, समीर अन् दोघांच्याही कुटुंबीयांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. त्यांच्या भावना समजून घेतल्या. आपल्या रूममध्ये टीव्ही लावू देत नसल्याने तिने इश्यू केल्याचे आणि ती छोट्या-छोट्या गोष्टीसाठी हट्ट मांडत असल्याने तिच्या सासरच्यांचा इगो हर्ट झाल्याचे लक्षात आल्याने सीमा सुर्वे यांनी दोन्ही कुटुंबातील महिलांचे भावनिकरीत्या कौन्सिलिंग केले. आधीच एवढे नुकसान झाले. काडीमोड झाल्यास दोन्ही कुटुंबांची प्रतिष्ठा धुळीस मिळेल, बरखा-समीरच्या दोन वर्षीय मुलाला त्याची नाहक किंमत चुकवावी लागेल, हे पटवून दिले अन् त्यांच्यासोबतच बरखा-समीरचेही मतपरिवर्तन केले. परिणामी, एकमेकांचे तोंड बघण्याची मानसिकता बाळगणारे एकमेकांच्या गळ्यात पडले. पश्चात्तापाच्या अश्रूंनी सारे गिले-शिकवे धुतले गेले. मावळत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी सुरू असतानाच त्यांनी पुन्हा सगळ्या जुन्या चुकांना मूठमाती देत नव्याने काैटुंबिक सफर सुरू केली.अपमानाची आग अन्...विशेष म्हणजे, समीरकडची फॅमिली चांगली नसल्याची चर्चा या प्रकरणामुळे सुरू झाली होती. बदनामीमुळे समीरच्या भावाचे जुळलेले लग्न तुटले. इकडे बरखाच्या भावानेही वेगळ्या कारणामुळे आत्महत्या केली. दोन्हीकडे असे आघात झाले. तरीसुद्धा बरखा अन् समीरचा हट्ट कसा योग्य आहे, त्याची दुहाई दोघांचेही आई-वडील आपापल्या पाल्यांकडून देत होते. दोन्हीकडच्या मंडळींच्या मनात अपमानाची आग होती. त्यामुळे तुटले तरी चालेल मात्र वाकणार नाही, अशी भूमिका दोन्हींकडून घेतली गेल्याने पोलिसांकडून होणारे समेटाचे प्रयत्न वांझोटे ठरत होते. घटस्फोटच हवा, असा दोन्हीकडचा हट्ट होता. पोलिस का समेटाचे प्रयत्न करतात, असा सवाल करून पोलिसांवरही शंका घेतली जात होती. त्याची पर्वा न करता पोलिस निरीक्षक सुर्वे यांनी हे प्रकरण हाताळले अन् नियत चांगली असेल तर सर्व चांगलेच होते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.