शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

दर्जेदार अभिनयाने सजलेले ‘ते दोन दिवस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 9:29 PM

महावितरणच्या प्रादेशिकस्तरावरील आंतरपरिमंडळीय नाट्यस्पर्धेच्या अखेरच्या दिवशी नागपूर परिमंडळातर्फे ‘ते दोन दिवस’ तर गोंदिया परिमंडळातर्फे ‘वादळ वेणा’ हे दोन नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. दमदार अभिनय आणि प्रभावी दिग्दर्शनामुळे या दोन्ही नाट्यप्रयोगांनी रसिकांना सतत खिळवून ठेवले.

ठळक मुद्देनागपुरात महावितरणची आंतरपरिमंडळीय नाट्य स्पर्धा

लोेकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणच्या प्रादेशिकस्तरावरील आंतरपरिमंडळीय नाट्यस्पर्धेच्या अखेरच्या दिवशी नागपूर परिमंडळातर्फे ‘ते दोन दिवस’ तर गोंदिया परिमंडळातर्फे ‘वादळ वेणा’ हे दोन नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. दमदार अभिनय आणि प्रभावी दिग्दर्शनामुळे या दोन्ही नाट्यप्रयोगांनी रसिकांना सतत खिळवून ठेवले.आजच्या आधुनिक परिस्थितीत एखादा मुलगा आपल्या वडिलांना प्रश्न करतो की, तुम्ही माझ्यासाठी काय केलंय?, हा प्रश्न सरळ आणि सहज वाटत असला तरी त्याचे उत्तर म्हणजे देवेंद्र बेलनकर लिखित ‘ते दोन दिवस’, या नाटकात आई-बाबा यांनी जगलेले ते दोन दिवस. नागपूर शहराच्या  पार्श्वभूमीवर असलेल्या या नाटकात आई आणि बाबा, १२ व्या वर्गात शिकणारी त्यांची मुलगी रागिणी, इंजिनियरिंगला असलेला राहुल आणि आठवीत असलेला लहान मुलगा बबड्या. आयुष्यात प्रसिद्ध क्रि केटपटू होण्याचे बबड्याचे स्वप्न; पण नियतीला ते मान्य नसतं. बबड्याला ब्रेन ट्यूमरचा दुर्धर आजार होतो. रागिणीच्या बारावीची अंतिम परीक्षा असतानाच बबड्याचे रुग्णालयात निधन होतं. त्याच्या निधनाचे वृत्त रागिणी आणि राहुल यांना अजिबात कळू नये, त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, यासाठी आई आणि बाबा पुढचे दोन दिवस पूर्ण काळजी घेत असतात. आपल्या भावनांना आवर घालीत दोन दिवस जगलेले आई-बाबा. एकीकडे आपल्या मुलांचे भविष्य खराब होऊ नये म्हणून धडपडणारे आई-बाबा तर दुसरीकडे आपल्या लहान भावाच्या निधनाची माहिती दडवून ठेवल्याबद्दल मुलांच्या मनातील आई-बाबा यांच्याविषयी असलेला राग. मानवी नात्यातील असलेली गुंतागुंत भक्कमपणे आपल्या अभिनयातून साकार करणारे अभय अंजीकर, दीपाली घोंगे, जयंत बानेरकर, प्रणाली डेकाटे, श्रीरंग दहासहस्र आणि अविनाश लोखंडे. या नाटकाला स्ींगीत जयेश कांबळे यांचे, नेपथ्य केशवानंद सूरकार, प्रकाशयोजना सूरज गणवीर, रंगभूषा प्रीतीबाला चौहान तर वेशभूषा अनुजा पात्रीकर यांची होती. अभय अंजीकर यांच्या समर्थ दिग्दर्शनात महावितरणच्या नागपूर परिमंडळातर्फे हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.गोंदिया परिमंडळातर्फे श्रीपाद जोशी लिखित ‘वादळ वेणा’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. या नाटकात मानवतावादी विचाराविरोधात विद्रोही विचारांचा संघर्ष दाखिवण्यात आला आहे. गावातील एका विहिरीवर आत्महत्या करण्याऱ्या विद्रोही कवीला बाबा परावृत्त करतात. यावेळी बाबा आणि कवी सुमंत यांच्यातील वैचारिक संघर्ष लेखकाने अतिशय प्रभावीपणे सादर केला आहे. अखेर विद्रोही विचारावर मानवतावादी विचार मात करतात, असे नाटकाच्या अखेरीस दाखविले आहे. या नाटकात राजेश नाईक, अरु ण देशमुख, सुधाकर सोनटक्के, शुभांगी मेश्राम, एकनाथ ढवळे, नीरज मातीखाये, मनीष बढे आणि रणजित पानतावणे यांच्या भूमिका आहेत. राजेश नाईक यांच्या प्रभावी दिग्दर्शनात सादर करण्यात आलेल्या या नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली

टॅग्स :cultureसांस्कृतिकmahavitaranमहावितरण