शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

नागपूरमध्ये होणारा टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला; संरक्षणमंत्र्यांकडून बडोद्याची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 08:00 IST

Nagpur News वेदांता-फॉक्सकॉननंतर आता नागपुरात साकारणारा संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे.

ठळक मुद्देवेदांता-फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला 

कमल शर्मा

नागपूर : वेदांता-फॉक्सकॉननंतर आता नागपुरात साकारणारा संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सप्टेंबरमध्ये याची घोषणाही केली होती. मात्र, आता २२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरातच्या बडोदा येथे उभारला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑक्टोबर रोजी याचे भूमिपूजन करणार आहेत.

संरक्षण सचिव अजय कुमार यांनी गुरुवारी यासंबंधीची माहिती देताना सांगितले की, वायुसेनेसाठी सी-२९५ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनविण्याची जबाबदारी टाटा एअरबसला सोपविण्यात आली आहे. कंपनी बडोदा येथील प्लांटमध्ये याची निर्मिती करेल. या घोषणेमुळे महाराष्ट्रासह विशेषत: विदर्भ विकासाच्या स्वप्नांना धक्का बसला आहे. हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारल्याने नागपूरसह संपूर्ण विदर्भाच्या विकासाला चालना मिळाली असती. मात्र याला आता ब्रेक लागला आहे. वेदांता-फॉक्सकॉननंतर महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणारा हा दुसरा मोठा प्रकल्प आहे.

विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत देशपांडे म्हणाले, बडोद्यात असलेल्या पायाभूत सुविधांचा विचार करता टाटा समूहाने हा प्रकल्प तेथे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी टाटा एअरबसच्या प्रमुखांनी स्किल डेव्हलपमेंट सेंटर नागपुरात सुरू करण्यास उत्सुकता दाखविली आहे. काय गेले याची चिंता सोडून आपल्याकडे जे आहे त्यावर अधिक विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

गडकरी यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षांना लिहिले होते पत्र

- मिहानला टाटा समूहाचे बळ देण्यासाठी पुढाकार घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना याच महिन्यात पत्र लिहिले होते. हा प्रकल्प नागपूर परिसरातील टाटा समूहाच्या विस्तारित योजनांसाठी उपयोगी ठरेल, असेही पत्रात नमूद केले होते. गडकरी यांनी टाटा समूहाशी असलेल्या आपल्या जुन्या संबंधांचा हवाला देत मिहानला टाटा समूहाचा विकास हब बनविण्याची विनंतीही केली होती.

महाविकास आघाडीने काहीच केले नाही : फडणवीस

- टाटा एअरबसचा प्रकल्प मिहानमध्ये उभारण्याच्या प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळाली नव्हती. मात्र, आपण त्यासाठी बरेच प्रयत्न केले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पासाठी काहीच हालचाली केल्या नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

विदर्भाच्या अपेक्षांना धक्का : माहेश्वरी

विदर्भ डेव्हलपमेंट कौन्सिलचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी म्हणाले, हा प्रकल्प बडोद्यात गेल्याने नागपूरसह विदर्भाच्या अपेक्षांना धक्का बसला आहे. हा प्रकल्प विदर्भासाठी भाग्यविधाता ठरला असता.

बडोद्यात साकारणाऱ्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये

- टाटा एअरबस बडोद्यातील प्लांटमध्ये पूर्णपणे स्वदेशी एअरक्राफ्ट तयार करेल. विमानांचा पुरवठा २०२६ ते २०३१ पर्यंत केला जाईल.

- पहिली १६ विमाने २०२३ ते २०२५ दरम्यान येतील. यामुळे वायुसेना सी-२९५ परिवहन विमानांची सर्वात मोठी परिचालक बनेल. मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

- कुमार म्हणाले, सी-२९५ विमानांची निर्मिती पहिल्यांदाच युरोपच्या बाहेर होईल. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताने एअरबस डिफेन्स ॲण्ड स्पेससोबत सुमारे २१ हजार कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. ज्यात भारतीय वायुसेनेच्या जुन्या एवरो-७४८ विमानांना बदलण्यासाठी ५६ सी-२९५ परिवहन विमानांची खरेदी करण्यात आली होती.

- करारानुसार एअरबस चार वर्षांत सेविले, स्पेनमध्ये आपल्या अंतिम असेंब्ली लाइनपासून फ्लाय-अवे स्थितीत पहिले १६ विमान देईल व यानंतर ४० विमाने भारतात टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स (टीएएसएल) द्वारा निर्मित व असेंबल केले जातील.

टॅग्स :Tataटाटा