शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

आर्थिक कोंडी टाळण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून सुट्यांचे समर्पण

By नरेश डोंगरे | Updated: May 14, 2023 20:47 IST

५० टक्के रजा विकण्याची मुभा : रजेच्या मोबदल्यात मिळतो आर्थिक लाभ

नागपूर : सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना भरपूर सवलती आणि सुट्या (रजा) मिळतात. कामाचाही फारसा बोझा नसतो. त्यामुळे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अलीकडच्या काही वर्षांपूर्वीपर्यंत मोठी चढाओढ असायची. त्या तुलनेत राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना सुट्या मिळत असल्या तरी सवलती कमी मिळतात. त्यांचा पगारही कमी असल्याची ओरड नेहमी कानावर पडते. आधी कोरोना आणि नंतर संपाच्या फटक्यामुळे एसटीचे बरेचसे कर्मचारी आर्थिक कोंडीत सापडले होते. त्याचमुळे की काय, ते त्यांना मिळणाऱ्या एकूण रजेपैकी जवळपास ५० टक्के रजा विकून त्या मोबदल्यात आर्थिक लाभ पदरात पाडून घेत असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळते. एसटीच्या कर्मचाऱ्यांचा आर्थिक ताळेबंद अन् अर्थाजनांचे स्त्रोत याचा सहज कानोसा घेतला असता ही बाब समोर आली. एसटीच्या नागपूर विभागात साधारणत: अडीच हजारांवर कर्मचारी आहेत. त्यात १०५० चालक, ६५० वाहक आणि जवळपास ८०० प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना मिळणाऱ्या एकूण रजेपैकी ५० टक्के रजा विकण्याची मुभा आहे.

एसटीचालक, वाहकांना वर्षाला ४० रजा

एसटीच्या चालक आणि वाहकांना वर्षभरात प्रत्येकी ४० अर्जित रजा मिळतात आणि दहा सणावारांच्या सुट्या असतात. प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मात्र वर्षाला प्रत्येकी ३० रजा मिळतात.

किती रजांचे पैसे मिळतात?कर्मचारी त्यांच्या एकूण रजांपैकी प्रशासकीय नियमांचं पालन करून वर्षाला ४० पैकी २० रजा विकू शकतात. दुसऱ्या एका नियमानुसार कर्मचारी १५ दिवस सुट्या घेऊन ३० रजा विकू शकतात, असेही अधिकारी सांगतात. त्यांना जेवढ्या रजा विकल्या त्याचे त्यांच्या पगाराच्या हिशेबाप्रमाणे पैसे मिळतात.

पैशाचा हिशेब वेगवेगळा

सर्वजणांनी सारख्या रजा विकल्या म्हणजे सर्वांना सारखीच रक्कम (परतावा) मिळेल, असे नाही. कुणाचा पगार ३० हजार असेल तर कुणाचा ४० हजार असेल. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला एका दिवसाला किती रक्कम येईल, या हिशेबाने तितक्या दिवसाच्या रजेचे पैसे परत मिळेल.

'तो' कर्मचाऱ्यांचा अधिकारप्रशासकीय नियमांचे पालन करून कर्मचारी त्यांच्या मर्जीप्रमाणे रजा विकू शकतात किंवा सरेंडर करू शकतात. त्यासाठी कर्मचाऱ्यावर कुठलाही दबाव अथवा दडपण नसते. तो त्यांचा हक्क आणि अधिकार आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याची मुभा असल्याचे या विषयाच्या संबंधाने बोलताना एसटीचे अधिकारी म्हणतात.

प्रत्येकाला ज्याप्रमाणे पैशाची गरज असते त्याचप्रमाणे रजेचीही गरज असते. रजा घेण्यासाठी प्रत्येकाचे कारण वेगवेगळे असते. आवश्यक नसेल तर कुणी विनाकारण रजा घेत नाही. त्यापेक्षा त्या रजेच्या मोबदल्यात रक्कम मिळते आणि तिचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी, कुटुंबातील महत्त्वाच्या कामासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे रजा विकताना प्रत्येकाचे वेगवेगळे गणित असते. - अजय हट्टेवार, प्रांतीय उपाध्यक्ष, एसटी कामगार संघटना

टॅग्स :nagpurनागपूरEmployeeकर्मचारी