शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

आर्थिक कोंडी टाळण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून सुट्यांचे समर्पण

By नरेश डोंगरे | Updated: May 14, 2023 20:47 IST

५० टक्के रजा विकण्याची मुभा : रजेच्या मोबदल्यात मिळतो आर्थिक लाभ

नागपूर : सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना भरपूर सवलती आणि सुट्या (रजा) मिळतात. कामाचाही फारसा बोझा नसतो. त्यामुळे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अलीकडच्या काही वर्षांपूर्वीपर्यंत मोठी चढाओढ असायची. त्या तुलनेत राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना सुट्या मिळत असल्या तरी सवलती कमी मिळतात. त्यांचा पगारही कमी असल्याची ओरड नेहमी कानावर पडते. आधी कोरोना आणि नंतर संपाच्या फटक्यामुळे एसटीचे बरेचसे कर्मचारी आर्थिक कोंडीत सापडले होते. त्याचमुळे की काय, ते त्यांना मिळणाऱ्या एकूण रजेपैकी जवळपास ५० टक्के रजा विकून त्या मोबदल्यात आर्थिक लाभ पदरात पाडून घेत असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळते. एसटीच्या कर्मचाऱ्यांचा आर्थिक ताळेबंद अन् अर्थाजनांचे स्त्रोत याचा सहज कानोसा घेतला असता ही बाब समोर आली. एसटीच्या नागपूर विभागात साधारणत: अडीच हजारांवर कर्मचारी आहेत. त्यात १०५० चालक, ६५० वाहक आणि जवळपास ८०० प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना मिळणाऱ्या एकूण रजेपैकी ५० टक्के रजा विकण्याची मुभा आहे.

एसटीचालक, वाहकांना वर्षाला ४० रजा

एसटीच्या चालक आणि वाहकांना वर्षभरात प्रत्येकी ४० अर्जित रजा मिळतात आणि दहा सणावारांच्या सुट्या असतात. प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मात्र वर्षाला प्रत्येकी ३० रजा मिळतात.

किती रजांचे पैसे मिळतात?कर्मचारी त्यांच्या एकूण रजांपैकी प्रशासकीय नियमांचं पालन करून वर्षाला ४० पैकी २० रजा विकू शकतात. दुसऱ्या एका नियमानुसार कर्मचारी १५ दिवस सुट्या घेऊन ३० रजा विकू शकतात, असेही अधिकारी सांगतात. त्यांना जेवढ्या रजा विकल्या त्याचे त्यांच्या पगाराच्या हिशेबाप्रमाणे पैसे मिळतात.

पैशाचा हिशेब वेगवेगळा

सर्वजणांनी सारख्या रजा विकल्या म्हणजे सर्वांना सारखीच रक्कम (परतावा) मिळेल, असे नाही. कुणाचा पगार ३० हजार असेल तर कुणाचा ४० हजार असेल. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला एका दिवसाला किती रक्कम येईल, या हिशेबाने तितक्या दिवसाच्या रजेचे पैसे परत मिळेल.

'तो' कर्मचाऱ्यांचा अधिकारप्रशासकीय नियमांचे पालन करून कर्मचारी त्यांच्या मर्जीप्रमाणे रजा विकू शकतात किंवा सरेंडर करू शकतात. त्यासाठी कर्मचाऱ्यावर कुठलाही दबाव अथवा दडपण नसते. तो त्यांचा हक्क आणि अधिकार आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याची मुभा असल्याचे या विषयाच्या संबंधाने बोलताना एसटीचे अधिकारी म्हणतात.

प्रत्येकाला ज्याप्रमाणे पैशाची गरज असते त्याचप्रमाणे रजेचीही गरज असते. रजा घेण्यासाठी प्रत्येकाचे कारण वेगवेगळे असते. आवश्यक नसेल तर कुणी विनाकारण रजा घेत नाही. त्यापेक्षा त्या रजेच्या मोबदल्यात रक्कम मिळते आणि तिचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी, कुटुंबातील महत्त्वाच्या कामासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे रजा विकताना प्रत्येकाचे वेगवेगळे गणित असते. - अजय हट्टेवार, प्रांतीय उपाध्यक्ष, एसटी कामगार संघटना

टॅग्स :nagpurनागपूरEmployeeकर्मचारी