शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

अवयव दानासाठी सुरेल जनजागृती

By admin | Updated: November 17, 2014 00:58 IST

अवयव दान ही संकल्पना भारतीयांनी आजही पाहिजे त्या प्रमाणात स्वीकारलेली नाही. स्पेन, इंग्लंड व अन्य काही देशांशी तुलना केल्यास भारतात अवयव दान करणाऱ्यांची संख्या फारच अत्यल्प आहे.

मोहन फाऊंडेशनचा कार्यक्रम : डॉक्टरांनी गायली गीतेनागपूर : अवयव दान ही संकल्पना भारतीयांनी आजही पाहिजे त्या प्रमाणात स्वीकारलेली नाही. स्पेन, इंग्लंड व अन्य काही देशांशी तुलना केल्यास भारतात अवयव दान करणाऱ्यांची संख्या फारच अत्यल्प आहे. यासाठी विविध बाबी कारणीभूत आहेत. ही विचारसरणी बदलण्याकरिता आज, रविवारी अवयव दानावर सुरेल जनजागृतीचा कार्यक्रम पार पडला. देशभरात अवयव दानाची चळवळ चालवित असलेल्या मोहन फाऊंडेशनतर्फे सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटरच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात कोणी व्यावसायिक गायकाने नाही तर डॉक्टरांनी सुमधूर गीते गायली. आयोजकांनी उपस्थित श्रोत्यांना अवयव दानाचे महत्त्व पटवून देतानाच ही चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले. खरे पाहिले तर हा सांस्कृतिक कार्यक्रम नव्हताच. अवयव दानासाठी केलेला एक स्वर जागर होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांचे नि:स्वार्थी योगदान लाभले. श्रोतेही केवळ मनोरंजनासाठी आलेले नव्हते. त्यांना या चळवळीसंदर्भात आत्मियता होती. मोकळ्या मैदानावरील या कार्यक्रमात रिमझिम पावसाने थोडा व्यत्यय आणला, पण व्यापक उद्देशापुढे अशाप्रकारचा अडथळा गौणच ठरतो.डॉ. प्रशांत निंबाळकर यांच्या ‘गण नायकाय, गण देवताय...’ गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर डॉ. सुरेश अय्यर यांनी ‘आशाए...’, डॉ. गौरी अरोरा यांनी ‘आज फिर जिने की तमन्ना है...’, डॉ. सपना खानझोडे यांनी ‘कैसी पहेली है ये...’, डॉ. सुधीर भावे यांनी ‘आना है तो आ...’, डॉ. समीर जहागीरदार यांनी ‘अल्लाह के बंदे...’, डॉ. प्रदीप राजदेरकर यांनी ‘मै जिंदगी का साथ...’, डॉ. मुकुंद ओक यांनी ‘शूर आम्ही सरदार...’ तर डॉ. रवी वानखेडे यांनी ‘झगमग झगमग दिया जलाओ...’ हे गीत सादर केले. अन्य गायकांनीही श्रवणीय गीते गायली. सुरुवातीला मोहन फाऊंडेशनच्या नागपूर केंद्राचे संचालक डॉ. रवी वानखेडे यांनी कार्यक्रमासाठी मोलाची मदत करणाऱ्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. याशिवाय कार्यक्रमाच्या मध्यंतरात त्यांनी अवयव दानासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली. (प्रतिनिधी)