शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

मोकाट जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 20:36 IST

रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरे आता शहरातील भीषण समस्या झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी गुरांच्या मालकांवर लगाम लावणे आवश्यक असून दंडाची रक्कम वाढवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरे आता शहरातील भीषण समस्या झाली आहे. शहरातील सर्वच भागातील रस्त्यावर या मोकाट जनावरांचा वावर असतो. या गुरांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच रस्त्यावर चालावे लागते. ही समस्या सोडविण्याबाबत महापालिकेची स्थिती हतबल झाल्यागत आहे. कारवाई म्हणून एखाद्या भागात रस्त्यावरील जनावरे पकडलीही जातात पण नाममात्र दंड लावण्यात येत असल्यामुळे गुरांच्या मालकांना याचे फारसे काही वाटत नाही. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी गुरांच्या मालकांवर लगाम लावणे आवश्यक असून दंडाची रक्कम वाढवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे.सेव्ह स्पीचलेस आर्गनायझेशनच्या स्मिता मिरे यांनी याबाबत महापालिकेला अनेकदा निवेदन सादर करून या समस्येवर उपायही सुचविले आहेत. शहरात सर्वच रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर असतो. यात वस्तीतील रस्ते आणि महामार्गही सुटलेले नाहीत. कोणत्याही मार्गांवर ही गुरे बसलेली आढळतात. रस्त्यांवरील जनावरांमुळे नेहमी वाहतुकीचा खोळंबा होतो आणि कित्येकदा अपघातही होतात. मात्र महापालिका या विषयाला फार गंभीरपणे घेत नाही. कधी वाहतूक खोळंबली किंवा अपघात झाला तर या मुक्या जनावरांना बेदम मारहाण केली जाते. वास्तविक अपघात झाला की वाहनचालकांविषयी सहानुभूती व्यक्त केली जाते पण जनावरांनाही तेवढीच इजा होत असते. धक्कादायक म्हणजे महिन्याला १५० च्या जवळपास जनावरांचा अपघाती मृत्यू होत असतो. याचे मालकांनाही काही वाटत नाही.स्मिता मिरे यांनी सांगितले की, मनपा प्रशासनाला अनेकदा जनावर बसत असलेल्या ठिकाणची माहिती दिली. मात्र एवढे जनावर पकडून ठेवायचे कुठे, असा त्यांचा उलट प्रश्न असतो. कधी कारवाई करून जनावर पकडली तरीही ५० किंवा १०० रुपये मालकांवर आकारली जातात. या किरकोळ दंडामुळे गुरांच्या मालकांना फारसा फरक पडत नाही. उलट महापालिकेच्या लोकांना आम्ही १००० रुपये महिना देत असल्याची अरेरावीची भाषा त्यांच्याकडून वापरण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुजोर झालेल्या जनावर मालकांना वठणीवर आणण्यास व रस्त्यावर भटकणाऱ्या जनावरांची समस्या सोडविण्यासाठी गुरांच्या मालकांवर मोठा दंड आकारणे आवश्यक आहे. गुरे रस्त्यावर असण्यासाठी त्यांचे मालक जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. पहिल्यांदा पकडल्यास ५००० रुपये व दुसऱ्यांदा पकडल्यास १०,००० रुपये दंड आकारण्यात यावा.यानंतरही जनावरे रस्त्यावर भटकली तर संबंधित मालकांवर गुन्हा दाखल करून कारागृहात पाठविण्याचा कायदा करण्यात यावा, अशी मागणी स्मिता मिरे यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.क्षमतेपेक्षा अधिक जनावरेबहुतेक जनावर मालकांकडे चार लोकांच्या राहण्यापुरतेही घर नसते आणि त्यात हे लोक ५० गाई म्हशी पाळतात. केवळ पैसे कमवण्यासाठी त्या गुरांचे हाल करतात. सकाळी दूध काढण्यापुरते घरी आणून त्यानंतर दिवसभर त्यांना रस्त्यावर उकिरडे खायला सोडतात आणि संध्याकाळी दूध काढून परत सोडून दिले जाते. कुणीही आपल्या ऐपतीपलीकडे गुरे पाळू नये, तसेच पाळायचे असल्यास त्यांची पुरेपूर खाण्याची व राहण्याची नीट व्यवस्थाही करावी यावरही नियमांची गरज आहे.गुरांना टॅगिंग करावीमहापालिकेने गुरांना लाल व पांढरे असे टॅगिंग करावे. यामुळे मालकीची किती व बेवारस किती याची नोंद होईल. याशिवाय दोनपेक्षा जास्त गाई म्हशी पाळायच्या असल्यास शहराबाहेर पाळावेत तसेच मोकळ्या जागेत पाळावेत जेणेकरून त्यांना इतर दिवस खायला चारा उपलब्ध होईल आणि रस्त्यावर जनावरे दिसणार नाहीत. अपघात टळतील. काही शुल्क घेऊन या गुरे मालकांना शहराबाहेर चरायला जागा द्यावी, ज्याचे दरमहा शुल्क त्यांच्याकडून वसूल करण्यात यावे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर