शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

मोकाट जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 20:36 IST

रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरे आता शहरातील भीषण समस्या झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी गुरांच्या मालकांवर लगाम लावणे आवश्यक असून दंडाची रक्कम वाढवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरे आता शहरातील भीषण समस्या झाली आहे. शहरातील सर्वच भागातील रस्त्यावर या मोकाट जनावरांचा वावर असतो. या गुरांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच रस्त्यावर चालावे लागते. ही समस्या सोडविण्याबाबत महापालिकेची स्थिती हतबल झाल्यागत आहे. कारवाई म्हणून एखाद्या भागात रस्त्यावरील जनावरे पकडलीही जातात पण नाममात्र दंड लावण्यात येत असल्यामुळे गुरांच्या मालकांना याचे फारसे काही वाटत नाही. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी गुरांच्या मालकांवर लगाम लावणे आवश्यक असून दंडाची रक्कम वाढवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे.सेव्ह स्पीचलेस आर्गनायझेशनच्या स्मिता मिरे यांनी याबाबत महापालिकेला अनेकदा निवेदन सादर करून या समस्येवर उपायही सुचविले आहेत. शहरात सर्वच रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर असतो. यात वस्तीतील रस्ते आणि महामार्गही सुटलेले नाहीत. कोणत्याही मार्गांवर ही गुरे बसलेली आढळतात. रस्त्यांवरील जनावरांमुळे नेहमी वाहतुकीचा खोळंबा होतो आणि कित्येकदा अपघातही होतात. मात्र महापालिका या विषयाला फार गंभीरपणे घेत नाही. कधी वाहतूक खोळंबली किंवा अपघात झाला तर या मुक्या जनावरांना बेदम मारहाण केली जाते. वास्तविक अपघात झाला की वाहनचालकांविषयी सहानुभूती व्यक्त केली जाते पण जनावरांनाही तेवढीच इजा होत असते. धक्कादायक म्हणजे महिन्याला १५० च्या जवळपास जनावरांचा अपघाती मृत्यू होत असतो. याचे मालकांनाही काही वाटत नाही.स्मिता मिरे यांनी सांगितले की, मनपा प्रशासनाला अनेकदा जनावर बसत असलेल्या ठिकाणची माहिती दिली. मात्र एवढे जनावर पकडून ठेवायचे कुठे, असा त्यांचा उलट प्रश्न असतो. कधी कारवाई करून जनावर पकडली तरीही ५० किंवा १०० रुपये मालकांवर आकारली जातात. या किरकोळ दंडामुळे गुरांच्या मालकांना फारसा फरक पडत नाही. उलट महापालिकेच्या लोकांना आम्ही १००० रुपये महिना देत असल्याची अरेरावीची भाषा त्यांच्याकडून वापरण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुजोर झालेल्या जनावर मालकांना वठणीवर आणण्यास व रस्त्यावर भटकणाऱ्या जनावरांची समस्या सोडविण्यासाठी गुरांच्या मालकांवर मोठा दंड आकारणे आवश्यक आहे. गुरे रस्त्यावर असण्यासाठी त्यांचे मालक जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. पहिल्यांदा पकडल्यास ५००० रुपये व दुसऱ्यांदा पकडल्यास १०,००० रुपये दंड आकारण्यात यावा.यानंतरही जनावरे रस्त्यावर भटकली तर संबंधित मालकांवर गुन्हा दाखल करून कारागृहात पाठविण्याचा कायदा करण्यात यावा, अशी मागणी स्मिता मिरे यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.क्षमतेपेक्षा अधिक जनावरेबहुतेक जनावर मालकांकडे चार लोकांच्या राहण्यापुरतेही घर नसते आणि त्यात हे लोक ५० गाई म्हशी पाळतात. केवळ पैसे कमवण्यासाठी त्या गुरांचे हाल करतात. सकाळी दूध काढण्यापुरते घरी आणून त्यानंतर दिवसभर त्यांना रस्त्यावर उकिरडे खायला सोडतात आणि संध्याकाळी दूध काढून परत सोडून दिले जाते. कुणीही आपल्या ऐपतीपलीकडे गुरे पाळू नये, तसेच पाळायचे असल्यास त्यांची पुरेपूर खाण्याची व राहण्याची नीट व्यवस्थाही करावी यावरही नियमांची गरज आहे.गुरांना टॅगिंग करावीमहापालिकेने गुरांना लाल व पांढरे असे टॅगिंग करावे. यामुळे मालकीची किती व बेवारस किती याची नोंद होईल. याशिवाय दोनपेक्षा जास्त गाई म्हशी पाळायच्या असल्यास शहराबाहेर पाळावेत तसेच मोकळ्या जागेत पाळावेत जेणेकरून त्यांना इतर दिवस खायला चारा उपलब्ध होईल आणि रस्त्यावर जनावरे दिसणार नाहीत. अपघात टळतील. काही शुल्क घेऊन या गुरे मालकांना शहराबाहेर चरायला जागा द्यावी, ज्याचे दरमहा शुल्क त्यांच्याकडून वसूल करण्यात यावे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर