शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारचे पॅकेज केवळ दिखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:07 IST

नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या पॅकेजवर टीका केली. फडणवीस ...

नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या पॅकेजवर टीका केली. फडणवीस यांचा आरोप आहे की, या पॅकेजमध्ये ३३०० कोटी रुपयांची बजेटमध्ये तरतूद आहे, नवीन काही नाही.

नागपुरात पोहचल्यानंतर फडणवीस पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले, आमची अपेक्षा होती की मुख्यमंत्री रुग्णालयातील बेड, व्हेंटिलेटर आदी सुविधा वाढविण्यासंदर्भात माहिती देतील. मात्र तसे झाले नाही. उलट त्यांच्याद्वारे घोषित केलेल्या पॅकेजमध्ये अनेक घटकांवर त्यांनी लक्ष दिले नाही. यात शेतकरी, छोटे व्यापारी, सलूनचा व्यवसाय करणारे यांच्यासाठी काहीच नाही. स्वस्त धान्य दुकानांना केंद्र सरकारकडून धान्याचा पुरवठा होतो. परंतु राज्यात १ कोटी लोक असे आहेत की जे २०११ मध्ये केलेल्या चुकीच्या सर्व्हेमुळे अन्न सुरक्षा कायद्यात बसू शकले नाहीत. या लोकांसाठी कुठलीही तरतूद केली नाही. नोंदणीकृत स्ट्रीट व्हेंडरला देण्यात येणारा लाभ केवळ मुंबई आणि ठाण्यातील व्हेंडरलाच मिळणार आहे. कारण येथील व्हेंडरच नोंदणीकृत आहे.

आम्हाला अपेक्षा होती की बेड, व्हेंटिलेटर वाढविण्यात येतील. या पॅकेजची अनेक घटकांना मदत मिळणार नाही. आदिवासींना देण्यात येणार असलेल्या खावटी अनुदानाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की राज्य सरकारने गेल्यावर्षी ४ हजार कोटींची तरतूद केली होती. पण २००० कोटी रुपये देऊन सरकारने आदिवासी समाजाची दिशाभूल केली आहे. रस्त्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना घरून विकण्याची परवानगी दिली आहे. परंतु त्याचा लाभ विक्रेत्यांना होणार नाही. त्यांच्याकडे पॅकिंगची कुठलीही सुविधा नाही. अशात लॉकडाऊन असल्याने त्यांच्याकडे येणार तरी कोण?

- नागपूरची स्थिती चिंताजनक

फडणवीस म्हणाले की, नागपूरची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. नागपूरला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. ते म्हणाले, मुंबई व पुणे ही राज्यातील महत्त्वाची शहरे आहे. परंतु या दोन शहराच्या बाहेरही महाराष्ट्र आहे. सरकारला इतर शहरांकडेही लक्ष देण्याची गरज आहे.