शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

परदेशी शिष्यवृत्तीकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 21:30 IST

फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या आघाडी सरकारच्या काळातही मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न सुटलेला नाही. यातच परदेशी विद्यापीठातील शिष्यवृत्तीबाबत सामाजिक न्याय विभागाची कमालीची उदासीनता दिसून येते. विभागाने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. परिणामी विदेशी विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे मागासवर्गीय विद्यार्थी ताटकळत बसले आहेत. राज्य शासनाच्या या भूमिकेमुळे कसा होणार सामाजिक न्याय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमागासवर्गीय विद्यार्थी ताटकळत : कसा होणारा सामाजिक न्याय?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या आघाडी सरकारच्या काळातही मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न सुटलेला नाही. यातच परदेशी विद्यापीठातील शिष्यवृत्तीबाबत सामाजिक न्याय विभागाची कमालीची उदासीनता दिसून येते. विभागाने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. परिणामी विदेशी विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे मागासवर्गीय विद्यार्थी ताटकळत बसले आहेत. राज्य शासनाच्या या भूमिकेमुळे कसा होणार सामाजिक न्याय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या शिष्यवृत्तीद्वारे अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांत उच्चशिक्षणाची संधी प्राप्त करून देण्यात देते. अशाच प्रकारे इतर मागास प्रवर्ग आणि खुल्या प्रवर्गासही परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या योजना उपलब्ध आहेत. अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाने परदेशी शिष्यवृत्तीची नवी जाहिरात काढलेली होती. त्यातील क्रिमिलेयरच्या अन्यायकारक अटींवरून संपूर्ण महाराष्ट्रात संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. त्या अनुषंगाने केलेल्या ऑनलाईन आंदोलनाद्वारे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आपल्या राज्य सरकारने घेतलेली भूमिका मान्य नसलेली समजताच १९ मे, २०२० रोजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या वादग्रस्त निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिल्याचे जाहीर केले. मात्र त्यानंतर ११ मे रोजीच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या जाहिरातीलासुद्धा स्थगिती देण्यात आली होती. त्याविषयी नंतर मात्र कुठलेही शासननिर्णय जाहीर केले नाहीत. दरम्यान, आदिवासी विभागाची जाहिरात प्रसिद्ध झाली मात्र सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने अद्याप जाहिरात प्रसिध्द केलेली नाही. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागत आहे.राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीबाबत विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या विविध संघटनांनी सर्वांशी चर्चा करून यात काय सुधारणा करता येतील, याबाबत शासनाला एक निवेदन सादर करीत विविध सूचना सुचवलेल्या आहेत.४० कोटी मंजूर ३५ कोटी परत घेतले६ जुलै २०२० रोजी राज्य सरकारने वर्ष २०२०-२१ मधली अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठीची राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीमधील मंजूर ४० कोटी रुपये मंजूर व वितरित रकमेपैकी ३५ कोटी रुपये परत घेतले आहेत. आधीच या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने विद्यार्थ्यांचे हित साधले जात नसताना, या योजनेला निधीची कमतरता असताना हा फंड परत काढून घेणे हा अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांवर केलेला अन्याय असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीSC STअनुसूचित जाती जमातीStudentविद्यार्थी