शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
4
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
5
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
6
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
8
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
9
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
10
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
11
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
12
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
13
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
14
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
15
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
16
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
17
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
18
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
19
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
20
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'श्रीलंका शांत; पण जनतेत असंतोष कायम' श्रीलंकेचे माजी मंत्री डॉ. विजयदासा राजापाक्षे यांचे विधान

By आनंद डेकाटे | Updated: May 16, 2026 19:37 IST

Nagpur : श्रीलंकेत सध्या परिस्थिती शांत दिसत असली तरी जनतेमध्ये असंतोष कायम असून नागरिकांना स्थिरता, विकास आणि प्रभावी नेतृत्वाची अपेक्षा आहे, असे प्रतिपादन श्रीलंकेचे माजी मंत्री, राष्ट्रपतींचे कायदेशीर सल्लागार आणि श्रीलंका फ्रीडम पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. विजयदासा राजापाक्षे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
श्रीलंकेत सध्या परिस्थिती शांत दिसत असली तरी जनतेमध्ये असंतोष कायम असून नागरिकांना स्थिरता, विकास आणि प्रभावी नेतृत्वाची अपेक्षा आहे, असे प्रतिपादन श्रीलंकेचे माजी मंत्री, राष्ट्रपतींचे कायदेशीर सल्लागार आणि श्रीलंका फ्रीडम पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. विजयदासा राजापाक्षे यांनी केले. नागपुरात आयोजित जागतिक शांतता परिषदेदरम्यान शनिवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि बौद्ध विचारवंत म्हणून ओळख असलेले डॉ. राजापाक्षे हे गेल्या तीन दशकांपासून श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचे कायदेशीर आणि धोरणात्मक सल्लागार राहिले आहेत. त्यांनी विधी, शिक्षण, बौद्धसासन, कामगार आणि तुरुंग सुधारणा यांसारखी महत्त्वाची मंत्रालयेही सांभाळली आहेत. राष्ट्रपतीपदाची निवडणूकही त्यांनी लढविली होती. श्रीलंकेतील आर्थिक संकटासाठी तत्कालीन राष्ट्रपती आणि सरकारची चुकीची धोरणे जबाबदार असल्याचा आरोप करताना डॉ. राजापाक्षे म्हणाले की, “सरकारला वेळोवेळी धोरणात्मक बदलांचे सल्ले देण्यात आले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी देश आर्थिक डबघाईला आला आणि जनतेचा संताप उफाळून आला.” अनेक चुकीच्या निर्णयांमुळे शांतताप्रिय बौद्ध देशाला हिंसाचाराचा सामना करावा लागल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, “निवडणुका झाल्यानंतर परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी सध्याचे नेतृत्वही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडत आहे. त्यामुळे आगामी काळात श्रीलंकेत पुन्हा राजकीय बदल आणि निवडणुकांचे संकेत दिसत आहेत.” यावेळी श्रीलंकेच्या अमरपुरा महा निकायाचे महानायक थेरो मदमपग्मा अस्साजी थिस्सा, भंते देवमित्ता, किरण महल्ले, नितीन गजभिये, स्मिता वाकडे आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव

१९५० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रीलंकेत जागतिक बौद्ध परिषदेसाठी आले होते, याची आठवण करून देताना डॉ. राजापाक्षे म्हणाले की, “नंतर नागपुरात त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि वैशाख दिनाला जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठीही पुढाकार घेतला.

संकटकाळात भारताची मदत महत्त्वाची

श्रीलंकेत आर्थिक आणि राजकीय संकट निर्माण झाल्यानंतर भारताने मोठे आर्थिक आणि मानवतावादी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. “रुग्णसेवा, पायाभूत सुविधा आणि ५०० रुग्णवाहिका उपलब्ध करून भारताने श्रीलंकेला मोठा आधार दिला,” श्रीलंकेतील बंदर चीनकडे देण्याच्या निर्णयाला विरोध करत आपण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा खुलासाही डॉ. राजापाक्षे यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sri Lanka calm, but discontent remains: Ex-Minister Rajapakse's statement.

Web Summary : Despite apparent calm, Sri Lankans crave stability, development, and strong leadership, says former minister Rajapakse. He blamed past government policies for the economic crisis, praising India's crucial support during the turmoil. Upcoming elections are hinted.
टॅग्स :nagpurनागपूर