शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सोयाबीन, कापसाला फुटले अंकुर :  नुकसानीचे पंचनामे करणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 21:14 IST

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास, परतीच्या पावसाने हिसकावून घेतला. पावसामुळे शेतात कापलेल्या सोयाबीनला अंकुर फुटले तर कापसाचे बोंड गळून पडले. पावसामुळे भिजलेले पीक शेतात पडून आहे.

ठळक मुद्देअधिकारी दिवाळीच्या सुट्यांवर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास, परतीच्या पावसाने हिसकावून घेतला. पावसामुळे शेतात कापलेल्या सोयाबीनला अंकुर फुटले तर कापसाचे बोंड गळून पडले. पावसामुळे भिजलेले पीक शेतात पडून आहे. अधिकारी पंचनामे करतील, विमा कंपन्यांचे अधिकारी भेटी देतील, अशा अपेक्षेत शेतकरी आहे. मात्र दिवाळीच्या सुट्यात सर्व प्रशासन सुस्त आहे. अशात नुकसानीच्या पंचनाम्याची शेतकरी प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. 

जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीनच्या पट्ट्यांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेंगातील दाणे, कापसाची सरकी पावसात भिजल्याने, कोंब फुटले आहे. अस्मानी संकटामुळे शेतमालाची पत प्रचंड खालावली आहे. यावर्षी निसर्गाने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांची चेष्टा केली. हंगामाच्या सुरूवातीला पावसाने दडी मारली. मध्यंतरी संततधार पावसाने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला. त्यातच ढगाळ वातावरण व सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला. दमट वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव झाला. पावसाने थोडीफार सवड देताच शेतकऱ्यांनी पिकांची आंतरमशागत करून कीटकनाशकाची फवारणी केली. त्यामुळे पिकांनी कसाबसा जोम धरला. दिवाळीच्या पूर्वी बहुतेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील सोयाबीनची कापणी करून शेतात गंजी लावून ठेवली. काही पीक अजूनही शेतातच आहे. काही शेतातील कापूस वेचणीला सुद्धा आला. परंतु परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन वाचविण्याची सवड मिळाली नाही. त्यामुळे शेतात असलेले अथवा कापून ठेवलेल पीक पावसात चिंब भिजले. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. 
नुकसान भरपाई मिळावी अशी स्वाभाविकच अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. अनेक शेतकऱ्यांनी नुकसान झालेली पीकं शेतातच ठेवली आहे. अधिकारी येतील पंचनामे करतील, अशा अपेक्षेत शेतकरी आहे. पण दिवाळीच्या सुट्यांमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे. बुधवारीही शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची गंभीरता कृषी विभागाच्या कार्यालयात दिसून आली नाही. कृषी विभागाचे म्हणणे आहे की, जिल्ह्यात फार पाऊस झाला नाही, त्यामुळे पिकांचे नुकसान झालेले नसावे. प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या संगीत खुर्चीत व्यस्तसध्या सरकारचं नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना आदेश देणार तरी कोण?, संपुर्ण प्रशासन हे मुख्यमंत्र्याच्या संगीत खुर्चीत व्यस्त आहे. पगार घेणाºया अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे नुकसान दिसत नाही. त्यातच अधिकाऱ्यांना दिवाळीच्या सुट्यासुद्धा आहे. विम्याचे हप्ते कापले, नुकसान झाल्यावर विमावाले ढुंकून सुद्धा बघत नाही. शेतकऱ्यांबद्दल प्रशासनाची ही लाचारीच म्हणावी लागेल.राम नेवले, नेते, शेतकरी संघटना

टॅग्स :droughtदुष्काळagricultureशेतीFarmerशेतकरीnagpurनागपूर