शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

मुठभर लोकांमुळे काश्मीरची प्रतिमा खराब : आभा खन्ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 10:29 PM

जम्मू-काश्मीर राज्यातील ९३ टक्के भागात भारतविरोधी कुठल्याही कारवाया होत नाही. केवळ ७ टक्के भाग अशांत असून केवळ मूठभर लोकांमुळे जगभरात काश्मीरची प्रतिमा खराब झाली आहे. स्वातंत्र्यानंतर हुर्रियतसारख्या संघटनांच्या दबावामुळे तेथील प्रसारमाध्यमांकडूनदेखील नकारात्मक पद्धतीनेच बाजू मांडली जात असल्याचे प्रतिपादन जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरच्या मिडीया विभागाच्या राष्ट्रीय संचालिका आभा खन्ना यांनी केले.

ठळक मुद्देहुर्रियतसह फुटीरवादी केवळ काही भागापुरतेच मर्यादित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जम्मू-काश्मीर राज्यातील ९३ टक्के भागात भारतविरोधी कुठल्याही कारवाया होत नाही. केवळ ७ टक्के भाग अशांत असून केवळ मूठभर लोकांमुळे जगभरात काश्मीरची प्रतिमा खराब झाली आहे. स्वातंत्र्यानंतर हुर्रियतसारख्या संघटनांच्या दबावामुळे तेथील प्रसारमाध्यमांकडूनदेखील नकारात्मक पद्धतीनेच बाजू मांडली जात असल्याचे प्रतिपादन जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरच्या मिडीया विभागाच्या राष्ट्रीय संचालिका आभा खन्ना यांनी केले. गुरुवारी त्यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी ‘काश्मीरचे सत्य’ या मुद्द्यावर संवाद साधला.टिळक पत्रकार भवनात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन जम्मू काश्मीर स्टडी सेंटर, नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी जम्मू-काश्मीर विधानपरिषदेचे आमदार अजय भारती, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रम्हाशंकर त्रिपाठी, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे सचिव शिरीष बोरकर, जम्मू काश्मीर स्टडी सेंटरचे चारुदत्त कहू प्रामुख्याने उपस्थित होते. प्रसारमाध्यमांच्या स्थानिक प्रतिनिधींकडून हुर्रियतसारख्या फुटीरवादी नेत्यांनाच मोठे करण्याचे काम करण्यात येते. परंतु प्रत्यक्षात ९३ टक्के राज्यात या फुटीरवाद्यांचा काहीही प्रभाव नाही. जम्मू-काश्मीर राज्याबाबत स्वातंत्र्यापासूनच अनेक गैरसमज व संभ्रम पसरविण्यात आले आहेत. भारतीय संविधानानुसार जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देण्यात आलेला नाही. जम्मू-काश्मीर राज्य संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुनच भारतात समाविष्ट झाले होते. पाकिस्ताननेदेखील कधीही काश्मीर आमचे राज्य आहे, असा दावा केलेला नाही. तेथील उच्च न्यायालयाने तर जम्मू-काश्मीर पाकिस्तानच्या हद्दीत नसून ते वेगळे राज्य असल्याचे एका निर्णयात स्पष्ट केले होते. परंतु तत्कालिन भारतीय शासनाने हे मुद्दा प्रभावीपणे मांडलेच नाही. सद्यस्थितीत काश्मीरमधील प्रसारमाध्यमे एक अजेंडा डोळ््यासमोर ठेवूनच काम करत आहेत, असे आभा खन्ना यांनी सांगितले. स्वाती पटवर्धन यांनी गीत सादर केले. अंकिता देशकर यांनी संचालन केले.का व्हायचे शुक्रवारीच पंतप्रधानांचे दौरे ?२०१४ च्या अगोदर भारतातील पंतप्रधानांचे काश्मीर दौरा शुक्रवारीच आयोजित करण्यात यायचा. हुर्रियतसारख्या संघटना यावेळी बहिष्कार बंदची घोषणा करायच्या. मुळात काश्मीरमध्ये शुक्रवारी अनेक व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने दिवसभर बंदच असतात. याच बंद दुकानांची छायाचित्रे प्रसिद्ध करुन ‘हुर्रियतच्या बंदला मोठा प्रतिसाद’ अशा बातम्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित व्हायच्या. परंतु प्रत्यक्षात असा कुठलाही विरोध नसायचा, असे आभा खन्ना यांनी सांगितले.डाव्यांनी अभ्यासक्रमातून काश्मीरचा इतिहासच डावललावैभवशाली परंपरा लाभलेल्या जम्मू-काश्मीरचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट नाही. तेथील नवीन पिढीला जुना इतिहास कळू नये यासाठी डाव्या विचारसरणीच्या लोकांनी पाठ्यपुस्तकांत त्याला स्थानच दिले नाही. सामान्य जनता भारतासोबत आहे. परंतु खेडापाड्यांमध्ये जीव घेण्याची धमकी देऊन लोकांना आंदोलनांसाठी आणले जाते, अशी माहिती तेथील आमदार अजय भारती यांनी दिली. काश्मीरमध्ये २०१६ मध्ये झालेले दगडफेकीचे सत्र काही भागांपुरतेच मर्यादित होते व नवयुवकांना त्यात ओढण्यात आले होते, असेदेखील त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :nagpurनागपूर