शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

-तर काही हॉटेल्स व रेस्टॉरंट कायमच बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:07 IST

नागपूर : लॉकडाऊनमुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट संचालकांच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. हॉटेल व्यवसाय आधीपासूनच मंदीत आहे, तर पार्सल सुविधा ...

नागपूर : लॉकडाऊनमुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट संचालकांच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. हॉटेल व्यवसाय आधीपासूनच मंदीत आहे, तर पार्सल सुविधा सुरू न करता अनेकांनी रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही व्यवसाय पूर्वीपासूनच शासनाच्या रडारवर आहेत. शासनाने मदत न केल्यास अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट कायमच बंद होणार असल्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली.

गेल्यावर्षी केंद्र सरकारच्या लॉकडाऊननंतर दोन्ही व्यवसाय सात महिने बंद होते. राज्याने अनलॉक सुरू केले तेव्हाही या व्यवसायाकडे दुर्लक्ष करण्यात आले. व्यवसाय सुरू करण्याच्या शासनाच्या आदेशानंतरही अनेकांनी हॉटेल्स बंद ठेवण्यात धन्यता मानली. ते अजूनही सुरू झालेले नाहीत. व्यवसाय मंदावल्याने काही संचालकांनी रेस्टॉरंटला कुलूप ठोकले. संचालक म्हणाले, खर्च पूर्वीसारखाच आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. तर भोजनालय आणि नाश्त्याची दुकानातून गरीब व मध्यमवर्गीयांना रोजगार मिळतो. आता या सर्वांवर बेरोजगारीचे संकट आले आहे.

आताच्या लॉकडाऊनमध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट, भोजनालय, रस्त्याच्या कडेला लागणारी हॉटेल्स, नाश्ताची दुकाने आदींचा समावेश आहे. पण पूर्वी हा व्यवसाय काही अर्टीनुसार सुरू करण्याची परवानगी मिळाली होती. त्यानंतर वेळेचे बंधन लादल्या गेले. कधी रात्री ८ तर कधी रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली. नंतर लॉकडाऊनमध्ये रेस्टॉरंट सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्याच्या परवानगीसह शनिवार व रविवारी बंद ठेवण्यात आले. रेस्टॉरंटचा व्यवसाय रात्री ८ नंतर सुरू होतो, शिवाय शनिवार व रविवारी जास्त व्यवसाय होतो. अनावश्यक खर्चापेक्षा रेस्टॉरंट बंद ठेवणे परवडणारे आहे. पार्सल सेवेतून व्यवसाय होत नसल्याचे मत रेस्टॉरंट संचालकांनी व्यक्त केले.

हिरावला अनेकांचा रोजगार

रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, लॉकडाऊनमुळे हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये कार्यरत अनेकांचा रोजगार हिरावला आहे. अनेकांचे कमी कर्मचाऱ्यांवर काम सुरू आहे. काही हॉटेल्सने कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. जानेवारी महिन्यात स्थिती सुधारल्यानंतर त्यांना कामावर परत बोलविले होते. पण आता पुन्हा घरी बसविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना वेतनही मिळत नाही.

रेस्टॉरंट बंद ठेवणेच चांगले

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेकांनी कुटुंबीयांसह घराबाहेर निघणे बंद केले आहे. शिवाय पार्सल सेवेला प्रतिसाद नसल्यामुळे अनेकांनी रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा पर्याय निवडल्याचे मत धंतोली चौकातील रेस्टॉरंट संचालक यादव यांनी सांगितले. आधी कोरोनावर नियंत्रण मिळविणे महत्त्वाचे आहे. परिस्थिती सुधारल्यास पुन्हा रेस्टॉरंट सुरू करू, असे काही संचालक म्हणाले.