शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातील पाणीटंचाईला सौरऊर्जेवरील बोअरवेलचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:07 IST

नागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील पाणी आटते. प्राणी पाण्यासाठी व्याकुळ होतात. प्रसंगी गावात आणि शिवारातही शिरतात. हरिणासारखे प्राणी कुत्र्यांच्या ...

नागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील पाणी आटते. प्राणी पाण्यासाठी व्याकुळ होतात. प्रसंगी गावात आणि शिवारातही शिरतात. हरिणासारखे प्राणी कुत्र्यांच्या तावडीत सापडतात. अनेकदा शिकारही होते. त्याला सौरऊर्जा बोअरवेल हा उपाय ठरला आहे. ठिकठिकाणी केलेल्या बोअरवेलचे पाणी सौरऊर्जेने खेचून प्राण्यांना पुरविण्यावर चार ते पाच वर्षांपासून वनविभागाने भर दिल्याने जंगलातील पाणीटंचाई बऱ्यापैकी दूर झाली आहे.

कडक तापणारा उन्हाळा, बाष्पीभवन यामुळे जंगलातील ७५ टक्के जलस्रोत दरवर्षीच कोरडे पडतात. यावर उपाय म्हणून वनविभागाने कृत्रिम टँक तयार करून त्यात बोअरवेलने पाणी सोडण्याची व्यवस्था केली होती. काही ठिकाणी जंगलात टँकरने पाणीपुरवठा करून प्राण्यांची तहान भागविली जाते. मात्र, सौरऊर्जेवर चालणारे बोअरवेल आता यावर प्रभावी उपाय ठरला आहे. ही पर्यायी नव्हे, संपूर्ण २४ तासांची व्यवस्था आहे. २४ तास वॉटर होलमधून पाणी झिरपत राहील व त्यावर प्राणी आपली तहान भागवू शकतील, अशी सुविधा असल्याने वनार्मचाऱ्यांवरील ताण बराच कमी झाला आहे.

काही ठिकाणच्या तयार केलेल्या वॉटर होलमध्ये बोअरवेलमधून पाणी पडते. ते हाताने हलवावे लागते. त्यामुळे पाणी पूर्णवेळ राहत नाही. भूगर्भातील जलस्रोत खोलवर असल्यास जंगलात तयार केलेल्या कृत्रिम वाॅटर होलमध्ये कर्मचारी हँडपंपच्या मदतीने पाणी भरतात. मात्र, हा पर्याय सुविधाजनक नसून, त्यात धोकाही तेवढाच आहे. बरेचदा मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे हे काम प्रभावित होण्याचा धोका आहे.

अलीकडेच यासंदर्भात पेंच प्रकल्पात बैठक झाली. त्यात मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर यांनी आढावा घेतला. नागपुरातील तिन्ही वन्यजीव क्षेत्रात यंदा पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे सांगण्यात आले. आवश्यक तिथे वाढीव सौरऊर्जा बोअरवेल उभारण्याच्या आणि बोअरवेल दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १५० नैसर्गिक जलस्रोत आहेत. यात ११० सोलर पंप असून, ४० हातपंप आहेत. नव्याने १० सोलर पंप उभारले जातील. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये १०० बोअरवेल असून, ते सर्वच सौरऊर्जेवर चालणारे असल्याची माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली आहे.

...

पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी मॉनिटरिंग केले जाईल. जंगलात अनेक ठिकाणी सोलर पंप आहेत. आवश्यक तिथे दुरुस्तीच्या तसेच वाढीव पंपासाठी सूचना दिल्या आहेत. शक्यतो नैसर्गिक स्रोतावर वनविभागाचा भर आहे.

- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

...