शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

नवनिर्मित वारकरी महामंडळाचे काम सामाजिक न्याय विभागाकडे नको

By कमलेश वानखेडे | Updated: July 19, 2024 18:57 IST

Nagpur : ई. झेड. खोब्रागडे यांची राज्य शासनाकडे विनंती

नागपूर : राज्य सरकारने मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून राज्यातील वारकरी व कीर्तनकार यांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वारकरी, कीर्तनकार सगळेच अनुसूचित जातीचे नाहीत. वारकरी सर्व जाती धर्माचे आहेत. सामाजिक न्याय विभाग फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्यासाठी काम करणारा विभाग आहे. त्यामुळे या महामंडळाचे काम सामाजिक न्याय विभागाकडे नको, अशी विनंती माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

खोब्रागडे यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने १४ जुलै २०२४ रोजी शासन निर्णय जारी करीत मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना केली. सामाजिक न्याय विभागाचे काम मुळात अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्या कल्याणाचे, विकासाचे आहे. समाज कल्याण विभागाची निर्मिती अनुसूचित जातीचे शैक्षणिक, सामाजिक आर्थिक विकासाच्या, निवारा, रोजगार, गरिबी निर्मूलन, शिक्षण व शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वसतिगृहाची सोय करणे, आरोग्य, अत्याचार प्रतिबंध, आरक्षण धोरण राबविणे, वस्ती विकास, वस्तीत सेवा सुविधा देणे आदी योजना राबविण्यासाठी आहे. वारकरी किंवा तीर्थयात्रा साठी, देवदर्शन घडवून आणणेसाठी हा विभाग नाही. असे असताना या विभागाचा निधी यावर खर्च करता येणार नाही व करू नये. यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्या योजनांकडे दुर्लक्ष होईल. यंत्रणेचा कल परिवर्तन बदल घडवून आणण्याकडे

फार कमी असतो. त्यामुळे तीर्थयात्रा, देवदर्शन, वारकरी महामंडळ हे पर्यटन विभाग किंवा ग्राम विकास विभागाकडे किंवा अन्य विभागाकडे सोपवावे. वारकरी महामंडळ सामाजिक न्यायाच्या अंतर्गत नसावे. जे महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडे आहेत त्या महामंडळाचे काय झाले, काय होत आहे याचा सरकारने प्रथम अभ्यास करावा. त्याचे मूल्यमापन करावे. वारकरी महामंडळ हे सामाजिक न्याय विभागाकडे देणे संविधानाच्या अनुच्छेद ४६ मध्ये बसत नाही. सामाजिक न्याय विभागाकडे असलेले बजेट हे अनुसूचित जाती व नवबौद्ध यांचे कल्याण व विकासाच्या योजनेसाठी आहे. याशिवाय इतर कोणत्याही कामासाठी हा निधी वापरता येणार नाही व वळवता येणार नाही. हेच सरकारचे धोरण आहे आणि सरकारने हे पाळले पाहिजे, अशी भूमिकाही ई.झेड. खोब्रागडे यांनी मांडली आहे.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpurपंढरपूरnagpurनागपूर